06:49pm | Oct 25, 2018 |
सातारा : सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर उतरणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी किती माणुसकी शून्य वागतात?याचे उदाहरण साताऱ्यात पाहण्यास मिळाले. तीन महिन्यांच्या चिमुकल्या सह पती-पत्नीने इशारा देऊन भर उन्हात उपोषण सुरू केले, पण, जिल्हा प्रशासनाला साधा पाझर फुटला नाही. पत्रकारांनीच पुढाकार घेतल्यानंतर अखेर आश्वसनाचे गाजर हाती लागले.
याबाबत माहिती अशी की, लोणंद ता खंडाळा जि सातारा या नगरपंचायतीच्या प्रभाग क्र दहा मध्ये गटार व घाण साफ केली जात नाही. त्यामुळे येथील करदात्यांना साथीचे रोग व अस्वच्छता याचा नेहमी समान करावा लागत आहे. याबाबत वारंवार लोणंद ग्रामपंचायती कडे तोंडी व लेखी तक्रार करून दाद मागितली. त्याची कोणीही दखल घेतली नाही. अखेर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि 22 ऑक्टोबर रोजी तीन महिन्यांच्या बाळा समवेत उपोषणाला बसू असे निवेदन दिले होते. पण, सातारा जिल्हा प्रशासनाला साधी आंदोलकांना भेटावे वाटले नाही. जिल्हाधिकारी महिला असल्याने त्यांना भेटण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घेतला, पण, महिला स्वीय सहाय्यक यांनी सुद्धा भेटण्यासाठी हरकत घेतली. माणुसकी हरवलेल्या त्या कार्यालयाच्या अभिप्रायाबद्दल ठेवण्यात आलेल्या रोकड फाईली (निधी मंजुरी)सुद्धा गहिवरून गेल्या. असेच चित्र दिसू लागले.
अखेर दुपारच्या वाढत्या उन्हात आंदोलक सौ प्रणाली व त्यांचे पती सागर खरात आणि तीन महिन्यांच्या चिमुकल्या साठी माणुसकी जपणारे सातारचे अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी भ्रमणध्वनी वरून पत्रकारांचा निरोप मिळताच तातडीने आंदोलकांची भेट घेतली. स्वतः नगर परिषेदेचे कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलावून सूचना केली. तसे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. तोपर्यंत पाच तास भर उन्हात चिमुकल्यांनी ही प्रशासनाने दिलेल्या वागणुकीचा अनुभव घेतला.त्यानंतर आंदोलकांना दिलासा मिळाला. यावेळी पाठपुरावा करणारे पत्रकार अजित जगताप, सम्राट गायकवाड, पूजा कदम, आर डी भोसले, आर पी आय सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड,रिपब्लिकन ब्ल्यू फॉर्स पक्ष प्रमुख बाबा ओव्हाळ यांनी जिल्हातील प्रश्नांच्या बाबत जिल्हा प्रशासन उदासीन झाल्याचा आरोप केला. सामान्य लोक न्याय मागणीसाठी आंदोलन करतात पण, त्यांना न्याय मिळत नाही. अशी लोकभावना झाली आहे. याचा सरकारने विचार करावा अन्यथा शासकीय कार्यालयाकडे कोणीही फिरकणार नाही, त्याऐवजी खाजगी एजन्सी मार्फत सामान्यांना न्याय मागावा लागेल अशी अंधुक स्थिती झाल्याचा आरोप अनेक आंदोलकांनी केला आहे. खर म्हणजे हा लोकप्रतिनिधींचा नैतिक पराभव असून त्यांची सुद्धा कामे होत नसल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.जिल्हा प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी लोकपाल आणला पाहिजे या मागणीचा पुनरुच्चार केला जाऊ लागला आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |