05:29pm | Apr 09, 2019 |
सातारा : पाटबंधारे विभागाकडून उरमोडी धरणातून नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या आवर्तनात बदल होत असल्याने नदीवरील बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे ऐन कडक उन्हाळ्यात सातारा तालुक्यातील उरमोडी नदीकाठच्या अनेक गावाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणी पातळी घटली आहे. असे पाण्याचे विदारक चित्र निर्माण झाले असतानाही लोकप्रतिनिधी मात्र निवडणूकीच्या प्रचारात दंग झाले आहेत. त्यामुळे उरमोडी नदी काठच्या नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.
सातारा तालुक्याच्या पश्चिमेस परळी खोऱ्यातून वाहत असलेल्या उरमोडी नदीवर परळी येथे धरण बांधण्यात आले आहे.तसेच अनेक ठिकाणी या नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचे अनेक बंधारेही बांधण्यात आले आहेत.या धरणामुळे व बंधाऱ्यांमुळे काही महिने वाहणारी ही नदी आता बारमाही वाहत आहे. या नदीच्या पाण्यावरच सातारा शहरासह तालुक्यातील अनेक गावाची पिण्याच्या पाण्याच्या उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित आहेत. तसेच या नदीपात्रातून शेतीसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असतो.यामुळे हा परिसर कायम बागायत म्हणून ओळखला जात असून अनेक गावांच्या ऐन उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली होती. मात्र बदलत्या काळानुसार व वाढत्या लोकसंख्येमुळे या नदीपात्रातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. त्यामुळे येथील बंधारे लवकरच कोरडे ठणठणीत पडत आहेत. त्यातच धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या आवर्तनात मोठा फरक पडत आहे. त्यामुळे या नदीपात्रात असणाऱ्या अनेक पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींची कोरड्या पडत असल्याने ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीलाच या परिसरातील जनतेवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येऊ देऊ नका असे,संतप्त नागरीकांनी बोलताना सांगितले.
दरम्यान सातारा तालुक्यातील नागठाणे हे राजकीय दृष्टीने महत्वपूर्ण मानले जाते. तसेच बाजारपेठेचे गाव असून या गावाची लोकसंख्या सुमारे २० हजाराच्या आसपास आहे. या गावचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी उरमोडी नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे. यातून काही दिवस पाणी साचवून ठेवतो. पण तोही आत्ता गाळाने पूर्ण भरला असून या बंधाऱ्याच्या वर नदी पात्रातील गाळ काढणे गरजेचे आहे. या गाळ काढण्याचा परवानगीचा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे. मात्र तो मंजूर झाला नाही. लोकप्रतिनिधी वेळीच लक्ष दिले असते तर आज ही वेळ ओढवली नसती, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |