सातारा : मोदी सरकारने संसदेमध्ये कृषी सुधारणा विधेयक मंजूर करून ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. काँग्रेस सुरुवातीपासून देशातील शेतकऱ्यांना कायद्याच्या नावाखाली अनेक बंधनांमध्ये अडकवून ठेवत आली आहे आजपर्यंत काँग्रेसने देशातील शेतकऱ्यांच्या हिंताला जपणारा कोणताही निर्णय घेतला नाही आणि आज जेव्हा मोदी सरकार शेतीविषयी कायद्यामध्ये सुधारणा करून भारतीय कृषी क्षेत्रामध्ये बदल घडवून आणून बळीराजाची परिस्थिती सुधारण्यासाठी कार्यरत आहे. त्या वेळेस काँग्रेस देशातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष विक्रम पावसकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की वर्ष २०१३ मध्ये स्वतः राहुल गांधींनी असे सांगितले, की काँग्रेसचे शासन असणाऱ्या १२ राज्यांमध्ये फळे व भाज्या एपीएमसी अधिनियमामध्ये समाविष्ट करून घेऊ नये आणि तीच काँग्रेस आज एपीएमसी अधिनियमामध्ये केल्या जाणाऱ्या बदलाला विरोध करीत आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष हे शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केले आहे की देशातील एमएसपीची व्यवस्था पहिल्या प्रमाणेच सुरु राहील आणि काही धान्याची आधारभूत किंमत वाढवण्यात आली आहे. तरीही विरोधी पक्ष राजकारण करत आहेत. मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी पावले उचलत आहे. त्यावेळेला काँग्रेस अतिशय घाणेरडे राजकारण करून शेतकऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस स्वतः एपीएमसी अधिनियम रद्द करण्याच्याविषयी आग्रही होता. काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात कृषी सर्व सुधारणा विषयी लिहिले आहे, पण प्रत्यक्ष संसदेत कृषी सुधारणा बिलाला विरोध करून काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी आपले खरे रूप शेतकऱ्यांना दाखवले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री करता येईल. कृषीमालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर होण्यास मदत तसेच मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळेल. इ-ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध होईल. आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करता येईल. त्यासाठी किंमतही ठरवता येईल ५ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कंत्राटांचा फायदा होईल. बाजारपेठेतल्या अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर नाही त्यांच्या कंत्राटदारांवर राहील. मध्यस्थांना दूर केल्यामुळे शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतील. निर्बंध कमी झाल्याने गुंतवणूक तसंच खासगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल. किमती स्थिर राहण्यात मदत होईल. ग्राहक-शेतकरी दोघांचा फायदा होईल. कृषी सुधारची विधेयके पास झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा नफा वाढेल. आधुनिक टेक्नॉलॉजीचा लाभ मिळेल. शेतकरी सशक्त होतील, आधारभूत किंमत आणि शासनातर्फे खरेदीची व्यवस्था चालू राहणारच आहे. या विधेयकामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा साठा करणे आणि विक्री करणे या साठी स्वतंत्रता मिळेल आणि दलाल आणि मध्यस्थ यांच्या जोखडातून शेतकऱ्यांची सुटका होईल. २००९-१० च्या वेळीच्या कृषी बजेट मध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी १२ हजार कोटींनी वाढ करून ते ३४ हजार कोटींची वाढवले. किसान सन्मान निधी मध्ये आज पर्यंत ९२ हजार करोड रुपये थेट शेतकऱ्यांच्या झत्यावर जमा करण्यात आले आहेत. मोदी सरकारद्वारे १० हजार नवीन एफपीओवर ६८५ करोड रुपये खर्च करण्यात येत आहेत. आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत शेती क्षेत्रासाठी एक लाख करोड देण्याची घोषणा केली गेली आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज व्यवस्थे साठी पूर्वीची जी तरतूद आठ लाख कोटींची होती ती आता पंधरा लाख कोटी करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |