05:17pm | Dec 02, 2020 |
कॅनबेरा: पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाचा पराभव केल्यामुळे मालिकेत भारतीय संघाला व्हॉईट वॉश देण्याचे स्वप्न बाळगणार्या ऑस्ट्रेलियाला अखेर तिसर्या एकदिवसीय सामना गमवावा लागला. पांड्या आणि जाडेजाच्या जोडीने कांगारूंची अखेरच्या षटकांत केलेल्या धुलाईनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे अखेर भारताने तिसर्या एकदिवसीय सामन्यात आपली लाज राखली.
तिसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताला गेल्या सहा सामन्यांमध्ये मिळालेला हा पहिला विजय आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 303 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारताने या सामन्यात 13 धावांनी विजय मिळवला. भातीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या दौऱअयातील हा पहिला विजय आहे.
भारताच्या 303 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला तो पदार्पण करणार्या टी. नटराजनने. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्नस लॅबुशेनला नटराजनने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाला यावेळी सर्वात मोठा धक्का दिला तो या सामन्यात प्रथम खेळणारा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने. या संधीचे सोने शार्दुलने केले आहे. कारण भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या स्टीव्हन स्मिथला शार्दुलने फक्त सात धावांवर बाद केले आहे. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये स्मिथने शतके झळकावली होती. त्यामुळे शार्दुलने यावेळी भारताला मोठे यश मिळवून दिले.
ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज झटपट बाद झाले असले तरी कर्णधार आरोन फिंच मात्र चांगली फलंदाजी करत होता. फिंचने यावेळी आपले अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करत होता. पण अष्टपैलू रवींद्र जडेजाने यावेळी फिंचला शिखर धवनकरवी झेलबाद केले आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. फिंचने या सामन्यात सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 75 धावा केल्या.
दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या वनडे लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करत 5 बाद 302 धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी केली. हार्दिकने 76 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 96 तर रविंद्र जडेजाने 50 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 66 धावा केल्या.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |