08:02pm | Oct 12, 2021 |
सातारा : लखीमपूर खिरी येथे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. मात्र तेथील परिस्थिती हाताळण्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सक्षम आहेत. मराठवाड्यात पुरात वाहून गेलेली शेती, अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत. असे अत्यंत गंभीर प्रश्न महाराष्ट्रात आ वासून उभे आहेत. महा विकास आघाडीने त्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा टोला भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी लगाविला.
भटक्या विमुक्त जाती जमातीच्या संवैधानिक आरक्षण व पदोन्नती संदर्भात राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. ते प्रतिज्ञापत्र तत्काळ मागे घेऊन ते आरक्षण पूर्ववत करण्यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांनी सातार्यात येऊन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना निवेदन सादर केले. या संदर्भात त्यांनी आपली रोखठोक भूमिका त्यांनी सादर केली.
पडळकर पुढे म्हणाले, राज्यात बळीराजाची अवस्था अत्यंत वाईट आहे. पीक विम्याची अडचण, राज्यात झालेली अतिवृष्टी तसेच हमी भाव मिळण्यात शेतकर्यांच्या होणार्या अडचणी या मूलभूत प्रश्नांवर राज्य शासन ठोस भूमिका घेत नाही. राज्यातील शेतकर्यांचा सातबारा कोरा करणार असे अभिवचन महा विकास आघाडीने दिले होते मात्र दोन वर्षानंतरही प्रत्यक्षात काहीच घडले नाही. महाराष्ट्रातील या मूलभूत प्रश्नांवर बोलण्याऐवजी महा विकास आघाडी लखीमपूर घटनेवर महाराष्ट्र बंदचे आयोजन करते. ही घटना नक्कीच दुर्देवी आहे पण उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळले आहे. महा विकास आघाडीने अशा घटनांवर बंद पाळून समाज व व्यापार व्यवस्था वेठीला धरण्यापेक्षा शेतकर्यांचे मूलभूत प्रश्न सोडवावेत. असे बंद म्हणजे लोकांचे राजकीय लक्ष विचलीत करण्याचा प्रकार आहे असा टोला पडळकर यांनी राज्य शासनाला लगाविला.
भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या नागरिकांना घटनेने आरक्षण दिलेले आहे. असे असताना राज्य शासनाने ऍड नितीन पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून भटक्या विमुक्त जाती जमाती ना पदोन्नतीचे दिलेले आरक्षण असंवैधानिक असल्याचे म्हणले आहे, त्यामुळे या समाजात तीव्र संतापाचे वातावरण आहे. राज्यात या समाजाचे वीस टक्के प्रमाण असताना शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगण्याचे ढोंग करणारे हे सरकार, अनुसुचित जातीत समावेश, नोकरीत आरक्षण, ऍट्रॉसिटी कायदा लागू करणे या कोणत्याच मागण्यांचा विचार करत नाही, राज्य शासनाने दाखल केलेले आकस पूर्ण प्रतिज्ञापत्र तत्काळ मागे घ्यावे अन्यथा संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
यावेळी प्रदेश कार्यकारीणी महिला मोर्चा उपाध्यक्ष सुवर्णा पाटील, भटक्या विमुक्त महिला आघाडीच्या प्रिया नाईक, शहराध्यक्ष विकास गोसावी, मनीषा पांडे, वैशाली टंगसाळे, राहुल शिवनामे, नेहा खैर, अनिता पवार आदी यावेळी उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |