01:46pm | Jul 07, 2020 |
सातारा: 26 जानेवारी रोजी संविधानिक ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही 26 जानेवारी 2018 रोजी तथाकथित ग्रामसेवक संघटनेने काढलेल्या फतव्यानुसार 420 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात आली नाही. याबाबत कारवाई करण्यास दिरंगाई होत असून याविरोधात लवकरात लवकर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा आरपीआय जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 26 जानेवारी 2018 रोजी संविधानिक ग्रामसभा न घेण्याचा फतवा तथाकथित ग्रामसेवक संघटनेने काढला होता. त्याच संविधानातील तरतुदीची तसेच कारवाई प्रचलित कायद्यानुसार होणार्या परिणामास जबाबदार रहाल अशा आशयाची पूर्वसूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्राद्वारे सर्व पंचायत समिती, गटविकास अधिकारी, विस्ताराधिकारी, सेवक व सरपंच यांना दिली होती. तरीही या आदेशाला न जुमानता जिल्ह्यातील 273 ग्रामसेवक आणि 420 सरपंच यांनी ग्रामसभा घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी 273 ग्रामसेवक आमच्यावर प्रशासकीय कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावित केलेले आहे. मात्र 420 सरपंच यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 खालील कलम 7 नुसार कारवाई करण्यासाठी शिफारस अहवाल सादर केलेला आहे. ज्या दिवशी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली त्याच दिवशी एक प्रकारे घटनाच असणार्या ग्रामपंचायत अधिनियमाची अवहेलना जर सरपंचाकडून होत असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ग्रामसेवकांनी संप असल्याचे कारण सांगून ग्रामसभा घेण्याचे टाळले असले तरी सरपंचांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडीसेविका, प्राथमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक, शासकीय कर्मचारी यांची सचिव म्हणून नियुक्ती करून ही ग्राम सेवा घेणे गरजेचे होते. परंतु तसे घडले नाही. यामुळे सातारा जिल्ह्यातील 420 सरपंचांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 खालील कलम 7 नुसार कारवाई करण्यात यावी अशी शिफारस अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केला आहे.
दरम्यान याच नियमानुसार कोरेगाव तालुक्यातील वाघोली गावचे सरपंच बशीर खान कादिर खान पठाण यांना अपात्र केले आहे. त्याचप्रमाणे इतर 420 सरपंचांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा संघटनेचे शेकडो कार्यकर्ते 15 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे याचा निषेध करून सामुदायिक आत्मदहन करण्यात येईल असा इशाराही या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |