01:19pm | Sep 16, 2020 |
नवी दिल्ली: जगभर हाहाकार उडवून देणार्या कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या लढाईत सध्या भारतच जगाचा तारणहार ठरणार असल्याचे मत मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केले आहे.
एका मुलाखतीत बोलताना बिल गेट्स म्हणाले की, कोरोना लसीबाबत संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागलेले आहे. लसीचा शोध लागला की तिचे उत्पादन वेगाने वाढवण्याची क्षमताही भारताकडे आहे यामुळे लसीचे उत्पादन करण्यासाठी आम्हाला भारताची गरज आहे. 2021 च्या सुरुवातीपर्यंत भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीचे उत्पादन होईल. ही लस प्रभावी आणि सुरक्षित आहे हे एकदा का निश्चित झाले की मग भारताने तिचे लवकरात लवकर उत्पादन करावे आणि तिचा जगाला पुरवठा करावा, अशी आमची अपेक्षा आहे.
भारतात लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. कोरोना लसीचे उत्पादन वाढवण्यासाठीही भारताची मदत लागेल. जगात कुठेही लसीचा शोध लागला तरी भारतात तिचे उत्पादन होईल. जागतिक स्तरावर वैज्ञानिक आणि औषध कंपन्या कोरोना विषाणूवरील लस लवकरात लवकर शोधून काढण्यासाठी काम करत आहेत. काही लसी चाचणीच्या तिसर्या आणि अंतिम टप्प्यात आहेत, असा उल्लेख करून गेट्स म्हणाले की, आमचे फाउंडेशन भारताच्या नीती आयोेगासोबतच याविषयी चर्चा करत आहे. आयसीएमआर या लसींच्या नियामक पैलूंचा अभ्यास करत आहे. भारतीय औषध उद्योग मोठ्या प्रमाणावर जगासाठी वेगवेगळ्या लसींचे उत्पादन करतो. या उद्योगाकडे कुठल्याही लसीचे उत्पादन वेगाने वाढवण्याची क्षमता आहे. त्या पृष्ठभूमीवर बिल गेट्स यांनी हे मत व्यक्त केले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |