कराड : देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत कॉंग्रेस व शिवसेना या पक्षांच्या नेत्यांना एकत्र घेऊन किमान समान कार्यक्रम निश्चित केला असून महाराष्ट्र राज्यात स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सलग पाच वर्षे टिकणारच, असा विश्वास माजी सहकार मंत्री प्राध्यापक डॉ. एन.डी पाटील यांनी व्यक्त केला.
ते नांदगाव (ता.सातारा) येथे विविध विकास कार्यक्रमाचे उद्घाटन व भूमिपूजन, महराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री माननीय नामदार बाळासाहेब पाटील व सह्यादी साखर कारखान्राच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळस्कर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील अजिंक्यतारा कारखान्याचे माजी चेअरमन रामभाऊ जगदाळे व नांदगावचे उद्योगपती प्रतापराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.एन डी पाटील पूढे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन शंभर दिवस झाले असतानाच शेतकर्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे थकीत कर्जमाफी व नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन दिलासा दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार असे अभिवचन मी देत आहे.
केंद्रातील सरकार जातिभेद करून गरज नसताना माणसामाणसात दुही निर्माण करून संघर्ष करण्यास भाग पाडत आहे. यापूर्वी फक्त त्यांनी विकासकामाच्या घोषणा केल्या, पूर्वीच्या राज्य सरकारने कर्ज माफीची केलेली घोषणा केवळ पोकळ ठरली, कारण कर्जमाफीच्या जाचक अटी, दुष्काळी परिस्थिती हे अस्मानी संकट व कागदपत्रे सुलतानी संकट म्हणून शेतकर्यांना हैराण केले होते. त्यांच्या काळात एकही दिवस असा गेला नाही की शेतकर्यांनी आत्महत्या केली नाही हे आपण रोजच्या वर्तमानपत्यात वाचले आहे. रा सर्व गोष्टींच्या पूर्वानुभवाचा विचार करून आघाडी सरकारने शेतकर्यांना सोयीस्कर होईल असा निर्णय घेतला आहे. याकरिता कोणाला रांगेत उभे राहावे लागणार नाही. नोटबंदीत झालेल्या त्रासाची आपणास जाणीव आहे याकरिता आपणास नम्र विनंती करतो की, शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येणार्या लोकांच्या पाठीमागे ठामपणे उभे रहावे असे सांगून नामदार बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखाना उत्तमरितीने चालवला आहे व गेली चार टर्म भागातील विकास कामे केल्याने महाविकास आघाडी सरकारने नामदार बाळासाहेब पाटील यांना सहकार व पणन मंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी ते उत्तमरित्या पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतकर्यांच्या अनेक प्रश्नांबाबत मी केलेल्या आंदोलनामध्ये आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांचे नेहमीच सहकार्य होते, त्यांचाच वारसा जोपासत नामदार बाळासाहेब पाटील यांनी संघटनेला सहकार्य करून शेतकर्यांची कोट्यावधी रूपयांची बीजबिले माफ करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. महाविकास आघाडीने पर्यायाने शरद पवारसाहेब यांनी टाकेलेली जबाबदारी नामदार बाळासाहेब पाटील निरपेक्षपणे पार पाडतील अशी आशा व्यक्त करून प्रा.एन डी पाटील यांनी ना. बाळासाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
ना. बाळासाहेब पाटील म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर माझ्यावरच्या मंत्र्याची जबाबदारी आल्यानंतर शेतकर्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचा मी प्रयत्न चालू केला आहे. कापूस एकाधिकार खरेदी योजना, कांदा, तूर, हरभरा खरेदी योजनेचा अभ्रास करून जास्तीत जास्त दाम देण्याचा माझा प्रयत्न आहे हे यापूर्वी कायखान्यात जास्तीत जास्त दर दिला आहे. शेतकर्यांना कर्जमुक्त व चिंतामुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले या नावाने कर्ज मुक्ती योजना जाहीर केली. कर्जमाफी योजनेमध्ये राज्यांमध्ये जवळपास 34 लाख खातेदार असून अंदाजे 21 हजार कोटी रूपये रक्कम त्यासाठी लागणार आहे. सातारा जिल्हयामध्ये आत्तापर्यंत 63943 खातेदारांची माहीती अपलोड झाली असून 48700 खातेदारांचे आधार प्रामाणिकरण झाले आहे. यामधे अंदाजे 229 काटी रूपये रक्कम लागणार आहे.
यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब सोळस्कर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, दत्ता ढाणे, संजय कुंभार मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन आशुतोष निकम यांनी केले व आभार अनिल देशमुख यांनी मानले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |