02:36pm | Sep 28, 2022 |
अकोला : लोकशाहीनं निवडून येणारे सरकार आहे, जेव्हा न्यायव्यवस्था प्रशासकीय व्यववस्था संविधानाच्या आधारावर चालतात. हे तर आपण सर्वजण मान्य करतोय. शिवसेनेने १६ आमदारांविरोधात पत्र दिले होते, पक्षविरोधी कारवाई झालेली असून त्यावर कारवाई करा असं म्हटलं होतं. परंतु त्यातही सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला आणि या प्रक्रियेला त्यांनी थांबवले. मग चिन्हाचा वाद आला आणि प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं. त्यातही निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने थांबवले. याप्रकारे न्यायव्यवस्थेने संभ्रम निर्माण करणे हा संशयाचा भाग आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. खरंतर आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. परंतु न्यायव्यवस्थेवर संभ्रम निर्माण होणं, लोकशाहीला फार मोठा धोका असल्याचे काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले.
ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे म्हणालेत आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र सुरुवातीला त्यांनी चिन्हाचं प्रकरण आपल्याकडं का घेतले? अन् परत आता हे प्रकरण आयोगाकडे पाठवले? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे, असे पटोले म्हणाले. दरम्यान, निवडणूक आयोगाने आपल्यावर अन्याय केला, तर आम्हाला सुप्रीम कोर्टात जायचा अधिकार आहे. परंतु आता कोर्टाने त्यांच्याकडे ते प्रकरण ठेवले नसून आयोगाकडे पाठवले. या निर्णयानंतर हा संभ्रमाचा आणि संशयेचा विषय असल्याचा पोटोले म्हणाले. हे कशासाठी होत आहे? का होत आहे? असे अनेक प्रश्नही उपस्थित होत असून हा संशयचा विषय आहे, असल्याचे पटोले बोलले.
सुरुवातीचा १६ आमदारांचा अपात्रेचा जो विषय होता, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार होता का त्याला थांबवलं? हा सवाल आहे. कारण शिंदे गटाचे वकील कोर्टात युक्तिवाद करत असताना तेही सांगत होते. अपात्रतेचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे. ते बरोबर बोलत होते, असेही पटोले बोलले. मग त्यावेळी सुप्रीम कोर्टाने का थांबवलं? तोही संशयाचा भाग आहे. म्हणून आताची जी प्रक्रिया आहे ती कोर्टाच्या संशायाच्या भोवऱ्यात येऊ नये. कोर्टावर संशय येऊ नये, असे अशी आमची प्रामाणिक मागणी आहे. तसेच आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास असून तो राहणार. कारण की आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत. सध्या देशात संविधानिक व्यवस्थेचे तीन तेरा वाजवण्याचे काम सुरू झालेले आहे. त्यासाठी काँग्रेसची लढाई सुरू झाली आहे. 'भारत जोडो यात्रे'च्या माध्यमातून ही लढाई सुरू आहे.
राज्यपालांसह सरकारवर पटोलेंचा खोचक टोला
महाराष्ट्रात सध्याचं सरकार असंविधानिक असून असंविधानिक वागतही आहे. सध्या एका मंत्र्याला सहा जिल्ह्याचा पालकमंत्र्याचा पदभार दिला जात आहे. कुठल्या लोकांना न्याय मिळणार, ही असंविधानिक कृती आहे. तर सध्याचे राज्यपाल विद्वान आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असो की सावित्रीबाई फुले, यांच्यावर ते बोलत राहतात. एवढा विद्वान राज्यपाल राज्याला प्रथमच लाभला, असा खोचक टोला त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. एकीकडे सध्या १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण कोर्टात सुरू होतं आणि दुसरीकडे राज्यपाल शनिवार, रविवार रातोरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी घेतात. तर दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षाची निवड करून शपथविधी उरकून टाकला. दरम्यान, कोर्टातील मंगळवारचा युक्तिवाद ऐकला असेलच त्यामध्ये कोर्टाने राज्यपालांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्याचं सरकार हे असंविधानिक असून ते तसे वागत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |