कराड : ‘‘कविता म्हणजे सभोवतीच्या समाज वास्तवावर दिलेली कवीची प्रतिक्रिया असते. प्रतिभा आणि कल्पना यांच्या सहाय्याने कवी आपल्या कवितेत मानवी जीवनाचे सार मांडत असतो. समाज परिवर्तनाची कवितेत मोठी ताकद असून कवी मानवता जिवंत राहण्यासाठी काव्यात्मक आविष्कार करत असतो. खर्या अर्थाने कविता मानवाचा जीवनधर्म सांगत असते.’’ असे प्रतिपादन कवी प्रा. संतोष बोंगाळे यांनी केले.
ते महिला महाविद्यालय, कराडच्या वसंतगड येथील राष्ट्रिय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ‘काव्यगंध’ विषयावर मार्गदर्शन व काव्यसादरीकरण करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्यक्रम अधिकारी डॉ.अखिलेश शिंदे होते.
मार्गदर्शन करताना पुढे प्रा. बोंगाळे म्हणाले की, आजच्या आधुनिकीकरणामुळे मानवी जीवनात स्पर्धा सुरू झाल्याने समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपण ध्येयावर लक्ष केंद्रित करून यश संपादन करावे. सोशलमीडियाचा योग्य वापर करावा. आपली माती, आपले आई वडील यांची सेवा करण्यातच मानवी जीवनाचा खरा आनंदोत्सव आहे. शिबिरात मिळालेली सुसंस्कारांची शिदोरी जीवनाला आकार देऊन आनंदी करते. याबरोबर त्यांनी ‘थेंब थेंब पाणी’, ‘दुष्काळ’, ‘जीवन एक संघर्ष’, ‘आई’, ‘जीवनाचे रंग’, ‘भाकरी आणायची कोठून’, ‘आता नको मज काही’ अशा कवितांचे बहारदार गायन करून उपस्थितांची मने जिंकली.
अध्यक्षस्थानावरून डॉ.अखिलेश शिंदे म्हणाले की, ’कविता ऐकण्यासाठी दर्दी रसिक मन असावे लागते. कविता हे समाज परिवर्तनाचे एक माध्यम असून साहित्य हे समाजाचा आरसा असते. आपण सर्वांनी जीवनमूल्ये जोपासली पाहिजेत. आपणाला सकारात्मक विचाराने आपली स्वप्ने पूर्ण करता येतात.’
मनोगत व्यक्त करताना मराठी विषयाचे प्रा.विलास सुर्वे म्हणाले की, ‘कविता ही उत्कट भावनेचा उत्स्फूर्त उद्गार असून मानवाची प्रगल्भता वाढविण्याचे काम करते. धावपळीच्या जगात वावरताना साहित्य मानवाला उत्साह, प्रेरणा देते. आमचे महिला महाविद्यालय असले तरी समाजिक कार्यात अग्रेसर असून सामाजिक बांधिलकी जोपासना करणारे आहे. विध्यार्थी जीवनात सुसंस्कार पेरण्याचे काम शिबीरात होते.’
यावेळी कार्यक्रमास प्रा. देसाई, प्रा.वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.पल्लवी अंगरखे यांनी केले. तर कु. अंकिता जमाले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विध्यार्थीनी कु.प्रतिक्षा हिरे यांनी केले तर प्रा.डॉ.विलास सुर्वे यांनी आभार व्यक्त केले.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |