07:08pm | Jul 05, 2018 |
सातारा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी येथून उद्या प्रस्थान होणार आहे. राज्य व देशभरातून वैष्णवांच्या या मेळ्यामध्ये लाखो वारकरी सहभागी होणार आहेत. राज्यभरातील अनेक दिंड्या आळंदीमध्ये पोहोचलेल्या आहेत. उद्या सायंकाळी 4 वाजता माऊलींच्या पालखीचे प्रस्थान पुणेच्या दिशेने होणार आहे. यानिमित्ताने पुणे जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा कमालीची ऍलर्ट झाली आहे. हा सोहळा व्यवस्थित व सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन व पुणे शहर व ग्रामीण पोलिसांनी सुरक्षेच्यादृष्टिने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. पुणे जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत आषाढी वारी 2018 हे मोबाईल ऍप तयार केले असून वारकर्यांना याद्वारे पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची लाईव्ह सुविधा मिळणार आहे. तसेच वारीमार्गात पालख्या व दिंड्या नेमक्या कोठे आहेत, तसेच हरविलेल्या व्यक्तींबाबतही या ऍपद्वारे माहिती दिली जाणार आहे. पुणे जिल्हा प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले आहे. मात्र माऊलींच्या पालखीचे तब्बल चार दिवस सातारा जिल्ह्यात मुक्काम असूनही सातारा जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्हा प्रशासनाच्या धर्तीवर कोणत्याही प्रकारचे ऍप किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुविधा उपलब्ध करुन न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यातील आरफळ येथील संत हैबतबाबांनी आषाढी वारीची परंपरा सुरु केली होती. गेली शेकडो वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे. आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण बरड, माळशिरस, वाखरी, पंढरपूर असा तिन जिल्ह्यातील मुख्य शहरांमधून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जात असते. शेकडो वर्षांमध्ये कदाचितच एखादी दुर्घटना या मेळ्यामध्ये घडली असावी. परंतू वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये स्वयंशिस्त पाळली जाते. त्या-त्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडून पालखीबरोबर आलेल्या वारकर्यांना मुलभूत सुविधा पुरविल्या जात असतात. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस दलाकडून सजगता आणि दक्षता पाळली जाते. पुणे जिल्हा प्रशासनाने आषाढी वारी 2018 हे मोबाईल ऍप्लिकेशन तयार करुन एक पाऊल पुढे टाकलेले आहे. या ऍपद्वारे विठ्ठल भक्तांना पंढरपूरच्या विठोबाचे लाईव्ह दर्शन घेता येणार आहे. तसेच वारीमार्गात पालख्या व दिंड्या नेमक्या कोठे आहेत, तसेच हरविलेल्या व्यक्तींबाबतही या ऍपद्वारे माहिती दिली जाणार आहे. या मोबाईल ऍपचा लाखो वारकर्यांना फायदा मिळणार आहे. आजच्या घडीला प्रत्येक वारकर्याकडे मोबाईल फोन असतोच. त्यामुळे या मोबाईल ऍपचा फायदा प्रत्येक वारकर्याला मिळणार आहे. वास्तविक सातारा जिल्हा प्रशासनानेही अशा प्रकारचे अभिनव ऍप्लिकेशन तयार करुन हमी भी कुछ कम नहीं, हे दाखवून द्यायला हवे होते. मात्र सातारा जिल्हा प्रशासनाचे अनेक अधिकारी सध्या मान्सूनमधील थंडगार वातावरणाचा आस्वाद घेत आहेत. नको त्या माहित्या आपल्या फेसबुक वॉलवर टाकून आपली अक्कल पाजळत आहेत. पालखी मार्गाच्या स्थळांची पाहणी करुन जिल्हा प्रशासन फक्त फार्स करीत आहे. जिल्हा प्रशासनिक अधिकारी पालखी बाबत गंभीर नाहीत. अनेक अधिकारी कास, बामणोली, पाचगणी, महाबळेश्वर येथील निसर्गाचा आनंद घेण्यात व्यस्त आहेत. अधिकार्यांच्या फेसबुक व सोशल मिडियावरील शेरोशायरीमुळे ते जाणवत आहे. त्यामुळे पुणे जिल्हा प्रशासनाच्या पालखी सोहळ्याच्या तयारीपुढे सातारा जिल्हा प्रशासनाची पाटी कोरीच असल्याची टीका सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केली आहे.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |