12:37pm | Jun 29, 2022 |
डब्लिन : आयर्लंडविरुद्ध मंगळवारी (२८ जून) डब्लिन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर ४ धावांनी विजय मिळवला आणि मालिका २-० सह खिशात घातली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने दीपक हुड्डा याच्या शतकी खेळीच्या जोरावर ७ विकेट्सच्या नुकसानावर २२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंड संघाला २२१ धावाच करता आल्या आणि भारताने ४ धावांच्या फरकाने सामना जिंकला. या सामन्यादरम्यान भारतीय संघाने एक अनोखा आणि अद्भुत विक्रम आपल्या नावावर केला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून दीपक हुड्डा आणि सलामीवीर संजू सॅमसन यांनी विस्फोटक आणि मोठ्या खेळी केल्या. कारकिर्दीतील पाचवाच टी२० सामना खेळत असलेल्या हुड्डाने आयर्लंडच्या गोलंदाजांसाठी धू धू धुलाई केली. त्याने ५७ चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०४ धावांनी वादळी खेळी केली. हे त्याच्या टी२० कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक ठरले.
तसेच ऋतुराज गायकवाडच्या जागी सलामीवीर म्हणून संधी मिळालेल्या संजू सॅमसननेही ४२ चेंडूत ७२ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ षटकार आणि ९ चौकार मारले. या दोघांव्यतिरिक्त कर्णधार हार्दिक पंड्या (१५ धावा) आणि सूर्यकुमार यादव (१५ धावा) यांनी थोडेफार योगदान दिले. मात्र इतर फलंदाजांना साध्या एकेरी धावाही करता आल्या नाही. दिनेश कार्तिक, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल यांनी तर पहिल्याच चेंडूवर शून्य धावेवर (गोल्डन डक) विकेट गमावल्या.
अशा प्रकारे ३ फलंदाज गोल्डन डक झाल्यानंतरही भारतीय संघाने २०० पेक्षा जास्त धावा फलकावर नोंदवत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आजवर टी २० क्रिकेटमध्ये ११ हजार सामने खेळले गेले आहेत. मात्र ३ फलंदाज शून्यावर बाद झालेले असतानाही सर्वोच्च सांघिक धावसंख्या नोंदवण्याचा विश्वविक्रम एकट्या भारतीय संघाने आपल्या नावावर केला आहे. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आजवर कोणत्याही संघाला अशी विलक्षण कामगिरी जमलेली नाही. एकूण टी२० क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, असा पराक्रम करणारा भारत तिसरा संघ आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |