12:29pm | Aug 12, 2022 |
मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती ओढावली आहे. अशात हवामान खात्याकडून राज्याला पुढच्या ४ दिवसांसाठी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढचे चार दिवस पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात येलो अलर्ट तर नांदेड जिल्ह्यामध्ये पुढच्या २४ तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्याला पुढच्या ४ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागच्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने मागच्या २४ तासांत उसंत दिली असली तरी पुन्हा पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातही काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. तर कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. १३ आणि १४ ऑगस्ट रोजी विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून विदर्भात संततधार सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नद्या, नाले तुडूंब वाहू लागले आहेत. पुराचा फटका शेतीला तर बसलेला आहेच, मात्र सर्वसामान्यांचेही जनजीवन विस्कळित झाले आहे. नागपूर जिल्ह्यातही ७४ टक्के अतिरिक्त पर्जन्यमान झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुराचा फटका बसला आहे.
तुलनेने गुरूवारी शहर तसेच विदर्भात पावसाचा जोर काहीसा मंदावलेला होता. शुक्रवारी आणि शनिवारीसुद्धा विदर्भाला कोणत्याही प्रकारचा इशारा नसून विदर्भवासियांना बऱ्यापैकी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु, रविवार १४ ऑगस्टापासून मात्र विदर्भाला परत एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची तर इतर जिल्ह्यांमध्येसुद्धा दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |