03:30am | Nov 12, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी साडेनऊ टक्के बेस धरुन 'एफआरपी अधिक २00 रुपये' दर द्यावा, या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यात सुरु केलेले 'चक्काजाम आंदोलन' रविवारी दुपारी स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची या अनुषंगाने बैठक झाली. यामध्ये कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊसदराचा जो फॉर्म्युला निश्चित केला आहे, तोच सातारा जिल्ह्यातही मान्य करण्यात आला. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने अथवा शेतकरी संघटनांनी नियम मोडला तर त्यांच्यावर तसेच कारखान्यांनी एका महिन्यात ते पैसे दिले नाहीत तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी देताच उपस्थितांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
ऊसदराच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. त्यातच या आंदोलनाचा भडका उडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने दुपारी स्वाभिमानीचे पदाधिकारी त्याचबरोबर अन्य शेतकरी संघटनाच्या कार्यकर्त्यांना निरोप देत सायंकाळी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर, पोलीस उपधीक्षक समीर शेख तसेच बळीराजाचे संस्थापक पंजाबराव पाटील, भूमाता ब्रिगेडचे धर्मराज जगदाळे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, सचिन नलावडे, अनिल पवार, शरद जोशी प्रणित संघटनेचे बाळासाहेब चव्हाण, संजय भगत तसेच जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नियोजन भवनात झालेल्या बैठकीत अनेकदा संघटनांचे पदाधिकारी आणि कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या. काहीदा संघटनांनी त्यांना धारेवरही धरले. मागील थकबाकी आणि एफआरपीच्या मुद्यावरुन कारखान्यांच्या प्रतिनिधींना कोंडीत पकडत जाब विचारला असता त्यावर कोणीही समाधानकारक असे उत्तर दिले नाही. त्यामुळे कोणालाही यावर बोलून देण्यात आले नाही. कारखान्याच्या एका प्रतिनिधीने आम्ही व्यापारी नाही, असे सांगताच सर्वच संघटनांचे पदाधिकारी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत तुटून पडले. यामुळे संबंधित प्रतिनिधींना घाम पुसतच खाली बसावे लागले.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जो कोणी नियमबाह्य वागेल त्याच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. 'जो कोणी कायदा मोडेल, त्याच्यावर कारवाई होणार आहे. यातून कारखानदार अथवा शेतकरी कोणीही सुटणार नाही. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. कारखानदारांनी त्यांच्या नियमाप्रमाणे वागावे आणि तीस दिवसांत गतवर्षीची थकबाकी द्यावी. एफआरपी एकरक्कमी द्यावी, अशी सक्त ताकीदच त्यांनी कारखाना प्रतिनिधींना यावेळी देऊन टाकली. एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायची आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी प्रत्येक साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना अडचणी विचारत त्यांच्याकडून माहिती विचारुन घेतली. 'जरंडेश्वर'च्या प्रतिनिधींनी 'बैठकीतील मुद्दे मी मॅनेजमेंटकडे मांडतो, पण येथे काही सांगू शकत नाही,' असे स्पष्ट करताच संघटनांचे प्रतिनिधी पुन्हा एकदा संतप्त झाले. ही बैठक जवळपास दोन तास चालली. यानंतर जिल्हाधिकारी सिंघल यांनी आपली भूमिका स्पष्ट करतच कारखाना प्रतिनिधींना खडसावून सांगत दराबाबत स्पष्ट निर्णय आणि भूमिका घ्यावी लागेल, असे ठणकावून सांगितले. यानंतर मात्र सांगली-कोल्हापूरचा फॉर्म्युला मान्य असल्याचे कारखान्यांचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्वच शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी मान्य केले. यानंतर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही चक्काजाम आंदोलन स्थगित केले असल्याची घोषणा केली.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |