जळगाव : विभिन्न विचारसरणी असलेले तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका भाजपकडून सुरू आहे. यावर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात जोरदार प्रत्युत्तर दिले. 'आमचं सरकार मजबूत आहे. आम्ही एकत्र आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर आमचं सरकार पाडून दाखवा', अशा शब्दांत त्यांनी भाजपला खुले आव्हान यावेळी दिले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात प्रथमच शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचा एकत्रित जाहीर शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. ठाकरेंसोबत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते.
मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा हेतु डोळ्यासमोर ठेऊन आम्ही एकत्र आलो आहोत. सरकारच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधीपक्ष असलेल्या भाजपकडून सतत टीका-टिप्पणी केली जात आहे. विभिन्न विचारसरणी असलेले तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार किती दिवस चालेल. आम्ही लवकरच सत्तेत येऊ, असे भाजप नेते सांगत सुटले आहेत. मात्र, आम्ही एकत्र आहोत आणि आमचे सरकार मजबूत सरकार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एप्रिलनंतर 'ऑपरेशन लोटस' नावाची मोहीम भाजप हाती घेणार आहे. मात्र, त्याचा काही उपयोग होणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला बाजूला लोटले ना. आता पुन्हा जनता तुम्हाला परत दूर लोटल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षे पूर्ण करेल. हिंमत असेल तर उद्या कशाला आज नाही तर आत्ताच सरकार पाडून दाखवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टिकास्त्र सोडले. महाविकास आघाडीचे सरकार हे सर्वसामान्य तसेच गोरगरीब जनतेचे सरकार आहे. आमचे सरकार आल्यानंतर संपूर्ण राज्यातील जनतेच्या मनात आनंद आहे. हे सरकार शेतकरी, सर्वसामान्य लोकांची आस्थेवाईकपणे चौकशी करणारे, त्यांचा कैवार असलेले सरकार आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजप नेते एकनाथ खडसेंना देखील चिमटे काढले. मुक्ताईनगरातील जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभूत करून मुक्ताईनगरला खऱ्या अर्थाने मुक्त केले आहे, असे सांगत ठाकरेंनी खडसेंवर अप्रत्यक्षपणे त्यांच्याच मतदारसंघात टीका केली.
गेली ३० वर्षे युतीच्या माध्यमातून ज्या भाजपसोबत आम्ही राहिलो, त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला नाही. आम्ही काही त्यांचे गुलाम नव्हतो. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर विश्वास दाखवला. सत्ता स्थापनेपूर्वी एका राजकीय बैठकीत आमच्या विचारांमध्ये एकमत झाले, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
महाराष्ट्र राज्याला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. केंद्रानेही राज्याला यासाठी भरीव निधी देऊन मदत करण्याची गरज आहे. यापुढील काळात केवळ शेतीवर अवलंबून न राहता उद्योग-व्यवसायांकडे वळण्याची गरज आहे. जळगाव जिल्ह्यात कृषीसह औद्योगिक क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. महिला सबलीकरणासाठी बचतगटांना अल्पदरात कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले. या मेळाव्याला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मेळाव्याचे संयोजक आमदार चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |