12:40am | Jan 01, 2019 |
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील भादे, लोणी, भोळी, तोंडल, ह्या वीर धरण जलाशय परिसरातील कातकरी, गोसावी व भोई समाजातील मच्छीमार समाजाने आपल्या विविध मागण्यासाठी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुख यांना प्रत्यक्ष भेटून व लेखी निवेदन देऊन सुध्दा योग्य न्याय मिळत नसल्याने येत्या बुधवारी (2 जानेवारी 2019) समस्त मच्छिमार समाज बांधव वीर धरण जलाशयात जलसमाधी आंदोलन करणार असल्याची तसेच गुरुवार दि.3 रोजी नायगाव येथे येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंञ्यांविरुध्द निदर्शने करत काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिध्दीपत्रकाममध्ये म्हटले आहे की, गेले दोन महिन्यापासून वीर धरण जलाशयावर मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांची उपासमार चालू आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करून ही आमचेवर बळाचा वापर करीत धाकटदडपशाही दाखवित आमचे जगणे मुश्किल केले आहे. वीर धरण जलाशयामधील मच्छिमारीचा ठेका घेण्यापुर्वीच आमचे कडून रक्कम दोन लक्ष 41 हजार रूपये पासाच्या स्वरूपात घेऊन ठेकेदार व शासकीय अधिकारी यांनी आमची फसवणूक केली आहे. परवानगी नसताना स्वयंचलित इंजिनच्या नावा जलाशात चालू केल्या. त्यांच्याकडे काम करण्याचा अनुभव नसल्याने कामगारांचेही जीवीतास धोका निर्माण होत आहे. तसेच आम्हा मच्छिमार बांधवावर दबाव टाकण्यासाठी गुंड उभे करून आम्हाला मासेमारी सोडण्यासाठी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो असता आमची दखल घेतली नाही. दि. 18 डिसेबर 2018 रोजी ठेकेदारांच्या गुंडांनी कातकरी गोसावी समाजातील महिलांना शेडवर बोलावून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. असे असताना स्वतः त्यांनीच केलेल्या तोडफोडीप्रकरणी पोलीसांनी आमचेवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यावेळी आम्ही शिरवळ मधील मोहन कांबळे ( भोई समाज कार्याध्याक्ष ) यांच्या अंत्ययात्रेत सहभागी असणाऱ्या मच्छिमार समाज बांधवावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ठेकेदारांच्या गुंडाच्या दहशतीने तोडंल ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख यांचेकडे दाद मागितली आहे. तरीही संबधितांवर कारवाई होताना दिसून येत नाही. प्रत्यक्ष मच्छिमारी ठेका वाटप कार्यपध्दती पाहिली तर विद्यमान मत्स व्यवसाय आयुक्त हे मुख्यमंत्री महोदयांचेही बाप झाल्याचे अविर्भावात वावरत आहेत.
31 मे 2018 रोजी तलाव ठेका मंजूरी आदेश जा.क्र. मत्स्य / भू/011204/136/289/2017 चा आदेश व 30 जून 2017 चे शासन निर्णयानूसार काढला आहे. परंतू स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी दि. 20 जून 2018 रोजी आदेश काढून सदर शासन निर्णयास स्थगिती देत असल्याबाबत विजय चौधरी (उपसचिव) यांच्या सहीने पत्र निर्गमित केले आहे. असे असतानाही मत्सव्यवसाय विभाग राजकीय पदाधिकाऱ्यांचे हातचे बाहूले बनत मुख्यमंत्र्याच्या आदेशालाही केराची टोपली दाखवित आहेत. सदर तलाव ठेका मंजूरी आदेशामध्येच शर्त क्रमांक 14 नुसार स्थानिक क्रियाशिल मच्छिमारांना मच्छिमार परवाने देणे बंधनकारक असल्याचे नमूद असतानाही आम्हाला वेठबिगाराप्रमाणे काम करण्यास मत्स्य आयुक्त भाग पाडत आहेत. मुख्यमंत्री यांचे आदेश ठेकेदार व अधिकारी धाब्यावर बसवून राजकीय बगलबच्चे पोसले जात असतील तर आम्हाला न्याय कोण देणार. या विवंचनेतून सर्व मच्छिमार बांधव बुधवारी ( 2 जोनवारी 2019) वीर धरण जलाशयामध्ये जलसमाधी घेणार आहेत. त्याच बरोबर गुरूवारी ( दि. 3 जानेवारी 2019 ) रोजी जिल्ह्यामध्ये पोकळ कळवळा दाखवित सामाजिक करूणेचे प्रदर्शन घडविणाऱ्या मंत्री व मुख्यमंत्र्याच्या विरोधात निदर्शने करीत त्यांना काळे झेंडे दाखविले जाणार आहेत. आम्हाला न्याय मिळेपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने कोणत्याही पातळीवर जाऊन आंदोलन करणार आहोत. या प्रसिध्दीपत्रकावर गणेश जाधव, सचिन घाडगे, अमोल बामणे, विष्णू बामणे, सुरेश जाधव, भालचंद्र जाधव, राजेंद्र जाधव यांच्या सह्या आहेत. या मच्छिमार बांधवावर होणाऱ्या अन्यायाविरोधातील आंदोलनास खंडाळा तालुका उपप्रमुख गणेश जाधव यांनीही पाठींबा दिला आहे.
वीर धरण जलाशयासंदर्भात स्थानिक मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यानुसार संबंधित यंञणेला लेखी सुचना व आदेश दिलेला आहे.स्थानिक मच्छिमारांना मासिक पास देण्याबाबत आदेश देण्यात आले आहे
- अरुण विधळे आयुक्त ,मत्स्य व्यवसाय ,महाराष्ट्र राज्य
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |