नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या हातमिळवणीतून स्थापन होणाऱ्या संभाव्य महाशिवआघाडी सरकारमध्ये पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष उत्सुक नाही. सरकारच्या स्थैर्यासाठी काँग्रेसचा सहभाग आवश्यक असल्याचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असून त्यासाठी गरज पडल्यास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी बोलण्याची दोन्ही पक्षांच्या नेत्यांची तयारी आहे.
काँग्रेसचा सरकारमधील सहभाग सर्वांसाठीच उपयुक्त ठरेल, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते. संभाव्य महाशिवआघाडी सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा काँग्रेसच्याही अनेक आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसचा सत्तेतील सहभाग निश्चित वाटत आहे. मात्र, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपदात स्वारस्य नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद विभागून घेणार असले तरी काँग्रेस पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपदावर दावा करणार नसल्याचे समजते. उपमुख्यमंत्री कोणाला करायचे यावरून काँग्रेसमध्ये विनाकारण कलह वाढेल, असे मत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद हवे असल्याचे म्हटले जात आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये अजून प्राथमिक चर्चाच सुरू असून सत्तेच्या पदांसाठी वाटाघाटी होतील तेव्हा या विषयाला हात घालता येईल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. तिन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी १४ मंत्रीपदे येतील अशी अपेक्षा असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस जास्तीत जास्त मंत्रीपदे मिळवण्यासाठी आग्रही असेल, असे म्हटले जात आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |