02:16pm | Feb 16, 2021 |
चेन्नई: पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या टिम इंडियाने दुसर्या कसोटीत दमदार कामगिरी करत इंग्लंडचा 317 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. अष्टपैलू कामगिरी करणारा आर.आश्विनच या सामन्याचा हिरो ठरला.
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा 227 धावांनी पराभव केला होता. आता त्याच मैदानावर भारताने त्याच्यापेक्षा मोठा विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. इंग्लंड समोर 429 धावांचे अशक्य असे लक्ष होते तर भारताला विजयासाठी फक्त 7 विकेटची गरज होती. इंग्लंडचा दुसरा डाव 164 धावांवर संपुष्ठात आला. अश्विनने पहिल्या डावात पाच, दुसर्या डावात 3 विकेट आणि शतकासह त्याने विजयाच महत्त्वाची भूमिका पार पाडली. तर अक्षर पटेलने पदार्पणात पाच विकेट घेतल्या.
चौथ्या दिवसाची सुरूवात झाली तेव्हा इंग्लंडला विजयासाठी 429 धावांची गरज होती आणि भारताला फक्त 7 विकेट हव्या होत्या. गोलंदाजांसाठी अनुकुल असलेल्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी पाहूण्या इंग्लंड संघाला फिरकीची कमाल दाखवून दिली. इंग्लंडने कालच्या 3 बाद 54 धावसंख्यवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली.
संपूर्ण सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना फिरकीवर नाचवणार्या अश्विनने चौथ्या दिवशी पहिला धक्का दिला. त्याने लॉरेन्सला 26 वर बाद केले. त्यानंतर बेन स्टोक्सला 8 धावांवर बाद करत इंग्लंडला पाचवा धक्का दिला. स्टोक्सला बाद करण्याची अश्विनची ही 10वी वेळ ठरली आहे. तो बाद झाले तेव्हा इंग्लंडची अवस्था 5 बाद 90 अशी होती.
स्टोक्सच्या जागी आलेल्या ओली पोपला अक्षरने 8 धावांवर माघारी पाठवले. पहिल्या सत्राचा खेळ संपण्याआधी कुलदीप यादवने बेन फोक्सला बाद करून इंग्लंडला सातवा धक्का दिला. यादवची या सामन्यातील पहिली विकेट ठरली. दुसर्या सत्राच्या पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरने कर्णधार जो रूटला बाद करून भारतीय संघाच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. रूटने 33 धावा केल्या. रुटने गेल्या तीन कसोटीत सलग तीन शतक केली होती. ज्यात दोन द्विशतकाचा समावेश होता.
भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्माने धमाकेदार 161 धावा केल्या होत्या. ज्यामुळे संघाला 329 धावांपर्यंत मजल मारता आली. यात अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतकी योगदान दिले होते. इंग्लंडचा पहिला डाव फक्त 134 धावांवर संपुष्ठात आल्या. त्यांच्याकडून बेन फोक्सने सर्वाधिक 42 धावा केल्या. अश्विने पाच फलंदाज बाद केले. भारताच्या दुसर्या डावात अश्विनने शतकी खेळी केली. तर कर्णधार विराटने अर्धशतक केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |