09:44pm | Sep 26, 2018 |
सातारचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी दिली जावू नये म्हणून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक गट बऱ्याच दिवसांपासून सक्रीय आहे. त्यामुळे सातारच्या उमेदवारीचा विषय खूपच प्रतिष्ठेचा झाला आहे. उदयनराजे यांचे पक्षाच्या जिल्ह्यातील अन्य नेतेमंडळींशी सूर जुळत नसल्याच्या तारा छेडल्या जात आहेत. त्यातून असे वातावरण तयार झाले आहे. उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार हेच घेणार असल्यामुळे त्यांच्यापर्यंत या तारांचा 'टणत्कार' पोहोचावा हाच अशा प्रयत्नांमागचा हेतू आहे हे उघड आहे. असे तयार केलेले वातावरण पवारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. मात्र शरद पवार यांनी उमेदवारीच्या संदर्भात आजअखेर काहीही भाष्य केले नसल्याने दोन्ही बाजुची अस्वस्थता वाढली आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून, म्हणजे १९९९ पासून सातारा मतदारसंघावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यावर शिवसेनेचा भगवा फडकला होता. शिवसेनेची येथे हक्काची व्होट बँक आहे. पण सदासर्वकाळ निवडणूक मिशनवर असलेल्या भाजपचा साताऱ्यावर डोळा आहे. स्वत:च्या ताकदीवर हे शक्य नसल्याने उदयनराजे यांच्यासारखे हुकमी पान गळाला लागावे यासाठी भाजप गळ टाकून बसला आहे. तसे पाहिले तर
यापूर्वीच्या दोन लोकसभा निवडणुका साताऱ्यातून लढवलेले पुरूषोत्तम जाधव भाजपमध्ये गेले आहेत. पण तेवढ्याने भाजपचे समाधान झालेले दिसत नाही. निवडून येण्याची क्षमता एवढा एकच निकष भाजपला मान्य आहे. मध्यंतरी भाजपच्या या मतदारसंघाच्या प्रभारी असलेल्या नीता केळकर यांनी तसे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात खासदार उदयनराजे भोसले यांची 'सदिच्छा' भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली होती. पण उदयनराजे यांनी अद्याप तरी कुणालाही आपला अंदाज लागू दिलेला नाही. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये उदयनराजे यांनी विक्रमी मताधिक्क्याने विजय मिळवले आहेत. राष्ट्रवादीतील अन्य विजयी खासदारांपेक्षा त्यांचे मताधिक्क्य मोठे होते. पण पक्षातील स्थानिक नेत्यांना वाटते, की पक्षाच्या ताकदीमुळे हे प्रचंड यश मिळाले. उदयनराजे यांची व्यक्तिगत ताकद, त्यांनी निवडणुकीत घेतलेले परीश्रम सोयिस्कररीत्या दुर्लक्षिले जात आहे. भाजप याचा फायदा उठवू पहात आहे. म्हणूनच राष्ट्रवादीच्या निर्णयावर येथील भाजपचा निर्णय अवलुबून आहे. परवा कर्मवीर जयंतीच्या कार्यक्रमासाठी खासदार शरद पवार साताऱ्यात आले होते. त्यांच्या त्या दौऱ्यात सातारच्या उमेदवारीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. उदयनराजे यांच्या विरोधकांच्या हालचाली बरेच काही सांगून जात होत्या. या विरोधी सुराचे सारथ्य अर्थातच विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक - निंबाळकर यांच्याकडे होते. त्यांचा फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर त्यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन झाले. फलटणचा समावेश माढ लोकसभा मतदारसंघात असला तरी त्यांचा जीव साताऱ्यात रमतो आहे. कारण उर्वरित सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांना स्वत:चे वर्चस्व रहावे असे वाटते. पण त्यात त्यांना खासदार उदयनराजे यांचा मोठा अडसर वाटतो. उमेदवारीच्या निर्णयाच्या माध्यमातून त्यांचा पत्ता कट होऊन हा अडसर दूर व्हावा म्हणून त्यांनी उदयनराजे विरोधी वातावरणाला हवा देण्याचे काम हाती घेतले आहे. या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. परवाच्या दौऱ्यावेळी यादृष्टीने बरीच खलबते झाली आहेत. खासदार उदयनराजे यांनी शरद पवार यांच्याशी कमराबंद चर्चा केली. त्याचप्रमाणे सभापती मिस्टर रामराजे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, पक्षाचे पदाधिकारी यांनीही पवार यांच्याशी मसलत केली.
पवार यांच्याशी झालेल्या भेटीनंतर उदयनराजे यांना पत्रकारांनी त्याविषयी छेडले असता, त्यांनी पवार यांच्याविषयी चांगले उद्गार काढले, पण त्याचवेळी 'फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आम्हालाही कळतं' असे वक्तव्य केले. हा इशारा पक्षाला की स्थानिक नेत्यांना याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. अन्वयार्थ लावले जात आहेत. यावर पवार यांनी काहीही भाष्य केलेले नाही. पण 'भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे का?' या पत्रकारांच्या प्रश्नावर 'अद्याप तव्याजवळ पोचलेलो नाही' असे मार्मिक उत्तर देत पवार यांनी लोकसभेचा उमेदवार ठरवण्यास अजून खूप वेळ असल्याचे सूचित केले. त्यानंतरही गणेश विसर्जनातून मोकळे झाल्यावर रामराजे, शशिकांत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, पदाधिकाऱ्यांनी खासदार शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी भेटून खलबते केली आहेत. तथापि, उमेदवारीचा निर्णय गुलदस्त्यात ठेवून पवार यांनी खासदार उदयनराजे तसेच त्यांच्या विरोधकांनाही सबुरीचा सल्ला दिला आहे असे वाटते. इतके अगतिक व उतावीळ होऊ नका असाच या सल्ल्याचा मतितार्थ असावा. पवार यांना जागाही राखायची आहे आणि अनुयायांचे संचालनही करायचे आहे. ही तारेवरची कसरत आहे.
श्रीनिवास पाटील यांचाही शड्डू !
सातारच्या या राजकीय घडामोडींमध्ये सिक्कीमचे माजी राज्यपाल लक्षवेधी ठरले. राज्यपाल पदाची मुदत पूर्ण करून ते जिल्ह्यात परतले आहेत. कर्मवीर जयंती कार्यक्रमाचे निमित्त साधून त्यांनी या घडामोडींमध्ये ट्विस्ट निर्माण केला आहे. पक्षाने आदेश दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढवू असे सांगून त्यांनी लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकला आहे. याचे संकेत मागच्या वार्तापत्रात दिले होते. पाटील यांच्या या वक्तव्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीकडे जिल्ह्यात इच्छुकांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार कोणाच्या बाजुने कौल देतात याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष असणार आहे.
- गजानन चेणगे
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |