12:18am | Oct 09, 2022 |
सातारा : फलटण शहरालगतच्या अलगुडवाडी येथे महाराष्ट्र फूड प्रोसेसिंग ऍण्ड कोल्ड स्टोरेज या नावाने सुरु असलेला बेकायदेशीर कत्तलखाना गेल्या दशकापासून बिनदिक्कत सुरु आहे. फलटण तालुक्यातील एका पॉवरफुल नेत्याच्या सुपिक डोक्यातून सुरु झालेल्या या कत्तलखान्यात गेल्या दशकभरात लाखो गोवंशाची कत्तल करण्यात आली. गेल्या पाच वर्षामध्ये ‘सातारा टुडे’ने या कत्तलखान्यावर अनेकदा प्रहार केले. मात्र, सभापतीपद गाठीशी असलेल्या फलटण नरेशांनी प्रशासनाला हाताशी धरुन हा कत्तलखाना आजपावेतो सुरुच ठेवला आहे. दशकभरानंतर का होईना, हिंदुत्ववादी संघटनांना फलटणच्या कत्तलखान्याप्रकरणी जाग आली असून ही जाग बैल गेला, झोपा केला अशा स्वरुपाची असू नये. प्रशासनानेही तक्रार असूनसुद्धा नांगी टाकून मागच्या दाराने भिक्षा मागण्याचा प्रयत्न केलेला आहे.
फलटणमध्ये गेल्या दशकभरापासून एमएफपीसी अर्थात महाराष्ट्र फूड प्रोसेसिंग ऍण्ड कोल्ड स्टोरेज नावाने अद्यावत असा जनावरांचा कत्तलखाना सुरु झाला. फार पूर्वी शहरातील मंगळवार पेठेमध्ये नगरपालिकेच्या मालकीचा कत्तलखाना सुरु होता. फलटण शहरातील जी कुरेशी मंडळी आहेत, ती मंडळी परंपरागत व्यवसाय या कत्तलखान्याच्या माध्यमातून चालवित होती. मात्र, परंपरागत कत्तलखान्यापेक्षा व्यवसायिक कत्तलखाना सुरु केल्यास अधिकची कमाई होवू शकते, अशी सुपिक कल्पना सोमवार पेठेतील कात्याभाई उर्फ अण्णा उर्फ सोमाशेठच्या डोक्यात वळवळली. मग त्याने हाजीसाब कुरेशीला हाताशी धरुन असं काही होवू शकतं काय? याची चाचपणी केली. त्यानंतर कात्याभाईने आपला हा मानस नावात राम असलेल्या फलटण नरेशांना बोलून दाखवला. वर्षाला जर विनासायास कोट्यवधी रुपये मिळत असतील, तर फलटण तालुक्यात एक काय, शंभर कत्तलखाने सुरु करा, असे म्हणत फलटण नरेशांनी या कत्तलखान्याला ग्रीन सिग्नल दिला. जागा हेरलीच होती. फलटण शहरानजिकच्या अलगुडवाडी या गावातील काही एकर जमिनीवर हा कत्तलखाना सुरु झाला. रोज हजारो गोवंशाच्या कत्तली या कत्तलखान्यात होवू लागल्या. अलगुडवाडीचा ओढा पाण्याने नव्हेतर मुक्या जनावरांच्या रक्ताने वाहू लागला. हाच ओढा पुढे जावून नीरा नदीला मिळतो. सह्याद्रीच्या रांगांमधून उगम पावणारे पाणी पुढे जावून नीरा नदीला मिळते आणि हीच नीरा नदी पुढे जावून पवित्र अशा भीमेस मिळते. पैसा असेल तर जनावरेच काय, आम्ही माणसांनाही कापू शकतो, अशा विचारांची औलाद असणार्यांनी फलटण ही रामाची भूमी असणार्या शहरात गोवंशाचे शिरकाण करण्यास सुरुवात केली. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर ‘सातारा टुडे’ने कोणाचाही मुलाहिजा न ठेवता फलटणच्या या कत्तलखान्यावर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली. अधिक माहिती घेतली असता या कत्तलखान्यात तालुक्यातील पॉवरफुल नेता फलटण नरेशांचीही स्लीपिंग पार्टनरशीप असल्याचे समजल्यानंतर ‘सातारा टुडे’च्या लेखणीला आणखीनच धार चढली. या कत्तलखान्याशी संबंधित असणार्या अनेकांना दे माय धरणी ठाय असे म्हणत दणके दिले. ‘सातारा टुडे’च्या धारदार लेखणीमुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेत तत्कालीन परिवेक्षाधीन आयपीएस अधिकारी पवन बनसोड यांनी फलटणमधील या कत्तलखान्यावर धाड टाकून हजारो गोवंशांचे अवयव ताब्यात घेतले. पशूसंवर्धन अधिकार्यांनीही ते अवयव गोवंशाचेच असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे फलटणमधील कत्तलखान्यांमध्ये गोवंशांचे शिरकाण होते, यावर शिक्कामोर्तब झाले.
2014 मध्ये देशात आणि राज्यात सत्तांतर झाले. हिंदुत्वाशी नाते सांगणारी ही दोन्ही सरकारे केंद्रात आणि राज्यात होती. त्यामुळेच राज्यात 2015 साली गोवंश हत्त्या प्रतिबंधक कायदा पारित झाला. म्हैस सोडून इतर कोणत्याही जनावरांच्या नरडीला सुरा लावायचा नाही, असा हा कायदा. परंतू गोवंशाचे मांस खायला चटावलेल्या जिभांना मात्र म्हैशीचे मांस रुचत नव्हते. फलटण, बारामती, माळशिरस त्याचबरोबर लगतच्या माण आणि खंडाळा तालुक्यांमध्ये विपुल असे पशूधन, भाकड झालेल्या गायी व बैलांना शेतकरी कसायांना विकायचे. मात्र भाकड पेक्षा धष्टपुष्ट पशुधन चांगले आणि त्याचेच मांस रुचकर, अशी धारणा असलेली अनेक मंडळी मुंबईसह ठाणे आणि मुंब्रा परिसरात गेल्या अनेक शतकांपासून गायींच्या मांसांचा व्यापार करतात. चांगल्या दर्जाचे हे गोमांस मुंबई-दिल्लीसह आखाती देशांमध्ये निर्यात केले जाते, बक्कळ पैसा मिळतो आणि हाच पैसा फलटण तालुक्यातील पुढार्यांच्या खिशात खळाळू लागला.
रामाची भूमी असूनही फलटण नरेशांनी आपला रुतबा, इमान कसायांच्या दावणीला बांधले. दिल्लीतील सनी सिंग, मुंबईचा मतलब कुरेशी, बारामतीचा वसीम कुरेशी, फलटणमधील बीफ किंग हाजीसाब कुरेशी आणि या सर्वांची मोळी बांधून ती फलटण नरेशांच्या तराजूत टाकणारा सोमवार पेठेतील कात्याभाई अशांची अभद्र युती झाली आणि अलगुडवाडीत महाराष्ट्र फूड प्रोसेसिंग ऍण्ड कोल्ड स्टोरेज या गोंडस नावाखाली रोज हजारो गोवंशाचे शिरकाण होवू लागले. अलगुडवाडीचा पाण्याने खळाळून वाहणारा ओढा मात्र गोवंशाच्या रक्ताने माखला.
फलटण ही साधूसंतांची भूमी. महानुभाव पंथाची काशी. याच पवित्र भूमीमध्ये फलटण नरेशांनी गोवंशाची कत्तल करुन या पवित्र भूमीला पवित्र अशा गोवंशाचे रक्त फासले. असो, पैशापुढे सर्वकाही मातीमोल. कारण यांना न भावना, ना नितीमत्ता. यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. गेली काही दशके मुंबईमधील बीफ चा व्यवसाय अंडरवर्ल्डने ताब्यात घेतला आहे. दुबईत व आखाती देशात बसून दाऊदचा उजवा हात समजला जाणारा छोटा शकील हा व्यवसाय सांभाळतो. त्याचेच पंटर मुंबई, ठाणे व दिल्लीत बसून हा व्यवसाय सांभाळतात. दाऊद आणि छोटा शकील काय आहे, हे वेगळे सांगण्याची गरज उरलेली नाही. म्हणजेच आपल्या इथूनच जाणारा पैसा दाऊद आणि छोटा शकील देशविघातक कृत्यांसाठी वापरीत असतात. परंतू देश गेला खड्ड्यात, मला पैसा मिळतोय ना? या खाबुगिरीने मात्र आपण देशविरोधी कृत्य करतोय, याचे भानही फलटण नरेशांसह कात्याभाई आणि त्यांच्या पार्टनर टोळक्याला राहिले नाही.
गेल्या पाच-सहा वर्षामध्ये या कत्तलखान्यासंदर्भात अनेक तक्रारी झाल्या होत्या. गो-हत्त्या बंदी संदर्भात लढणारे शिवशंकर स्वामी, पशू कल्याण कमिटीचे ऍनिमल वेल्फेअर ऑफिसर यतिन जैन यांनी या कत्तलखान्यासंदर्भात अनेक तक्रारी शासनाकडे केल्या होत्या. मात्र राज्याच्या वरिष्ठ सभागृहात बसणार्या फलटण नरेशांनी मात्र या आलेल्या तक्रारी कचर्याच्या डब्ब्यात फेकून देण्यास शासनाला भाग पाडले. सत्तेच्या जोरावर आम्ही काहीही घडवून आणू शकतो, हे फलटण नरेशांनी गेल्या दशकभरात फलटण तालुक्यासह जिल्ह्याला दाखवून दिले. मात्र घर बदलल्यानंतर घराचे वासेही फिरतात, याप्रमाणे हातात सत्ता नसली की रोज येवून कुर्निसात करणारेही ढूंकून पाहत नाही, अशी अवस्था फलटण नरेशांची झाली आहे. पद गेल्यानंतर आपले राजकीय अस्तित्व राहतेय की नाही, याचीही शाश्वती नसलेल्या फलटण नरेशांवर आता वेगवेगळ्या स्वरुपाचे आरोप होवू लागले आहेत.
शुक्रवार दि. 7 रोजी अखिल भारत कृषी गो सेवा संघ, पश्चिम महाराष्ट्र विभाग तसेच शिवप्रतापगड उत्सव समिती, महाराष्ट्र यांच्यावतीने मिलींद एकबोटे व संजय भोसले यांनी सातार्यात पत्रकार परिषद घेवून फलटण येथे कत्तलखाना चालविणार्यांविरोधात सडकून टीका केली. केवळ राजाश्रयामुळेच फलटणमध्ये गेली अनेक वर्षे गोवंशाच्या कत्तली झाल्या. लाखो टन गोवंशाचे मांस फलटण तालुक्यातून मुंबई, पुणे, ठाण्यासह विदेशातही निर्यात करण्यात आले. महाराष्ट्रातील प्राणीरक्षक कायदा डावलून गोवंशाची कत्तल करण्यात आली. अशांवर तसेच त्यांना पोसणार्यांवरही ईडीच्या कारवाईची मागणी एकबोटे व त्यांच्या सहकार्यांनी केली. उशिरा का होईना एकबोटेंना फलटणमध्ये गोवंशाची कत्तल केली जाते, याची माहिती समजली व उशिरा का होईना त्यांनी यावर कारवाईची मागणी केली, याबद्दल खरेतर त्यांचे अभिनंदन करायला हवे. गेल्या सात वर्षांपासून ‘सातारा टुडे’ने या कत्तलखान्यांविरोधात एल्गार पुकारला होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटलांनी सर्वप्रथम या कत्तलखान्याला कायद्याचा झटका देवून सत्तेच्या कैफात लोळणार्या फलटण नरेशांना पहिला झटका दिला होता. राजरोसपणे चालणारी गोवंशाची कत्तल चोरी छुपे होवू लागली. मांस गाईचेच, पण त्या मांसाच्या बॉक्सला ‘बफेलो मीट’ असे स्टीकर लावून शीत वाहने मुंबई-पुण्याकडे धावू लागली. गेल्या अडीच वर्षात तर या व्यवसायाला पूरक असणारे महाविकास आघाडीचे सरकार होते. या काळात या कत्तलखान्यांविरोधात अनेक तक्रारी झाल्या. पण या तक्रारी जिथल्या तिथे दाबून टाकण्यात आल्या. आज एकबोटेंसारख्या कट्टर हिंदूत्ववादी पदाधिकार्याने पत्रकार परिषद घेवून फलटणच्या या कत्तलखान्याचा पर्दाफाश केला. गो-हत्या बंदी कायद्याची पायमल्ली याठिकाणी होतेय, असा आरोप केला. दुपारी पत्रकार परिषद होणार होती. त्यानिमित्ताने फलटणच्या प्रांताधिकार्यांनी या कत्तलखान्यावर पोलीस फौजफाट्यासह छापा मारला. नेहमीप्रमाणे प्रांतांनी वरिष्ठांना अहवाल दिला. यामध्ये काही पशूधन मिळून आले. मात्र ते नियमाप्रमाणे आणि पात्र होते. म्हणजेच या कत्तलखान्यात आतापर्यंत सुरु होते, ते सर्व नियमाप्रमाणेच सुरु होते. गेली दशकभर या कारखान्यातून वाहणारे गोवंशाच्या रक्ताचे पाट हे फक्त म्हैशीचेच होते. कितीही तक्रारी झाल्या तरी पैशांच्या जोरावर त्या निकाली काढल्या जातात. फलटण येथील कत्तलखानाही त्याला अपवाद नाही. सरकारे येतात, जातात. मात्र नोकरशहा त्याच ठिकाणी राहतात. आज एकबोटेंनी बेंबीच्या देठापासून फलटणमधील कत्तलखाना बंद करावा, अशी आर्जव केली. मात्र, फलटणमधील अधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांना एकच अहवाल पाठवून ‘सब किए-धरे पर पाणी फेर दिया’ एवढे सगळे होवूनही बैल गेला अन् झोपा केला, असेच याबाबत म्हणावे लागेल.
अन् मिस्टर रामराजेंची आयबी कडून चौकशी...
राज्यातील कत्तलखान्यांना राष्ट्रवादीतील मोठा राजकीय वरदहस्त आहे. खिलारी गाईच्या रक्तातील शेवण्या या भागाला आंतरराष्ट्रीय बाजारात 1 तोळ्यास 40 हजार रुपये एवढी जबर किंमत आहे. या बेकायदेशीर गोमांस निर्यातीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा पैसा हा आखातात दिला जातो आणि तोच पैसा एका मशिदीच्या बँक अकाउंट वर जमा होऊन ती रक्कम भारतात अतिरेकी संघटनांना पुरवली जाते. यासंदर्भात विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची आयबी म्हणजेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेद्वारे उच्चस्तरीय चौकशी सुद्धा झाली असल्याची माहिती मिलिंद एकबोटे यांनी दिली. म्हणजेच विधान परिषदेचे माजी सभापती रामराजेंचाही या कत्तलखान्यात सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे.
200 गाईंची कत्तल केल्यानंतर फक्त मेन्टनन्स निघतो?
फलटण शहरालगत असणार्या अलगुडवाडी या गावाच्या हद्दीत असणार्या महाराष्ट्र फूड प्रोसेसिंग ऍण्ड कोल्ड स्टोरेज या कत्तलखान्यामध्ये रोज हजारो गोवंशाची कत्तल होते. 200 गाईंची कत्तल झाल्यानंतर या कंपनीचा फक्त मेन्टेनन्स निघत असतो. म्हणजेच या कंपनीतील जे भागीदार आहेत, त्यांना जर कोट्यवधींमध्ये नफा कमवायचा असल्यास रोज किती गाईंची कत्तल होत असेल, याचा विचार न केलेलाच बरा!
कात्याभाईचे द्रविडी प्राणायाम
फलटण शहरामधील सोमवार पेठेतील कात्या उर्फ अण्णाच्या सुपिक डोक्यातून अलगुडवाडीतील कत्तलखान्याची संकल्पना जन्मास आली. त्यानेच मंगळवार पेठेतील हाजीसाब कुरेशीला भरीस घातले. फलटण नरेशांना बरोबर घेतले तरच कत्तलखान्याची संकल्पना पूर्णत्वास येवू शकते. परंतू भालू नामक दिवट्याच्या करामतीमुळे कात्याभाई चांगलाच बॅकफूटवर आला होता. पोलीस कधीही उचलून हाग्या मार देवू शकतात, अशी परिस्थिती उद्भवली होती. त्यातच कत्तलखान्यातील भागिदारांमध्ये काही दिवसांपासून सुंदोपसुंदी सुरु आहे. त्यातच सोमवार पेठेत पहिल्यासारखे वजन न उरल्याने कच्चे बच्चेही अण्णा ऐवजी कात्याभाई म्हणू लागल्याने आता कात्याभाईवर द्रविडी प्राणायाम करण्याची वेळ आलेली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |