09:11pm | Mar 30, 2019 |
सातारा : तुम्हाला अहंकाराने पछाडले आहे. इतका अहंकार बरा नाही. ज्या लोकशाहीच्या बळावर या देशाची तुम्ही सत्ता मिळवली, त्याच देशातील लोकशाहीचा गळा घोटून तुम्ही हुकूमशाही लादली आहे. ज्या तळागाळातील लोकांबद्दल तळमळीने तुम्ही बोलत होता, त्याच तळागाळातील लोकांना जास्तीजास्त गाळात घालण्याचे काम तुम्ही या पाच वर्षांत केले आहे. उद्याच्या निवडणूकीत तेच लोक एक विचाराने, एकजुटीने तुम्हांला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा खणखणीत इशारा श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केंद्रातील सरकारला दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांचे सातारा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ वाई औद्योगिक वसाहतीत झालेल्या बुथ कमिटी सदस्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, सारंग पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पिसाळ, सुनील काटकर, प्रतापराव पवार, बाळासाहेब भिलारे, नितीनकाका पाटील, दत्तानाना ढमाळ आदी प्रमुख उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला करताना उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘लोकशाहीतील राजांची दिशाभूल करुन सत्तेवर आलेल्या केंद्रातील सरकारने जनतेच्या हितविरोधी निर्णय घेतले. १५ लाख रुपये बँकेत टाकणार होते. ते तर लांबच राहिले. पण नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन लोकांनी आयुष्यभर कष्टाने जमवलेली पुंजी त्यांनी हिस्सकावून घेतली. जीएसटीसारख्या करामुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाले. शेतकऱ्यांच्या कधी नव्हे एवढ्या संख्येने आत्महत्या या पाच वर्षांत झाल्या. महात्मा गांधींनी पंचायत राजची संकल्पना मांडली होती. सत्तेचे विक्रेंद्रीकरण होत नाही. सत्तास्थाने सामान्य माणसांच्या हातात जात नाहीत, तोपर्यंत या देशात लोकशाही नांदणार नाही, अशी त्यांची धारणा होती. या सर्वाला तिलांजली देण्याचे काम या सरकारने केले. ज्या लोकशाहीतील राजांनी त्यांना सर्वोच्च सभागृहात विराजमान केले. त्याच सत्तेवरील लोकप्रतिनिधींना लोकशाहीचा विसर पडला आहे. अहंकार निर्माण झाला, सत्तेचे केंद्रीकरण झाले. त्यामुळे या देशात नावापुरती लोकशाही असून त्या नावाखाली हुकूमशाही लादली आहे. त्यामुळे आजच्या निवडणूकीकडे निवडणूक म्हणून न पाहता लोकशाही पुन्हा अस्तित्वात आणण्याकरिता एक चळवळ म्हणून पहावे.’’
ईस्ट इंडीया कंपनीच्या माध्यमातून या देशाला इंग्रजांनी गुलाम करुन ठेवले. त्यांनी आपली मानसिकता बदलून टाकली. नेमकं गेल्या पाच वर्षांत लोकांची मानसिकता बदलण्याचे काम आणि पाप या सरकारने केले. ईस्ट इंडिया कंपनीच्या धर्तीवर होती. बिझनेस इंडीया कंपनी स्थापन्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यांना आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे. लोकशाहीतील राजा सूज्ञ आहे. उद्याच्या निवडणूकीत तो सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. सत्तापरिवर्तनाची ही चळवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर पसरल्याशिवाय राहणार नाही. सरकारचे चुकीचे निर्णय बदलण्यासाठी सरकार बदलावे लागेल. आणि या चळवळीच्या माध्यमातून येथील जनता हा बदल केल्याशिवाय राहणार नाही’’ असा विश्वासही उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
मकरंद पाटील म्हणाले, ‘‘सर्व कार्यकर्त्यांनी गावपातळीवर सर्वसामान्य घटकापर्यंत पोहचून या निवणूकीचे काम करावे लागणार आहे. प्रत्येकाने आपल्या मतदार संघाची जबाबदारी सांभाळायची आहे. सतर्क राहून आपल्याला या निवडणूकीत काम करायचे आहे.’’मनोज पवार, उदयराज कबूले, राजेंद्र राजपुरे, बाबूदादा सपकाळ, मोहनराव जाधव, अनिलआबा जगताप, राजेंद्र तांबे, सचिन शेळके, रमेश गायकवाड, प्रमोद शिंदे, विजयसिंह नायकवडी आदी उपस्थित होते.
मी म्हणजेच जिल्ह्यातील जनता
आज मी तुमच्या समोर केवळ उदनराजे म्हणून उभा नाही. मी म्हणजेच मकरंदआबा, मी म्हणजेच माझे लाडके बंधूराज शिवेंद्रराजे आहेत. मी म्हणजेच सत्यजितसिंह पाटणकर, मी म्हणजेच बाळासाहेब पाटील, मी म्हणजेच शशिकांत शिंदे, मी म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण, मी म्हणजेच सारंग पाटील आहे आणि मी म्हणजेच ही सातारा जिल्ह्यातील जनता म्हनजेच लोकशाहीतील राजे आहेत. काल मी तुमचा होतो, आजही आहे आणि भविष्यातही तुमचाच राहीन, असा शब्द उदयनराजेंनी दिला. टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी त्यांच्या या वक्तव्याला दाद दिली.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |