03:15pm | Jul 01, 2022 |
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांच्या शब्दांमध्ये आणि चेहऱ्यावरही नाराजी पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या नव्या सरकावर टीका केली आहे. इतकंच नाहीतर माझ्या पाठीत खंजीर खुपसला पण मुंबईकरांच्या आणि जनतेच्या पाठीत खंजीर खुपसू नका असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना हात जोडून आरेच्या प्रकल्पाविषयी योग्य निर्णय घेण्याची विनंती केली आहे. इतकंच नाहीतर तर त्यांनी अडीच वर्षांआधी भाजप आणि सेनेमध्ये झालेल्या चर्चेविषयीदेखील खुलासा केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे...
- कदाचित आज पहिल्यांदा माझा चेहरा पडला असेल, मला खरोखर दु:ख झालं आहे. माझ्यावर राग आहे ना, तो राग माझ्यावर काढा. मुंबईवर काढू नका, मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका.
- तीन प्रश्न माझ्यासमोर आहेत. ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं, ज्यांनी हे सरकार स्थापन केलं, त्यांच्या मते तथाकथित शिवसैनिकाला त्यांनी मुख्यमंत्री केलं. हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. जे माझं आणि अमित शहांचं ठरलं होतं की अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद
- तेव्हा नकार दिला, आता असं काय केलं? शिवसेनेला बाजुला ठेवून शिवसैनिकाला मुख्यमंत्री असं होऊ शकत नाही.
- अमित शाहांनी शब्द पाळला असता, तर सरकार शानदार असतं.
- आरेचा निर्णय बदलला, त्यामुळे मला दु:ख. आरेचा प्लॉट कुणाचा खासगी नाही. मी पर्यावरणाच्या बाजूने आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल असा निर्णय घेऊ नका.
- ७५ वर्षांत लोकशाहीचे धिंडवडे निघाले. चारही स्तभांनी लोकशाही वाचविण्यासाठी पुढे यावं. लोकशाही वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल.
- हात जोडून विनंती करतो. माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका. मी मुंबईकरांच्या वतीने आरेचा आग्रह रेटू नका, पर्यावरणाला हानी पोहचवू नका. तिकडे वन्य जीवन आहे. आरेचा निर्णय बदलल्यामुळे दु:ख झाले.
- सुरत, गुवाहाटी व्हाया गोवा असं आमदारांनी फिरणं म्हणजे ही जनतेच्या मतांशी प्रतारणा आहे.
- मला जे काही मेसेज आले, मला सोशल मीडियातून जे प्रेम मिळालं, त्याबद्दल जनतेचा मी ऋणी आहे. असं क्वचित होत असेल, एखादा माणसू अनपेक्षितपणे आल्यानंतर पद सोडताना लोकं रडतात. ही माझी कमाई आहे, जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत. त्याप्रती माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही, गद्दारी होणार नाही.
- तुमची अश्रू म्हणजे माझी ताकद. तुमच्या ताकदीशी हरामखोरपणा करणार नाही. सत्ता येते जाते आणि ती परत येते पण असं प्रेम मिळणं म्हणजे भाग्य लागतं.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |