09:44pm | Sep 13, 2021 |
सातारा : ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेचा नगरसेवक विनोद उर्फ बाळु खंदारेने चतुर्थीच्या पूर्वसंध्येला राडा केला. वास्तविक गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून काही महिन्यांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने कंबर कसली होती. पण त्याला हरताळ फासण्याचे काम बाळु व त्याच्या गँग ने केले. देशात कायदा आहे. परंतू हा कायदा बाळु ला लागू नाही का? गेले पाच दिवस गंभीर गुन्हे दाखल होवूनही बाळु पोलिसांना सापडत नाही? ही गोष्ट सातारा पोलिसांना शोभते काय? परवाच्या राड्यामुळे बाळु ला सुरुचीनेच कोलले आहे, तर जलमंदिरनेही चांगलेच फटकारलेले आहे. शेवटी आपली कुठेच डाळ शिजणार नाही, त्यामुळे बाळु ने राष्ट्रवादीशी संधान साधत राष्ट्रवादीच्या तिसर्या आघाडीत सामील होण्याचे आश्वासन दिल्याने राष्ट्रवादीने 'केसाळ' बाळु ला कवटाळले जात असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना सुप्रिमो दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना केसाळ कार्यकर्ते आवडायचे. म्हणजेच ज्याच्यावर जास्त केसेस, तो बाळासाहेबांचा खास व जवळचा कार्यकर्ता. हेच कार्यकर्ते पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रात-राज्यात मंत्री, आमदार-खासदार झाले. परंतू बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी अंगावर घेतलेल्या केसेस या अन्यायाविरोधात लढा देणार्या होत्या, लोकांच्या कल्याणासाठी होत्या. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे, मला केसाळ कार्यकर्ते आवडतात. परंतू सातार्यात नेमके उलटे आहे. जिल्ह्यात जेवढे नगरसेवक आहेत, त्यांच्यावर जेवढ्या केसेस नसतील, तेवढ्या दोन डझनपेक्षा जास्त गुन्हे 'केसाळ' बाळु खंदारेवर दाखल आहेत.
कुप्रसिद्ध अवैध सावकार खंड्या उर्फ प्रमोद धाराशिवकर सातार्यात प्रकट होण्या अगोदरपासून बाळुच्या भानगडी सातार्यात सुरु होत्या. सातार्यातील चळवळ्या पुढारी नरेंद्र पाटील यांचा 'शागिर्द' असलेल्या बाळुने दीड दशकांपूर्वीच सातारा शहरात आपल्या बाललीलांचा 'ऑर्केस्ट्रा' दाखवला होता. अल्पवयीन असल्याने सातारा पोलिसांनी बाळुचे अनेक अपराध पोटात घातले. आज ना उद्या सुधारेल या आशेपोटी सातारा शहरला येणारा प्रत्येक ठाणेदार आश्वस्त असायचा. परंतू कुठले काय, सुधारेल तो बाळु कसला? बाळु च्या बाललीलांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार, हे तत्कालीन पोलीस निरीक्षक नानासाहेब पन्हाळे यांनी ताडले होते. त्यामुळे बाळु कधी वयात येतोय, या दिवसाचा नानासाहेब पन्हाळे व त्यांची टीम मोठ्या बेताबीने वाट पाहत होती. शेवटी 17 वर्षे 364 दिवस पूर्ण होताच बाळुला अल्टिमेटम देण्यात आला. परंतू चप्पल दुकानाचे अतिक्रमण काढत असताना बाळु पालिकेला आडवा आला. पर्यायाने 366 व्या दिवशी नानासाहेब पन्हाळकर यांनी बाळुच्या गचांडीला धरत त्याची वरात शहर पोलीस ठाण्यापर्यंत काढली. गुन्हा दाखल करुन त्याला भलामोठा पुष्पगुच्छ देण्यात आला. त्या पुष्पगुच्छावर बाळुला 'बाळु आता तरी सुधर', अशा आशयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. परंतू बालवयातच गुन्हेगारी रक्तात मुरल्याने बाळु सुधारण्याचे नाव घेत नव्हता. 'ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागतोच. यानुसार अनेक नामचीन गुंडांच्या सानिध्यात राहुन बाळुने त्यांचे गुण आत्मसात केले होते. नैतिकतेचा बुरखा पांघरुन बाळुने जे-जे समाजाच्यादृष्टीने अनैतिक होते, ते-ते सर्व उद्योग त्याने केले.
फलटणमधील माकडवाल्यांनी प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकरचा 'उट्ट्या' केल्यानंतर खंड्या सातार्यात आला. प्रतापसिंह नगरमध्ये स्वत:ला मालिक समजणार्या दत्ता जाधवच्या आश्रयाखाली खंड्याने आपला अवैध खासगी सावकारीचा धंदा तेजीत सुरु केला. पण दत्तुचा फायदा कमी व तोटा जास्त होत असल्याने खंड्याने मल्हार पेठेतील बाळु खंदारे हा नवा यजमान शोधला. गेल्या दशकभरात बाळु व खंडु या दोघांनी मिळुन सातार्यात कोट्यवधींच्या घरात व्याजाने पैसा फिरवला. एकवेळ पठाणी वसुली परवडेल, पण बाळु-खंड्याची वसुली लोकांना परवडत नव्हती. एकदा का यांच्याकडून पैसे घेतले, राहते घर, जमीनजुमला विकला तरी बाळु-खंडुची तहान शमत नव्हती. कोणी घेतलेल्या व्याजाचे पैसे देत नसेल तर त्यांच्या घरात असणारी बायको, बहिण, मुलगी यांच्या आब्रुवर हात टाकून राक्षसी कृत्य केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. शेवटी बाळु-खंडुच्या पापाचा घडा भरला. पोलिसांनी या दोघांवर मोक्का लावून त्यांना जेलची हवा खायला लावली.
गेल्या पालिका निवडणुकीत बाळु खंदारे सुरुची च्या आशिर्वादाने नगरसेवक झाला. नंतर तो त्यांनाच जड जावू लागला. कोण बाबा, कोण महाराज अशा वल्गना पुण्यातील भाईलोकांत तो करु लागला. सातारचा डॉन मीच, अशा तोर्यात तो सातार्यासह पुण्या-मुंबईत राहत असे. मध्यंतरी त्याला लागलेला मोक्का त्याच्या हस्तकांनी गृहमंत्रालयात लाखोंचे सेटिंग लावून तोडला. पर्यायाने मोक्का कोर्टाने काही नियम व अटी लावून व सुधारण्याची हमी घेवून जामीन दिला. मध्यंतरी बाळु शांत आहे, चांगले काम करतोय असा लोकांचा गैरसमज झाला. परंतू पाच दिवसांपूर्वी त्याने सनी भोसले व त्याच्या मित्रांवर खुनी हल्ला करुन आपले आगामी इरादे दाखवून दिले आहेत.
सातार्यात सर्वात जास्त गुन्हे हे समीर कच्छी या मटका बुकीवर आहेत. पण त्याचे गुन्हे हे फक्त मटका व जुगाराशी संबंधित आहेत. ते गुन्हे संघटित गुन्हेगारीत येत नाहीत. परंतू त्याच्यानंतर सर्वात जास्त गुन्हे बाळु खंदारेवर आहेत. समीर कच्छी मटका व जुगारामुळे बदनाम झाला आहे. मात्र बाळु ने आपल्या हस्तकांच्या माध्यमातून सातार्यात जुगार व मटका तेजीत चालवला आहे. या माध्यमातून बाळु ला महिन्याला लाखो रुपये मिळत असतात. आत्तापर्यंत बाळु हा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे, गटारांची रस्त्यांची कामे तो घेतो, असा अनेकांचा समज होता. परंतू बाळुचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. सातारा पोलीस ठाण्यासह सातारा पोलिसांच्या जेवढ्या गुन्हे शाखा आहेत, तेवढ्यांना बाळुची मंथली सुरु असल्याची चर्चा सातार्यात सुरु आहे. भले समीर कच्छी डोक्यावर केस गेल्याने 'शाकाल' झाला असेल, परंतू केसाळ बाळुने आपण जेवढे बाहेरुन काळे, तेवढेच आतूनही काळे असल्याचे आपल्या कर्माने दाखवून दिलेले आहे.
शिवसेना-भाजप असा प्रवास केलेल्या नरेंद्र पाटलांचा दीड दशकांपूर्वी सातारा शहरात दरारा होता. नरेंद्र पाटील आल्याचे कळताच अनेक अधिकारी चळाचळा कापायचे. अशा नरेंद्र पाटलांना बाळु खंदारे नामक प्रौढ बालक हाताशी गवसला. या बाळु चा जेवढा काही वापर करता येईल, तेवढा पाटलांनीही करुन घेतला आणि त्याच पाटलांचा वापर बाळुनेही करुन घेतला. पण शेवटी त्याच बाळुवर पाटलांना आब्रु नुकसानीचा दावा ठोकावा लागला, हे दुर्दैव म्हणावे लागेल. शेवटी मैत्री ही शाश्वत नसते, ती तत्कालिक असते हेच म्हणावे लागेल.
मध्यंतरी खटाव तालुक्यातील एका साखर कारखान्यात कर्मचार्याचा खून झाला होता. या खुनामध्ये राष्ट्रवादीच्या एका माजी आमदाराचा हात असल्याचे बोलले जात होते. कलेक्टर-एसपीं पासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत त्या आमदाराला अटक करण्याची मागणी करण्यात आली. अर्जाचे भेंडोळे पाठविण्यात आले. परंतू ही कोल्हेकुई काही दिवसांतच विरुन गेली. तोड '67' लाखांची झाली आणि ही तोड करण्यात बाळु खंदारेचा सिंहाचा वाटा होता. सध्या बाळु सातार्यात केलेल्या बुकला-बुकलीमुळे अडचणीत आहे. दोन्ही वाड्यांवरील दरवाजे खाडकन् बंद झाल्याने नवीन गॉड फादर शोधावा लागणार. सत्ता महाविकास आघाडीची आहे. या आघाडीत राष्ट्रवादी हा एक घटक आहे. तसेच सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच आहे. त्यामुळे ज्या आमदाराकडून तोड झाली, त्याच्या माध्यमातून बाळुच्या दोन-चार चकरा ल्हासुर्णेच्या बंगल्यावर झाल्या आहेत. दोन महाराजांच्या समोर आपण टिकणार नाही आणि तिसरी आघाडी सातार्यात करायची झाली तर बाळु सारखे पंटर हाताशी हवेत, हे राष्ट्रवादीच्या स्थानिक भिडूंना चांगलेच माहित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही बाळु ला चुचकारले आहे. पाच दिवसांपूर्वी बाळु खंदारे व त्याच्या गँगवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हा प्रकार फारच ‘ग्रँटली’ घेतलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून बाळु सातार्यात येतोय-जातोय. अनेक पुढार्यांच्या गाठीभेटी घेतोय, हे सातारा पोलिसांना माहित नसेल तर नवलच! ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाळु व त्याच्या गँगने धुमाकूळ घालून या उत्सवाला गालबोट लावण्याचे काम केले. हा सण सुरळीत पार पाडावा यासाठी सातारा पोलिसांनी शेकडोंची तडीपारी केली आहे. असे असताना बाळु व त्याच्या गँग ने गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला केलेला खुनी हल्ला सातारा पोलिसांना तितकासा महत्त्वाचा वाटत नसावा. बाळु हा बकासूर आहे. किती खायचे, किती द्यायचे हे त्याला चांगले ज्ञात आहे. येणार्या काही दिवसांमध्ये सातारा पालिकेची निवडणूक येवू घातली आहे. सातारा पोलीस गंभीर गुन्हा दाखल होवूनही बाळु ला कुरवाळत बसले आहेत. परंतू हाच बाळु निवडणुकीदरम्यान पोलिसांच्या बोकांडी बसल्यास आश्चर्य वाटायला नको !
मुख्यमंत्रीसाहेब, आम्हाला न्याय द्या : कुलकर्णी कुटूंबाचा टाहो !
शहरातील एका नगरामध्ये कुलकर्णी कुटूंबिय गेल्या 70 वर्षांपासून एका मिळकतीमध्ये भाड्याने राहत आहेत. तसेच मिळकतीच्या समोरच्या जागेत त्यांचे काही गाळे आहेत. त्या गाळ्यांमध्ये ते व्यवसाय करीत आहेत. नियमानुसार त्यांना भाडेकरु कायदा (टेनन्सी ऍक्ट) लागू होतो. असे असताना बाळु खंदारेने काही महिन्यांपूर्वी मूळ मालकाशी साटेलोटे करुन संपूर्ण मिळकतीचे खरेदीखत स्वत:च्या नावावर करुन घेतले आहे. तसेच संबंधित कुलकर्णी कुटूंबाला जिवे मारण्याची तसेच घरातील महिला व मुलींवर अत्याचार करण्याची धमकी देवून त्यांना या मिळकतीमधून बेदखल केले आहे. यासंदर्भात कुलकर्णी कुटूंबियांनी पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवूनही पोलिसांनी त्यांची दखल घेतलेली नाही. युपी-बिहारला लाजवेल, असे प्रकार बाळु व त्याच्या गँगने सातार्यात सुरु केल्याने आता आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच न्याय देवू शकतील, सातारा पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे असल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |