06:10pm | May 20, 2019 |
सातारा : 2019 साल उजाडल्यानंतर देशभरात 17 व्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली. निवडणुका म्हणजे खरेतर धामधुमीचा काळ. बाप पोराचा, पोरगं बापाचं आणि मित्र मित्राचा राहत नाही, हे निवडणुकांमधून दिसणारे वास्तव आहे. 2014 साली एनडीए ला लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले. गेल्या दहा वर्षात केलेल्या भ्रष्टाचारामुळे युपीए ची प्रतिमा मलीन झाली होती. ऐनवेळी एनडीए ने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले होते. मोदींची लोकप्रियता प्रशांत किशोर यांनी वॉर रुम मध्ये बसून सोशल मीडियाद्वारे केलेला भाजपचा प्रभावी प्रचार या सर्व गोष्टी एनडीएच्या पथ्यावर पडल्या. परिणामी लोकसभेत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आणि देशाचे 14 वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र दामोदरदास मोदी यांना पंतप्रधानपदी बसण्याची संधी मिळाली. गुजरातचे 14 वे मुख्यमंत्री, देशाचे 14 वे पंतप्रधान 2014 साली भारत देशासारख्या महासत्तेच्या चाव्या मोदींना हातात मिळाल्या. एक व्हिजनरी चेहरा भारताला मिळाला, अशी अपेक्षा सामान्यजनांनी केली. मात्र, गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदींनी काय केले, हे आता वेगळे सांगण्याची गरज उरली नाही.
आरएसएस आणि भाजपा या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आरएसएसचे अजेंडे काय आहेत आणि कोणते होते, हेही सूर्यप्रकाशाइतके नितळ आहे. मात्र, भारतासारख्या सार्वभौम, सेक्युलर देशाचा पंतप्रधान होणे, ही काय खायची गोष्ट नाही. परंतू गेल्या पाच वर्षांमध्ये एक्सटर्नल अफेयर्स प्रगल्भ झाली. मात्र, इंटरनल अफेयर्स मात्र पुरती फसली. गो हत्या बंदी, नोटबंदी, अल्पसंख्यांक दलितांवरील अत्याचारात झालेली वाढ ही निश्चितच भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशाला भूषणावह नाही. तरीही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 56 इंचाची छाती फुगवून भारतात सर्वकाही आलबेल आहे, असे भासविण्याचा प्रयत्न करत आहेत. सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांचा धुरळा आता खाली बसला आहे. आता प्रतिक्षा 23 तारखेचीच. मात्र, विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमुळे मात्र लोकांचे मनोरंजन होत आहे. 19 मे ला देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडातील केदारनाथ येथे जावून केदारेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. 2019 ला सुद्धा आम्ही स्पष्ट बहुमताने निवडणूक जिंकावी, यासाठी केदारनाथाला साकडे घातले. श्रद्धा, सबुरी आणि निष्ठा यावरच मानवी जीवन अवलंबून आहे. याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही अपवाद कसे असतील? मात्र गुहेत जावून तपश्चर्या करणे, ये बात कुछ हजम नहीं हुई. देशाचे तत्कालीन गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी एका विशिष्ट धर्माला भगवा दहशतवाद असे संबोधले होते. भगवा अनंत काळापासून हिंदू धर्माशी जोडला गेलेला रंग आहे. मोदींनीही भगव्या रंगाची शाल परिधान करुन तब्बल 17 तास केदारनाथाच्या गुहेत ध्यान केले. ध्यान व तपश्चर्या करुन देशाचा विकास होत असतो, हे मोदींनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले.
35 वर्षांपासून ऑस्ट्रेलियासारखा संपन्न देश सोडून ओडिशातील आदिवासी बहुल मयुरभंज, क्योंझर जिल्ह्यात ग्रॅहम स्टुअर्ट स्टेन्स नावाचा एक मिशिनरी महारोग्यांची सेवा करीत होता. ज्या व्यक्तीला कुष्ठरोग झाल्यानंतर रक्ताचे नाते असलेले आप्तही स्विकारत नाहीत, अशांना ग्रॅहम स्टुअर्ट स्टेन्सचा मोलाचा आधार होता. सडलेल्या आणि प्रसंगी जखमांमध्ये आळ्या झालेल्या रोग्यांनाही ग्रॅहम स्टुअर्ट स्टेन्सने आधार दिला. मात्र, पैशाचे आणि रुग्णसेवेचे आमिष दाखवून स्टेन्स लोकांचे धर्म परिवर्तन करतो, असा गळा स्थानिक प्रसारमाध्यमांनी काढला होता. त्यामुळे साहजिकच आरएसएसचे भावंड असणार्या बजरंग दलाला स्टेन्सची चाललेली समाजसेवा बघवत नव्हती. 22 जानेवारी 1999 साली बजरंग दलाचा स्थानिक नेता दारासिंग आणि त्याच्या साथीदारांनी मयुरभंज जिल्ह्यातील मनोहरपूर गावात मध्यरात्री स्टेन्स आणि त्याच्या दोन लहान मुलांना जिवंत जाळण्यात आले. गेली 35 वर्षे ओडिसाच्या आदिवासी बहुल भागात समाजसेवा करणार्या मिशिनरी नव्हेतर व्हिजनरी व्यक्तीला जिवंत जाळण्यात आले. देशात भाजपची सत्ता होती. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. घटना घडल्यानंतर दोन दिवसानंतर दिल्लीश्वरांना मनोहरपूर गावात घडलेल्या हत्त्याकांडाची माहिती मिळाली. देशभरासह आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याची गंभीर दखल घेतली. ऑस्ट्रेलियानेही हे प्रकरण लावून धरल्यानंतर या घटनेचा तपास देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा असणार्या सीबीआयकडे देण्यात आला. नंतर या हत्त्याकांडासाठी स्वतंत्र वाधवा आयोगाची निर्मिती करण्यात आली. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात या हत्त्याकांडाचा खटला चालला. यातील मुख्य आरोपी दारासिंह याला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र यानंतर शेवटी त्याला आजन्म कारावास (जन्मठेप) शिक्षा कायम केली. गेल्या महिन्यात ‘द लिस्ट ऑफ धीस; द ग्रॅहेम स्टेन्स स्टोरी’ नावाचा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. भारतातील किती लोकांनी हा चित्रपट पाहिला असेल, हा खरेतर संशोधनाचा विषय असेल. मात्र, या चित्रपटाच्या माध्यमातून ग्रॅहेम स्टेन्सच्या आतापर्यंत न उलगडलेल्या गोष्टी या चित्रपटाचा दिग्दर्शक अनिष डॅनियल या भारतीय दिग्दर्शकाने केला आहे. हॉलिवूडमधील ऍण्ड्र्यू ई. मॅथ्युज याने या चित्रपटाची कथा लिहिली असून हॉलिवूडमधील प्रसिद्ध अशा स्टिफन बाल्डविन याने ग्रॅहेम स्टेन्सची भूमिका साकारलेली आहे, तर शोध पत्रकार या काल्पनिक पात्राची भूमिका शर्मन जोशी याने केलेली आहे. शर्मन जोशी हा स्थानिक दैनिक ‘न्यू ओडिसा’ या इंग्रजी वृत्तपत्राचा शोध पत्रकार म्हणून ओडिसाच्या मयुरभंज, कीयोंझर जिल्ह्यात ग्रॅहम स्टेन्सकडून जबरदस्तीने चाललेल्या कथित धर्मपरिवर्तनाच्या स्टोरीसाठी मागावर असतो. ग्रॅहेम स्टेन्सच्या दवाखाना वजा कार्यालयापासून कियोंझर जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यापर्यंत हा पत्रकार त्याची माहिती काढतो. परंतू शेवटी हाती काही लागत नाही. तोपर्यंत उशिर झालेला असतो. स्थानिक माध्यमांनी भडकवल्यामुळेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात विष कालवले गेले, याची जबर किंमत ग्रॅहेम स्टेन्सला त्याच्या आणि त्याच्या दोन मुलांच्या मृत्यूने चुकवावी लागली. 35 वर्षांमध्ये ग्रॅहेम स्टेन्सने धर्मांतरे घडवून आणली की नाही, हे निश्चितपणे सांगता येणार नाही, पण त्याने निश्चितच कुष्ठ आणि महारोग्यांची माणूस म्हणून सेवा केली, याची किंमत निश्चितपणे करता येणार नाही. माणूस हा माणूस म्हणूनच जगला पाहिजे. ग्रॅहेम स्टेन्सने मानवाचे माणसात धर्मांतर केले, असे निरीक्षण या हत्त्याकांडावर नेमलेल्या आयोगाचे अध्यक्ष जस्टीस वाधवा यांनी केले आहे. त्यामुळे याबद्दल वेगळे काही सांगण्याची गरज नाही. पती आणि दोन मुलांची हत्त्या होवूनसुद्धा ग्रॅहेम स्टेन्स यांची पत्नी ग्लॅडिज स्टेन्स हिने आपली समाजसेवा बंद केली नाही, ती चालूच ठेवली. पतीचे आणि आपल्या दोन लहान मुलांचे दु:ख पोटात घालून तिने ग्रॅहेम स्टेन्सचे व्हिजनरी काम सुरुच ठेवले. याची दखल घेवून भारत सरकारने तिला 2005 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. मात्र या पुरस्कारालासुद्धा ओडिसामधील बजरंग दलाने विरोध केला होता.
मध्यंतरी मराठी वृत्तपत्रात मानाचे स्थान असलेल्या दैनिकामध्ये ‘असंतांचे संत’ नावाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. मोठ्या गदारोळानंतर हा अग्रलेख पाठिमागे घेण्यात आला (फक्त ऑनलाईन पोर्टलवरील). कारण छापील लाखो प्रती वितरीत झाल्या होत्या. त्या पाठिमागे कशा घेणार? शेवटी बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करावी लागली. ब्रिटीश, डच, पोतुर्गिज यांनी भारतात वसाहती स्थापन केल्यानंतर रोममधील रोमन कॅथलिक चर्च (व्हेटिकन सिटीच्या) आदेशाने भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मिशिनरींची स्थापना करण्यात आली. आदिवासी, दलित, अस्पृश्य लोकांना टार्गेट ठेवून धर्मांतरे झाली, हे मान्य करावे लागेल. परंतू दीडशे वर्षाच्या कालखंडामध्ये साम-दाम- दंड भेद वापरुन संपूर्ण भारतच व्हेटिकन सिटीच्या छत्रछायेखाली आणने, ब्रिटीशांसाठी अवघड बाब नव्हती. वैदिक व धार्मिक कर्मकांडांमध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. एका विशिष्ट माणसाची सावली पडली तर विटाळच समजला जायचा. नेमके हेच हेरुन मिशिनरीज नी आपले काम सुरु केले होते. धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून कार्य करीत असेल तर धर्मप्रसार मोठ्या प्रमाणात होतो, हे सम्राट अशोकांच्या काळापासून हा समाज पाहत आलेला आहे. मग जबरदस्तीने धर्मांतरण घडवून आणने ही ब्रिटीशांसाठी अवघड बाब नव्हती. तरीही ब्रिटीशांच्या अधिपत्त्याखाली मिशिनरीजने समाजसेवेचे धोरण अवलंबून भारतात मोठ्या प्रमाणावर शोषित, वंचित आणि पीडितांची सेवा केली, हेही मान्य करावे लागेल.
शेवटी 'जो करेगा सेवा, वोही खायेगा मेवा'. मदर तेरेसा यांची समाजसेवा वादातित आहे. व्हेटिकन सिटीनेही त्यांना संतपद बहाल केले. हल्ली देशाच्या गल्लीबोळात साधू, संत, साध्वी, मौलवी, पाष्टर यांची रेलचेल आहे. मात्र अशा युगातही व्हेटिकन सिटीने मदर तेरेसा यांना संतपद बहाल करणे, ही काय छोटी गोष्ट नाही. मात्र सूर्यावर थुंकणारेही गावाच्या चौका-चौकात सापडतात. त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ती काय करायची? आप्तांना जखम झाल्यानंतरही स्वकीय ढुंकून पाहत नाहीत. असे असताना मदर तेरेसा व ग्रॅहेम स्टेन्स यांनी सडलेल्या जखमांमध्ये आळ्या वळवळत असतानाही त्या जखमा साफ केल्या. त्या रुग्णांना मायेचा घास भरवू पाहिला. मग त्यांचे चुकले ते काय? माणसाची सावली पडली तरी विटाळ मानणारा हा समाज माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी परवानगी देत नाही. त्या धर्माचे स्तोम माजवणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वश्रेष्ठ की मदर तेरेसा व ग्रॅहेम स्टेन्स? याबाबत खरेतर मंथन व्हायला हवे. दुर्दैवाने हे होत नाही. भारतासारख्या सार्वभौम, सहिष्णु देशामध्ये सर्वकाही आलबेल आहे, असे म्हटले जाते. मात्र निश्चितच याचे खंडण करावे लागेल. अंगावर भगवी वस्त्रे परिधान करुन आणि गुहेत बसून सामान्य लोकांची सेवा करता येत नाही, त्यासाठी लोकांतच मिसळावे लागते. लोकांमध्ये मिसळून माणसाला माणूस म्हणून जगता यावे, यासाठी गॅ्रहेम स्टेन्स आयुष्यभर झटला. लोकांचे दु:ख हे माझे दु:ख, असे म्हणत त्याने कुष्ठरोग्यांच्या चेहर्यावर हास्य फुलवले. परंतू खोट्या प्रतिष्ठेसाठी धर्ममार्तंडांच्या रोषाला गॅ्रहेम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांना सामोरे जावून आपल्या जिवाची किंमत मोजावी लागली. त्यामुळे धर्माभिमानी मोदी आणि 'व्हिजनरी' गॅ्रहेम स्टेन्स यांच्यामध्ये निश्चितच फरक आहे. हा फरक ज्याने-त्याने ओळखायला हवा. मिशिनरी हा शब्द काही लोकांनी बदनाम केला, परंतू बदनामीच्या पलिकडे जावूनही गॅ्रहेम स्टेन्स आणि मदर तेरेसा यांनी भारतात 'व्हिजनरी' असे काम केलेले आहे, हे निश्चितच कोणीही नाकारु शकत नाही, हे शाश्वत सत्त्य आहे.
- संग्राम निकाळजे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |