12:57pm | Aug 03, 2022 |
दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. नोटाबंदीपासून ते कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपर्यंत आणि देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबाबतही त्यांनी आपली भूमिका वारंवार मांडली आहे. मोदी सरकारला खडे बोल सुनावण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. आताही त्यांनी 'मोदी सरकार त्यांची स्तुती करणाऱ्यांनाच बरोबर मानते, बाकी सगळे चुकीचे', असे विधान केले आहे.
रघुराम राजन म्हणाले की, जगातील इतर अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये हिंदुस्थानची अर्थव्यवस्था मजबूत आहे, परंतु रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने पुढील 10 वर्षात संकटांचा सामना करावा लागू शकतो. ज्या पद्धतीने महागाई वाढतेय ते पाहता संकट अधिक गडद होऊ शकते. त्यामुळे आपण विश्रांती घेऊ शकत नाही, आपल्याला अजून खुप काही करायचं आहे. परंतु मोदी सरकार त्यांची स्तुती करणाऱ्यांनाच बरोबर मानते, बाकी सगळे चुकीचे, असेही राजन म्हणाले. 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटाचा सामना करत आहे. हिंदुस्थान एक गरीब देश आहे. वर्षानुवर्षे ज्या प्रकारे नोकऱ्यांची गरज वाढली आहे त्यासाठी विकासातील वाढ अपुरी आहे. त्यामुळे लोकांनी आपले स्किल वाढवण्यावर भर द्यावी आणि शिक्षण क्षेत्रामध्येही तेजी आणावी, असेही रघुराम राजन यावेळी म्हणाले.
लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा असतो. परंतु गेल्या काही वर्षात सरकारने नोटाबंदी, तीन कृषी कायदे यासारखे अनेक निर्णय व्यापक सल्लामसलत न करता घेतले. ज्यामुळे सरकारला जनक्षोभाचा आणि निषेधाचाही सामना करावा लागला. लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा असून संवाद हे न संपणारे चक्र असून ते चालूच राहिले पाहिजे, असेही राजन म्हणाले.
दरम्यान, मोदी सरकारवर निशाणा साधण्याची रघुराम राजन यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेक मुद्द्यावरून मोदी सरकारला घेतले होते. गुजरातमध्ये मागे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा उभारण्यात आला त्यावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. सरकारने राष्ट्रीय आणि धार्मिक महापुरुषांचे मोठे पुतळे उभारण्याऐवजी आधुनिक शाळा आणि विद्यापीठं उभी केली पाहिजेत, असे मत त्यांनी मांडले होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |