08:07pm | Sep 27, 2021 |
सातारा : महाबळेश्वरच्या पीडित युवतीच्या अत्याचार प्रकरणी आरोप करणार्या भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून पुरावे द्यावेत आणि मग कोणाला सहआरोपी करायचे याची भाषा करावी. गुन्हा मुलांनी केल्यावर शिक्षा वडिलांना देण्याचे कोणत्या कायद्यात बसते? त्यामुळे वाघ यांनी आमच्यावर आरोप करण्यापूर्वी ते सिध्द करावे नाही तर ते आरोप तत्काळ मागे घ्यावेत, असा सणसणीत समाचार विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत घेतला. पीडित युवतीसह तिच्या कुटुंबियांचे सुरक्षित पुनर्वसन करण्याची त्यांनी मागणी केली.
भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महाबळेश्वर चे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बावळेकर यांना महाबळेश्वर युवती अत्याचार प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी सातार्यात केली होती तसेच पोलीस यंत्रणा महा विकास आघाडीच्या दावणीला बांधल्याचा आरोप केला होता या विधानांचा समाचार नीलम गोरे यांनी सातार्यात सोमवारी पत्रकार परिषदेत घेतला. येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यावेळी उपस्थित होते.
विधान परिषद उपसभापती नीलम गोरे म्हणाल्या की, महाबळेश्वर येथील अत्याचार पीडित कुटुंबास मी भेटले आहे. याबाबत जी घटना घडली त्याचा तपशील समजून घेतला आहे.ज्या सोसायटीत त्या रहात असतात त्यानुसार तिथे गेल्यानंतर आज मला त्या मुलीला कोणताही त्रास नसल्याचे सांगितले त्याशिवाय मुलीच्या व कुटुंबियांच्या सुरक्षेसह त्यांचे मनोधैर्य अथवा इतर शासकीय योजनेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याची सूचना केली आहे. महाबळेश्वर प्रकरणात पोलीसानी त्याबाबत आरोपीस जेरबंद केलं आहे. पण गुन्हा दाखल होण्यापूर्वी पीडित मुलीस दिवस गेले होते की काय याबाबत कोणीही तिची चौकशी संबधितांनी केली नव्हती हीच गोष्ट अमानवी आहे
डीएनए अहवालानंतर पुढील कार्यवाही होईलच. मात्र चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना गोरे म्हणाल्या, त्यांचेकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात द्यावेत. उगाच हवेत बाण मारू नयेत. कोणत्याही प्रकरणात विरोधी पक्ष बोलू शकतो पण त्यांनी साधार बोलावे. वाईच्या महिला उपविभागीय अधिकारी उत्तम तपास करत आहेत. कोण कोणाच्या दावणीला बांधलेले नाही. दावणीतून सुटलेलेच यांना भेटले असतील. त्यामुळे दावणचं मजबूत करू, असा टोला त्यांनी लगाविला. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईलच पण मुलांची शिक्षा वडिलांना द्यायची हा कोणता न्याय ? वस्तुनिष्ठ चौकशी होईल व डीएनए चाचणीनंतरच चार्जशीट दाखल होईल त्यामुळे आरोप करणार्यांनी आरोप प्रतिज्ञापत्र देऊन कोर्टात सिध्द करावे अन्यथा ते मागे घ्यावेत असे गोरे यांनी सुनावले.
हिंसाचार गुन्ह्यांचा दर 0.5 ने कमी झाला असेल पण ते कदाचित कोरोनामुळे आरोपींना बाहेर पडता आले नसावे, म्हणून असावे.
राजकारणात न्यायाची भूमिका ही पारदर्शकच राहिली आहे. ज्याने जो गुन्हा केला आहे त्याप्रमाणे आरोप दाखल होईलच. या कुटुंबास संरक्षण मिळण्यासाठी मी शिफारस केली आहे. त्यानुसार त्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल. या कुटुंबास घर देण्याच्या अनुषंगाने असेल तर त्याबाबत ही विचार होईल.
बावळेकर यांच्या मुलाप्रमाणे त्यांच्या वडिलांना अटक करावी. या चित्रा वाघ यांच्या मागणीवर त्या म्हणाल्या, आजपर्यंत असा कायदा नाही की ज्या गुन्ह्यात मुलास अटक झाली त्याच गुन्ह्यात वडिलांना ही शिक्षा करावी.. पण कोणाकडे याबाबत पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावे.
पोलीस तक्रार घेत नाहीत याबाबत काय सांगाल? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, आज मुली व्हॉट्सएपवरूनही तक्रार करू शकतात. पण बर्याच घटनेत मुली पुढे येत नसतात.
राज्यात लहान मुली वर अत्याचाराचे प्रमाण वाढले काय कारण असावे..? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, आज जे सोशल मीडियावर अनेकजण पाहतात त्यालाच आभास मानतात. डोंबवली च्या घटनेत तर तिचा नातेवाईकच एक एक जणांकडून पैसे घेत असतात. मुलीचे शोषण झाल्यास तिच्या पाठीशी समाजानेही राहणे गरजेचे आहे.
सरकार कोणाचं ही असो, पण त्यावर राजकारण कोणीच करत नाही. पण या दरम्यान पोलिसांच्या काही चुका दिसत असतील तर त्याबाबत सर्वांनीच बोलले पाहिजे. त्यामुळे पोलीस कोणाच्याही दावणीला बांधलेले नाहीत. दावणीतून सुटलेल्यांच्या आता पुन्हा दावणी मजबूत केल्या पाहिजेत.
सुरूर च्या घटनेबाबत काय सांगाल? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, अशा अघोरी घटना होत असतील तर आता स्मशानभूमीत ही सीसीटीव्ही बसवावे असा प्रवाह आला तर कुठे कुठे बसवावे हा ही प्रश्न आहे.
संजय राऊत म्हणतात पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचे असतील. याबाबत त्या म्हणाल्या, हा अंदाज आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |