04:29pm | Jan 14, 2022 |
कराड : केंद्र सरकारने एफआरपी पेक्षा जादा दर दिलेल्या फरकावरील रकमेवर लागू केलेला साडेनऊ हजार कोटींचा प्राप्तिकर रद्द केला. जे कारखानदार शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा अधिक दर देतात. त्या कारखान्यांना याचा फायदा होणार असून अशा कारखान्यांची संख्या हातावर मोजण्या इतकीच आहे. त्यामुळे या निर्णयाचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल, हा संशोधनाचा भाग असल्याचे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जादा दर देणाऱ्या साखर कारखान्यांना सरकारमध्ये बसलेल्या मंत्री, आमदार यांच्याकडून वेळोवेळी अडचणीत आणण्याचे होते. तसेच संबंधित कारखान्यांना जिल्हा बँकेमार्फत मिळणाऱ्या कर्जालाही अडचणी निर्माण करणे, राज्य सरकारकडून मिळणाऱ्या योजनेत आडकाठी आणण्याचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे ज्यादा दर देण्याच्या मानसिकतेत असलेल्या कारखान्यांनाही दर देता येत नाही.
चालू हंगामात साखरेचा सुवर्णकाळ असून ३८ ते ३९ साखरेचे टेंडर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ४ हजार रुपये दर देण्यास काहीच अडचण नाही. परंतू, तरीही एकरकमी एफआरपी देण्याच्या मानसिकतेत साखर कारखानदार नाहीत. कारखानदारांचेच सरकार असल्याने ते याबाबत केवळ बघ्याच्या भुमिकेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जो कारखाना ज्यादा दर देईल, त्या कारखान्यावर सरकारमध्ये बसलेल्या महाराष्ट्रातील मंत्री, आमदारांकडून दबाव आणून शासकीय कामामध्ये अडचणी निर्माण केल्या जातात.
दरम्यान, एकरकमी एफआरपीसाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरला. तेव्हा त्याकडे मंत्री, आमदारांनी दुर्लक्ष केले. जे कारखानदार एकरकमी एफआरपीच्या कायद्याला कात्रजचा घाट दाखवत असतील, तसेच महाराष्ट्रातील ज्या कारखानदारांनी एकरकमी एफआरपी दिली नसेल, त्या कारखानदारांकडून अधिक दराची अपेक्षा ठेवणे म्हणजे ‘मुंगेरीलाल के सुहाने सपने’ बघण्या सारखेच आहे. त्यामुळे केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी शेतकरी हितासाठी घेतलेल्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल? हा एक संशोधनाचा विषय असल्याचा पुनरुल्लेख साजिद मुल्ला यांनी या प्रसिद्धीपत्रकात केला आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |