नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते आणि आर्य समाजाचे प्रसिद्ध नेते स्वामी अग्निवेश यांचे आज निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वामी अग्निवेश यांना सोमवारी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अॅण्ड बायलरी सायन्सेसमध्ये (ILBS) दाखल करण्यात आले होते. स्वामी अग्निवेश यांना शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, मात्र डॉक्टरांना यश आले नाही. त्यांनी संध्याकाळी ६.३० वाजता अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती ILBS ने दिली आहे.
यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त झालेल्या स्वामी अग्निवेश यांच्या अनेक अवयवांनी काम करणे थांबवले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश येऊ शकले नाही.
२१ सप्टेंबर १९३९ ला जन्मलेले स्वामी अग्निवेश सामाजिक मुद्दयांवर आपले मत निर्भिडपणे मांडण्यात प्रसिद्ध होते. त्यांनी १९७० मध्ये आर्य सभा नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. सन १९७७ मध्ये ते हरयाणा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर ते हरयाणाचे शिक्षणमंत्री झाले. सन १९८१ मध्ये त्यांनी बंधुआ मुक्ती मोर्चा नावाची संघटना स्थापन केली.
स्वामी अग्निवेश यांनी सन २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वातील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात भाग घेतला होता. मात्र, नंतर मतभेद झाल्यामुळे ते आंदोलनापासून दूर झाले. स्वामी अग्निवेश यांनी रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये देखील भाग घेतला. ते ८ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात देखील राहिले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |