10:58pm | May 08, 2018 |
सातारा : सध्या दलितांवर होणार्या वाढत्या अन्यायाबाबत देशभर चिंता व्यक्त करीत असताना स्वत:ची प्रतिमा उजळविण्यासाठी भाजप नेते उत्तर प्रदेश, बिहारमध्ये दलितांच्या घरी स्वत:चे जेवण घेवून जात आहेत. त्यामुळे भाजपला दलितांची घरे ‘पंचतारांकित’ हॉटेल वाटत आहेत. शेतात बसून घरची भाजी-भाकरी जशी खातात तसे भाजपचे नेते दलितांच्या घरात करीत आहेत, अशी खरमरीत टिका भारीपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
सातारा येथे 20 मे रोजी पंढरपूर येथे होणार्या धनगर जाहिर मेळाव्यानिमित्त माहिती देताना ते बोलत होते. 33 समाजाचे प्रतिनिधी आरक्षणासाठी पंढरपूर याठिकाणी एकत्रित येणार आहेत. मराठा समाजालाही आरक्षण देणे हे राज्यकर्त्यांना मान्यच करावे लागणार आहे. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. ब्रिटीश काळात मद्रासमध्ये कायस्थ ब्राम्हणांना आरक्षण होते, मात्र उत्तरेत नव्हते. भाजप व आरएसएसचा आरक्षण तत्वालाच विरोध आहे. 1992 साली मंडल आयोगाला विरोध करून जातीय आरक्षण रद्द करा, सविंधान बदला अशी हाक दिली होती. सध्या भाजप सरकार राजकीय अस्थिरता आणत असून काँग्रेसचा त्यांना पाठींबा आहे असाही त्यांनी आरोप केला. संभाजी भिडे गुरूंजीबाबत वक्तव्य करताना अॅड. आंबेडकर यांनी सांगीतले, राज्य सरकारने तपास अधिकार्यांना फासावर चढवू नये. याबाबत जर कोणी न्यायालयात गेले तर पहिला तपास अधिकार्याचा पहिला बळी जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भिडे यांची अटक थांबवली आहे. धनगर व लिंगायत समाजामध्ये भांडण लावण्याची निती राज्यकर्त्यांनी आखली आहे. सोलापूर येथील अहिल्याबाई होळकर विद्यापिठ असे नाव देण्याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीच जातीय दंगली होतील असे वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. त्यांनी अहिल्यादेवीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील आलुतेदार व बलुतेदार यांची मोट बांधून राज्यात सत्ता आणायची आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून नवक्रांती झाली असून अनेक जाती-जमातीचे लोक एकमेकांच्या संर्पकात आलेले आहेत. माझ्यावर नक्षलवाद्यांशी संबध असल्याचा आरोप केला जातो. पण त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांनी त्याचा शोध घ्यावा. मी किती दिवस जंगलात राहिलो? प्रशिक्षण घेतले याचा सरकारने तपास करावा. नाना पाटोले यांनी नरेंद्र मोदींना यांना आवाहन देवून भाजपमधून बाहेर पडले. पण अध्यापही काँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहिर केली नाही. ही शोकांतिका आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्ते ‘हेल्पलेस’ झाले आहेत. इव्हीएम मशिनबाबत जुनपासून आंदोलन सुरू करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परीषदेला अॅड. विजय मोरे, अमोल पांढरे, मारूती जानकर, तानाजी शिंदे यांची उपस्थिती होती.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |