पाटणा : निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या सर्व 243 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एका नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाच एनडीएचं सरकार बनणार आहे. एनडीच्या खात्यात 125 जागा जमा झाल्या आहेत. तर सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर असलेल्या महागठबंधनला 110 जागा मिळाल्या.
दरम्यान काल (10 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता सुरु झालेली बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया आज पहाटेपर्यंत सुरु होती. परंतु निकाल येण्यास विलंब होणार असल्याचं निवडणूक आयोगाने काल दुपारीच सांगितलं होतं. मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाने दुपारी आणि रात्री एक वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानंतर आज पहाटे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला.
एनडीएमध्ये जागांबाबत बोलायचं झाल्यास भाजपला जेडीयूच्या पुढे आहे. भाजपला 74 जागा मिळाल्या असून जेडीयूला 43, व्हीआयपीला 4 आणि हमला चार जागा मिळाल्या आहेत. तर महागठबंधनमध्ये राजदला 76, काँग्रेसला 19 आणि डाव्या पक्षांना 16 जागा मिळाल्या आहेत.
मतांच्या टक्केवारीत सर्वाधिक 23.1 टक्के वोट शेअर राजदला मिळाले आहेत. तर काँग्रेसच्या वाट्याला 9.48 टक्के आणि डाव्यांना 1.48 टक्के मतं मिळाली आहेत. तर एनडीएमध्ये भाजपने 19.46 टक्के, जेडीयूने 15.38 टक्के मतं मिळवली आहेत.
बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल
एनडीए -125
भाजप - 74
जेडीयू - 43
विकासशील इन्सान पार्टी - 04
हिंदुस्तानी अवाम मोर्चा - 04
महागठबंधन - 110
राजद - 75
काँग्रेस - 19
भाकपा-माले - 12
सीपीएम - 02
सीपीआय - 02
याशिवाय एआयएमआएमने 5, बहुजन समाज पक्षाने एक, लोक जनशक्ती पक्षाने एक जागेवर विजय मिळवला आहे. तर अपक्षाच्या खात्यात एक जागा गेली आहे.
बिहारमध्ये राजडी सर्वात मोठा पक्ष, भाजप दुसऱ्या क्रमांकावर
बिहारमध्ये एनडीएला संपूर्ण बहुमत मिळालं असलं तर इथे राजद 75 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला 74 जागा मिळाल्या असून तो दुसऱ्या क्रमांकवर आहे. भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 21 जागांचा फायदा झाला आहे. 2015 च्या निवडणुकीत भाजपला 53 जागा मिळाल्या होता. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला मोठा फटका बसला आहे. जेडीयूला यंदा 43 जागाच मिळवला आल्या. मागील निवडणुकीत जेडीयूला 71 जागा मिळाल्या होत्या.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |