02:16pm | Dec 19, 2020 |
अॅडलेड: कांगारूंच्या भेदक मार्यापुढे भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातल्याने अखेर भारताला लाजिरवाण्याचा पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने शानदार 8 विकेटनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी फक्त 90 धावांचे आव्हान होते. या विजयासह ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसर्या डावात भारताची दाणादाण उडवणारे जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
दुसर्या दिवसाअखेर सामन्यावर वर्चस्व असणार्या भारतीय फलंदाजांना तिसर्या दिवशी मात्र भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये जाण्याची जणू घाई झाली होती. मयांक अग्रवाल आणि नाइट वॉचमन जसप्रीत बुमराह खेळण्यास आले. बुमराह 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर मयांक अग्रवाल 9 धावा करून बाद झाला. पहिल्या डावात देखील त्याला धावसंख्या उभा करता आली नाही. मयांक बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 4 बाद 15 अशी होती आणि मैदानावर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मैदानावर होते.
ही जोडी भारताचा डाव सावरेल असे वाटत होते. परंतु अजिंक्य शून्यावर बाद झाला. त्यानंतर सर्व मदार विराट कोहलीवर होती. पण तो देखील चार धावा करून माघारी परतला. विराट बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 6 बाद 19 अशी झाली. त्यानंतर साहा 4, अश्विन शून्यावर आणि हनुमा विहारी 8 धावांवर माघारी परतले. अखेरच्या जोडीपैकी मोहम्मद शमी 1 धावांवर जखमी झाला आणि त्यामुळे भारताचा पहिला डाव 9 बाद 36 वर जाहीर केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही भारताची सर्वात निचांकी धावसंख्या ठरली.
ऑस्ट्रेलियाकडून ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिंन्सने 4 तर जोश हेजलवुडने 5 विकेट घेतल्या. भारताने पहिल्या डावात 53 धावांची आघाडी घेतली होती आणि दुसर्या डावातील 36 धावांसह ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 90 धावांचे सोप लक्ष्य होते.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठीचे सोपे लक्ष्य सहज पार केले. मॅथ्यू वेडने 33 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया विजया जवळ पोहोचला असताना मार्नस लाबुशेनला अश्विनने 8 धावांवर बाद केले. दुसर्या डावात जो बर्न्सने नाबाद 51 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा डे-नाइट कसोटी मधील हा सलग आठवा विजय ठरला आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या सर्व डे-नाइट कसोटीत विजय मिळवला आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहलीची नाणेफेक जिंकून पराभव झालेली पहिली कसोटी मॅच ठरली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |