04:30pm | May 29, 2021 |
फलटण : एकेकाळी वरदायिनी म्हणून ज्या तलावाकडे पाहिले जायचे तो वाखरीचा तलाव आज वाखरीचा कर्दनकाळ तर ठरणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला असून कोणत्याही क्षणी तलाव फुटून गाव पाण्याखाली जाऊन जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे वाखरी तलावाची दुरुस्ती करण्यात येऊन ग्रामस्थांचे जीव वाचवावेत, अशी आर्त साद वाखरीच्या सरपंच शुभांगी शिंदे यांनी प्रशासनाला घातली आहे.
कायम दुष्काळी असा ठपका पडलेल्या वाखरी गावात 1980 साली जवळपास अर्धा टीएमसी ला थोडे कमी असलेल्या तलावाची निर्मिती करण्यात आली, हा तलाव सध्या जीर्ण झाला आहे. या तलावावरील सांडव्यामध्ये भगदाड पडले असून या भिंतीच्या प्रत्येक ठिकाणी भेगा पडून मोठमोठी झाडे उगवली आहेत. या झाडांमुळे हा तलाव कधीही फुटू शकतो व यामध्ये खूप मोठी दुर्घटना घडून वाखरी गाव तर संपूर्ण वाहून जाईलच, पण याबरोबरच जवळ असलेल्या तरटे वस्ती व वाठार निंबाळकर (जुने गाव) जलमय होऊ शकते. या दुर्घटनेमध्ये किती मृत्यू, किती जनावरांची व इतर आर्थिक हानी होऊ शकते, हे कल्पनेच्या पलीकडे असून ही दुर्घटना घडण्यापूर्वी या तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाखरी ग्रामपंचायतीच्या सरपंच शुभांगी शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान ग्रामपंचायत वाखरी व येथील तुकाराम शिंदे यांनी सर्व स्थानिक अधिकारी, जिल्हाधिकारी यांना या तलावामुळे मोठी दुर्घटना घडू शकते, याची माहिती दिली आहे. मात्र, वरिष्ठ अधिकार्यांनी तुमचा तलाव अद्याप कोणाकडेही वर्ग केलेला नाही, मात्र तो लवकरच एनआरबीसी कडे वर्ग करून त्याचे काम केले जाईल, असे सांगितले आहे. परंतू पुढे जाऊन याबाबत चौकशी केली असता ते वर्ग झाले नाही, उलट वरिष्ठ अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचा आरोप वाखरी ग्रामस्थांनी केला आहे. हा तलाव कोणत्या विभागाखाली येतो, हे कोणालाच माहिती नसल्याने प्रशासनाची टाळाटाळ सुरू आहे.
वाखरी गाव हे तब्बल तीन हजार लोकसंख्या असलेले गाव असून या गावची सर्व आर्थिक परिस्थिती या तलावावर व यामधील पाण्यावर अवलंबून आहे. गावच्या हद्दीतील शेत, पिण्याचे पाणी, आसपासच्या ओढे नालेतुन ओसंडून वाहत असतात. यामुळे शेतीला पाणी मिळत आहे. पावसाळ्यात गावात कोणालाही झोप लागत नाही. कधीही हा तलाव फुटू शकतो व मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे ग्रामस्थांचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते. या तलावामुळे वाखरी गावचा विकास झाला आहे. या तलावात तब्बल दीड वर्ष पाणी टिकते. या मुळे गावाला धोम- बलकवडी कडे पैसे भरून कालव्याचे पाणी घेण्याची आवश्यकता नाही. वाखरी तलाव हे आमच्या गावाचे वैभव आहे. मात्र हा तलाव फुटल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते, असे शुभांगी शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान हा वाखरीचा तलाव बांधून झाल्या घटनेला आज 30 वर्षे पूर्ण झाली, तरी याला मालक (विभाग) कोणता असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर कोणाच्या विभागात हा तलाव येतोय हे सांगणे ग्रामस्थ व अधिकार्यांनाच माहिती नसल्याने नेमका पाठपुरावा कोणाकडे करायचा? या विचित्र मनस्थितीत दुर्घटना घडू नये यासाठी हा तलाव दुरुस्ती करण्याचे निवेदन ग्रामपंचायतीने सर्व मंत्री आणि सर्व अधिकार्यांना पाठविले आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर आमचे गाव वाचवा!
आमच्या गावाला कोरोना पेक्षा मोठ्या पावसाची भीती वाटत असून मोठा पाऊस येऊन तलाव जर भरला आणि फुटला, तर गाव पाण्याखाली जाऊन जीवितहानी होणार आहे. पावसाळा तोंडावर आला असून तलाव दुरुस्त करून आमचे गाव वाचवा, अशी आर्त विनवणी सरपंच शुभांगी शिंदे यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |