दुबई : रोहित शर्माच्या टीम इंडियानं बांगलादेशवर अखेरच्या चेंडूवर तीन विकेट्सनी चुरशीचा विजय मिळवला आणि आशिया चषकावर सातव्यांदा आपलं नाव कोरलं. बांगलादेशनं अंतिम सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं होतं. सामन्यात टीम इंडियानं अखेरच्या चेंडूवर बांगलादेशवर तीन विकेट्सनी विजय मिळवला.
भुवनेश्वर कुमार बाद झाला, त्या वेळी भारताला अकरा चेंडूंत विजयासाठी नऊ धावा हव्या होत्या. आणि हाताशी केवळ तीन विकेट्स होत्या. केदार जाधवच्या मांडीचे स्नायू दुखावल्यामुळं तो मोठे फटके खेळू शकत नव्हता. त्या कठीण परिस्थितीत जाधव आणि कुलदीप यादवनं नेटानं खेळून विजयाचं समीकरण एका चेंडूत एका धावेवर आणलं. मग महमदुल्लाहच्या अखेरच्या चेंडूवर जाधव आणि यादवनं लेग बाय घेऊन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भारताकडून कर्णधार रोहित शर्मानं 48 धावा बनवल्या. महेंद्रसिंह धोनी (36) आणि दिनेश कार्तिकनं (37) विजयामध्ये आपलं योगदान दिलं. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या लिटन दास आणि मेहदी हसननं 21 षटकांत दिलेली 120 धावांची सलामी टीम इंडियाच्या चाहत्यांना धडकी भरवणारी होती.
पण त्यानंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी कमाल केली. केदार जाधवनं मेहदी हसनला बाद करून सलामीची जोडी फोडली. आणि मग बांगलादेशचा अख्खा डाव 222 धावांत गडगडला. भारताकडून कुलदीप यादवनं तीन, केदार जाधवनं दोन तर यजुवेंद्र चहलनं आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताच्या फिरकी त्रिकूटानं बांगलादेशचा डाव 49व्या षटकांत 222 धावांत गुंडाळला. सलामीच्या लिटन दासनं 117 चेंडूंत बारा चौकार आणि दोन षटकारांसह 121 धावांची खेळी उभारली. त्याचं वन डेतलं हे पहिलं शतक ठरलं. लिटन दासनं मेहदी हसनच्या साथीनं 120 धावांची सलामी दिली. त्याच सलामीच्या भक्कम पायावर बांगलादेशला 222 धावांची मजल मारता आली. मेहदी हसननं 32 आणि सौम्या सरकारनं 33 धावांची खेळी केली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |