03:27pm | Sep 29, 2022 |
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेबाबत नवा दावा करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असून, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी यावर भाष्य करत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. शिवसेना-भाजपची युती असताना भाजपकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याविरोधात सर्वांत आधी एकनाथ शिंदे यांनीच आवाज उठवला होता, असा दावा राऊत यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना विनायक राऊत यांनी त्यावेळेचा घटनाक्रमच सांगितला. युती सरकारच्या काळात भाजपच्या त्रासाला कंटाळून सर्वप्रथम आवाज उठवणारे शिवसेनेतील मंत्री हे एकनाथ शिंदे हेच होते. पण आता ते भाजपच्या इतक्या जवळ कसे गेले, हे फक्त ईडीचे डायरेक्टरच सांगू शकतात, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांविरोधात आकांडतांडव केले होते
एकनाथ शिंदे यांनीच भाजपची साथ सोडा, असा आग्रह धरला होता. त्यांच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, असे म्हटले होते. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खूप आकांडतांडव घातले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली होती. भाजपचा त्रास कसा असतो, हे उघडपणे सांगणारे तेव्हा एकनाथ शिंदे हेच होते, या शब्दांत विनायक राऊतांनी टीका केली.
गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवली
दुसरीकडे, एकनाथ शिंदे गटावरही विनायक राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवली. रामदास कदम जी काही बडबड करतात, त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही, असे राऊत म्हणाले. दरम्यान, नारायण राणे शिवसेना सोडून जात चालले होते, तेव्हा हेच रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर चार दिवस मुक्कामी होते. नारायण राणे यांच्यासोबत राणे गटात या, असे शिवसैनिकांना सांगण्यात कदम आघाडीवर होते, असा मोठा आरोप विनायक राऊतांनी यावेळी केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |