01:11pm | Sep 26, 2022 |
नवी दिल्ली : T20 विश्वचषकापूर्वी आशिया कपमध्ये टीम इंडियाची निराशा झाली. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर T20 मालिकेमध्ये भारताने अप्रतिम खेळ दाखवत मालिका २-१ अशी जिंकली. मिशन T20 विश्वचषकापूर्वी, सध्याच्या विश्वविजेत्याविरुद्ध भारताचा विजय मनोबल वाढविण्याचे काम करेल. विश्वचषकापूर्वी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेत टीम इंडियासाठी अनेक आनंदाच्या बातम्याही आल्या.
पाकिस्तानचा विक्रम मोडला
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकून मोठा विक्रम केला आहे. एका वर्षात T20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. भारतीय संघाने या वर्षात आतापर्यंत २१ सामने जिंकले आहेत. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. टीम इंडियाने २०२२ मध्ये २८ T20 सामने खेळले आहेत, त्यापैकी २१ जिंकले आहेत. २०२१ मध्ये पाकिस्तानने २० विजयांचा विक्रम केला होता.
विश्वविजेता ऑस्ट्रेलियाला हरवेल
टीम इंडियाने काल हैदराबादमध्ये झालेली T20 ६ विकेट्सने जिंकली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १८६ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने शेवटच्या षटकात विजय मिळवला. यासह भारताने ३ सामन्यांची T20 मालिका २-१ अशी जिंकली. टीम इंडिया T20 मध्ये नंबर १ टीम आहे, तर ऑस्ट्रेलिया सध्या T20 चा वर्ल्ड चॅम्पियन आहे. त्यामुळेच साऱ्या जगाच्या नजरा तिन्ही सामन्यांवर खिळल्या होत्या.
पहिला सामना: ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून जिंकला
दुसरा सामना: भारत ६ गडी राखून जिंकला (८-८ षटकांचा सामना)
तिसरा सामना: भारताने ६ गडी राखून जिंकला
कोहली-रोहितचा फॉर्म परतला
या मालिकेतून टीम इंडियासाठी बरेच काही साध्य झाले आहे, ज्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्माचे फॉर्ममध्ये परतणे. विराट कोहलीने ३ सामन्यांच्या मालिकेत ७६ धावा केल्या, ज्यात शेवटच्या सामन्यात ६३ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्माने ३ सामन्यात ७४ धावा केल्या, त्यात नागपूरमध्ये नाबाद ४६ धावांचा समावेश आहे.
रवींद्र जडेजाचा देखील पर्याय मिळाला
आशिया चषक स्पर्धेत रवींद्र जडेजा जखमी झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो T20 विश्वचषकातूनही बाहेर असल्याने अक्षर पटेलला संघात आणण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही अक्षरला संधी मिळाली आणि त्याने आपल्या फिरकीच्या जादूने सर्वांना चकित केले. अक्षरकडे चार षटके टाकण्याची, तसेच काही शॉट्स खेळण्याची क्षमता आहे. अक्षरने या ३ सामन्यांच्या मालिकेत ८ विकेट्स घेतल्या.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |