सातारा : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा धोका अधोरेखित होत असताना सातारा जिल्ह्यात रविवार दि. 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजल्यापासून जनता कर्फ्यू नियमाचे पालन करण्यात आले. पण आज कालच्या गांभीर्याचे विसर्जन झाल्याचे चित्र शहरी व ग्रामीण भागात दिसून आले आहे. अनेकांनी काल सायंकाळी थाळीनाद करुन रस्त्यावरच फेरफटका मारला. यामध्ये राजकीय समर्थकांची संख्या लक्षणीय होती.
देश संकटात असताना जनतेने सहकार्य करावे, हे अपेक्षित असते. ही अपेक्षा काहीप्रमाणात जनता कर्फ्यूच्या निमित्ताने पूर्ण झाली असली तरी काही बेशिस्त युवापिढी आणि वाहनधारकांच्यामुळे सातारा पुन्हा एकदा चर्चेत येवू लागला आहे. अनेक ठिकाणी बॅरिकेटस् कमी पडत असून पोलिसांशी हुज्जत घालण्यातच अनेकांना शौर्य वाटत आहे. त्यामुळे कोरोना नको, पण मोकाटांना आवरा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनातून येणार्या काहींनी तर चक्क खोटे सांगून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला. जिवनावश्यक वस्तूंच्या खरेदीचे कारण सांगून बाहेर पडणार्यांकडे पिशवी किंवा पुरेसे पैसे नसल्याचेही आढळून आले आहे. शहर परिसरात मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा असल्याचे सांगून काही मेडिकल दुकानदारांकडून चढ्या भावाने वैद्यकीय वस्तू विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावर पायबंद घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कालच सातारकरांचे आभार मानले होते. पण आज काहींच्या आततायीपणामुळे सातारा शहरातील 144 कलम हे नुसते दिखाव्यासाठी आहे, असा समज काहींनी करुन घेतला आहे. यामध्ये फायनान्स कंपन्यांच्या काही रेपो बॉयज्चा समावेश सर्वाधिक आहे. त्यांनी जास्तीतजास्त रक्कम वसूल करुन आणावी, असे टार्गेट देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थकबाकीदार, कर्जदार घरीच सापडतील, असे समजून हे रेपो बॉयज् घराचे दरवाजे ठोठावत आहेत. त्यांच्याकडे कोणतेही गांभीर्य नाही. बँका व फायनान्स यांना 144 कलमातून वगळले आहे. यामध्ये लोकांना आपल्या खात्यातील पैसे काढण्यास पुरेसा वेळ मिळावा, हा हेतू आहे. त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने पत्रक काढून खाजगी फायनान्स कंपन्यांवर आळा बसवावा, अशीही मागणी पुढे आली आहे.
बेशिस्त सातारकरांना आवर घालण्यासाठी सातारा पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. यातून काहींनी गल्लीबोळातून शॉर्टकट काढल्यामुळे अरुंद रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्यापद्धतीने नो पार्किंगचा दंड आकारला जातो, तशाच पद्धतीने विनाकारण फेरफटका मारणार्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा वाहतूक पोलिसांनी उगारावा, असे आता शांतताप्रिय सातारकरांना वाटत आहे. काल सोशल मीडियामध्ये शिस्तीचे पालन करुन राष्ट्रीय कर्तव्य बजावणारे वगळता ज्यांनी गर्दी केली आहे, त्यांना आता नागरिकांनीच जाब विचारावा. कारण प्रत्येक गोष्ट जिल्हा प्रशासन व पोलीस करु शकत नाहीत. स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते समजणार्यांनी प्रसिद्धीसाठी फवारणी करण्यापेक्षा अतीउत्साही कार्यकर्त्यांना रोखण्यास मदत करावी किंवा त्याची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |