08:18pm | Jun 26, 2019 |
सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे 2 ते 5 जुलै दरम्यान जिल्ह्यातून मार्गक्रमण होणार आहे. यासाठी योग्य नियोजन राहावे व या कालावधीत कोणताही अपघात किंवा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सर्व विभागांनी दक्ष राहून कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केल्या.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे 2 ते 5 जुलै दरम्यान जिल्ह्यातून मार्गक्रमण होणार आहे. याबाबतच्या तयारीसाठी आढावा बैठक आज तहसील कार्यालय फलटण येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल बोलत होत्या. या बैठकीला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांताधिकारी संगिता चौगुले, संतोष जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी फिडींग पॉंईटची सोय करण्यात आली आहे, तिथली पाणी भरण्याची व वितरणाची व्यवस्था पुन्हा एकदा तपासणे गरजेचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, पालखी मार्गावरील रस्त्यांच्या साईड पट्या भरुन घेतल्या आहेत. फलटण ते बरड हा रस्ताही दुरुस्त केला आहे. कुठे अजून खड्डे बुजवले नसतील तर ते तात्काळ बुजवा. बरड कडे जायच्या रस्त्यावरील तुटलेले रेलींग येत्या दोन दिवसात दुरुस्त करा. तसेच मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करा.
फलटण पालखी तळावर गेल्या वर्षी वीजेचा अपघात झाला होता. तसा अपघात होणार नाही याची दक्षता विद्युत विभागाने घ्यावी, तसे फलक लावावेत. तसेच वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी मागेल त्याला विद्युत वितरण कंपनी कडून अधिकृत विज जोडणी देण्यात यावी. यासाठी पालखी तळावर विद्युत वितरण कंपनीचे पथक तैनात ठेवावे. पालखी काळात आरोग्य विभागाची पथके पुरेसा औषधसाठ्यासह सज्ज ठेवावी. आरोग्य विभागाने वारकऱ्यांसाठी 24 तास सेवा देण्याची व्यवस्था करावी. वारकऱ्यांच्या मागणीनुसार स्वयंपाकासाठी किरोसीन व गॅस सिलेंडर पुरवठा करावा.
पालखी मार्गावरील मुक्कामांच्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनी कडून लाईटची व्यवस्था व हायमास्टची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व बाबी पुन्हा बारकाईने तपासून महसूल आणि विद्युत वितरण कंपनीने तपासणी अहवाल सादर करावा. ज्या ठिकाणी त्रुटी आढळतील त्या तात्काळ दुरुस्त कराव्यात. मुकामाच्या ठिकाणाहून पालखी पुढे गेल्यानंतर पालखी तळाची तात्काळ स्वच्छता करावी. तसेच पालखी सोहळ्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही व वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केल्या.
पालखी व्यवस्थापनासाठी पुस्तिका
सातारा जिल्ह्यातील पालखी मार्गावर वारकऱ्यांची कसलीही गैरसोय होवू नये म्हणून प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवल्या आहेत. कोणाकडे कोणती व्यवस्था आहे, याची एक पुस्तिकाच काढण्यात आली असून ती प्रत्येक दिंडी प्रमुखाकडे दिली जाईल. अशा या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या वेळी केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |