02:51pm | Sep 29, 2020 |
पुसेगाव: विसापूर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये असणार्या बोबडेवाडी, बुधावलेवाडी, चांदखनवाडी नागरिकांना दरवर्षी जानेवारी महिन्यापासून ते जुलैअखेर पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो. भारत फोर्ज कंपनीच्या ग्रामविकास योजनेअंतर्गत सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सी एस आर) फंडाच्या माध्यमातून या तिन्ही वाड्यांच्या नळ पाणी पुरवठा अंतर्गत पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ भारत फोर्ज कंपनीच्या सीएसआर विभाग प्रमुख लीना देशपांडे, धामणेरचे आदर्श सरपंच शहाजी क्षीरसागर, भारत फोर्ज कंपनीचे सी एस आर अधिकारी जयदीप लाड यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे, माजी चेअरमन राजेंद्र साळुंखे, ग्रामविकास अधिकारी एस एस पवार, प्रकाश साळुंखे, विलास सावंत शिवाजी सावंत हणमंत सावंत, सुनील साळुंखे, विजय साळुंखे, भानुदास बुधावले, शिवाजी साळुंखे, राजू मदने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
लीना देशपांडे म्हणाल्या, भारत फोर्ज कंपनीचे चेअरमन बाबासाहेब कल्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीमध्ये स्वतंत्र सी एस आर फंडाच्या माध्यमातून विकासकामे करण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. या सीएसआर विभागाच्या माध्यमातून राज्यातील अनेक गावांमध्ये विकासकामे करत असताना त्या गावचे मायक्रो प्लॅनिंग करत पाणी, शिक्षण, आरोग्यासह विविध विकासकामांना प्राधान्यक्रम दिला जातो. त्या क्रमानुसार विकासकामे केली जातात. भारत फोर्ज कंपनीने गेल्या अनेक वर्षांमध्ये राज्यातील अनेक गावांमध्ये विकासकामे करून तेथील जनतेचे प्रश्न सोडविण्यात यश आले आहे. पाच वर्षाच्या कालावधीत विसापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भारत फोर्ज कंपनी प्रयत्नशील राहील.
शहाजी क्षीरसागर म्हणाले, विसापूर मध्ये गेली पाच वर्षाच्या कालावधीत जलसंधारण, शिक्षण, रस्ते यासह विविध विकासकामे साकारण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे. परंतु विसापूरचा भौगोलिक विस्तार खूपच मोठा आहे. भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून राज्यात अनेक गावे आदर्शवत निर्माण झालेली आहेत त्याच धर्तीवर ती विसापूर गावाचा ही विकासात्मक कायापालट निश्चितपणे होईल
माजी उपसभापती संतोष साळुंखे म्हणाले, विसापूर ग्रामपंचायत अंतर्गत असणार्या बोबडेवाडी, बुधावलेवाडी, चांदखनवाडीतील नागरिकांना जानेवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई सामना करावा लागत होता. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावा लागत होता. भारत फोर्ज कंपनीच्या सी एस आर फंडाच्या माध्यमातून या तिन्ही वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. गेली मार्च महिन्यापासून संपूर्ण जगासह भारतावर करोनाचे संकट ओढवले आहे. या संकटामुळे
सर्वच क्षेत्रांमध्ये आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक कंपन्या बंद आहेत तर अनेक कंपन्या पूर्वपदावर आलेल्या नाहीत अशी वस्तुस्थिती असतानाही भारत फोर्ज सारख्या नामांकित कंपनीने संकटाच्या काळातही कंपनीचे हिताबरोबर सामाजिक हित जोपासत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिल साळुंखे तर आभार ज्ञानेश्वर धायगुडे यांनी मानले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |