12:36pm | Oct 13, 2022 |
पर्थ : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील आपल्या मिशन टी-२० वर्ल्डकपची शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या अनऑफिशियल सराव सामन्यात त्यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला. आता या संघाविरुद्ध दुसरा अनऑफिशियल सराव सामना खेळवला जात आहे. हा सामनाही पर्थमध्येच होत आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करणार आहे. या सलग दुसऱ्या सराव सामन्यात विराट कोहलीला स्थान मिळालेले नाही. तर पहिल्या सामन्यातून बाहेर पडलेल्या केएल राहुलला या सामन्यात कर्णधारपद मिळाले आहे. रोहित शर्मा देखील संघात खेळत आहे.
यानंतर भारतीय संघाला दोन ऑफिशिअल सराव सामनेही खेळायचे आहेत. हे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे १७ आणि १९ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया २३ ऑक्टोबरला विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न येथे होणार आहे.
सराव सामन्यात भारताचा अंतिम अकरा संघ
रोहित शर्मा, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.
कोहली-राहुल-अश्विन पहिला सामना खेळले नाहीत
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला पहिल्या अनऑफिशियल सराव सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये खेळायला दिले गेले नाही. कोहलीशिवाय सलामीवीर केएल राहुल आणि स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनही संघात नव्हते. मात्र या दुसऱ्या अनऑफिशियल सराव सामन्यात राहुल आणि अश्विनचे पुनरागमन झाले आहे.
टीम इंडियाने पर्थमध्येच वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला अनऑफिशियल सराव सामना खेळला. त्या सामन्यात ऋषभ पंतने कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीवीर हि भूमिका बजावली. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. यामुळे भारतीय संघाने ६ बाद १५८ धावा केल्या. १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला ८ गडी गमावून केवळ १४५ धावा करता आल्या आणि भारताने १३ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने ३ बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमारने २, हर्षल पटेलला १ आणि युजवेंद्र चहलला १ बळी मिळाला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |