07:50pm | May 05, 2019 |
सातारा : फलटण तालुक्यात 'हपापाचा माल गपापा' करणार्या प्रवृत्ती गेल्या १५-२० वर्षामध्ये वाढलेल्या आहेत. फलटण तालुक्यातील अनेक घोटाळे उघडकीस येत असतानाच फलटण नगरपालिकेचा सुमारे २१ कोटींचा घोटाळा नुकताच उघडकीस आला आहे. सोमवार पेठ, फलटण येथील एका ओपन स्पेस जागेवर गेली पन्नास वर्षे उभी असलेली घरे तोडून त्याठिकाणी नगरपालिकेने व फलटण नरेशांनी शाळा व खेळाचे मैदानाचे आरक्षण टाकलेले आहे. त्यापोटी नगरविकास खात्याकडून तब्बल २१ कोटी रुपये घशात घालण्याचा प्रयत्न फलटण नरेशांनी व त्यांच्या दोन दाढीवाल्या बंधूंनी केला आहे. मात्र सोमवार पेठेतील ‘त्या’ जागेवर राहणार्या रहिवाशांनी काल दि. ४ रोजी सातारा जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
फलटण तालुक्यात स्थानिक पुढार्यांनी केलेले घोटाळे डोळे दीपवणारे आहेत. प्रत्येक गोष्टीत घोटाळा व त्या घोटाळ्यातून पैसा मिळवणे, हे एकमेव काम फलटण नरेश व त्यांच्या दोघा दाढीवाल्या बंधूंनी गेल्या १५-२० वर्षात साधले आहे. या घोटाळ्यांच्या माध्यमातून फलटण नरेश व त्यांच्या दोघा दाढीवाल्या बंधूंनी अमाप पैसा कमावला आहे. तरीही फलटणकरांना उल्लू बनवून ‘तो मी नव्हेच’ असे म्हणत फलटण तालुक्यातील राजकारण ते गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र सोशीक फलटणकरांना अजूनही सद्बुद्धी येत नाही. असेच एक प्रकरण सध्या फलटण येथील सोमवार पेठेतील नगरपालिकेने टाकलेल्या आरक्षणामुळे समोर आलेले आहे. सुमारे ६५ वर्षांपूर्वी शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी फलटण तालुक्यात श्रीराम सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली. त्यावेळी श्रीराम कारखान्याच्या शेअर धारकांनी व शेतकर्यांनी पै-पै जमवून प्रसंगी अर्धांगिनीच्या गळ्यातील मंगळसुत्रे गहाणवट ठेवून ‘श्रीराम’च्या उभारणीत खारीचा वाटा उचललेला होता. एकेकाळी सोन्याचा धूर निघणार्या या कारखान्याची अवस्था फलटण नरेश व त्यांच्या दोघा बंधूंनी वस्त्रहरण केलेल्या द्रौपदीसारखी केली. होते नव्हते तेवढे या कारखान्याकडून ओरबडून खाल्ले. शेवटी पुरले नाही म्हणून श्रीराम मधून निवृत्त झालेल्या कामगारांच्या घामाचे दाम असलेली ग्रॅच्युईटीची रक्कम गिळंकृत करण्याचाही प्रयत्न केला. सुमारे १५ वर्षापूर्वी श्रीराम सहकारी साखर कारखान्याची आर्थिक अवस्था बिकट झाली होती. राज्य बँक व इतर बँकांचे मिळून कोट्यवधींचे कर्ज श्रीराम वर झालेले होते. शेवटी राज्य बँक न्यायालयात गेल्यानंतर श्रीराम ची वापराविना पडून असलेली जमीन विकून बँकांची कोट्यवधींची देणी चुकती करा, असा आदेश देण्यात आला. लागलीच फलटण नरेशांच्या पोटात उकळ्या फुटू लागल्या. जन्मत:च शकुनीमामांचा वारसा चालविण्यास मिळाल्यामुळे फलटण नरेशांची बुद्धी तेज चालते. सातारा, पुण्यामधील बगलबच्च्या बिल्डरांना फलटणमध्ये बोलावून फलटण नरेशांनी व त्यांच्या दोन बंधूंनी श्रीराम ची जमीन कवडीमोल किंमतीत विकण्याचा घाट घातला.
जमिनीच्या लिलाव प्रक्रियेमध्ये आपल्या बगलबच्च्यांना झुकते माप देवून फलटण नरेशांनी कोट्यवधी किंमतीची जमीन सातार्यातील घार्गे, ठक्कर, झंवर व इतर ११ लोकांच्या घशात घातली. सुमारे दहा वर्षापूर्वी याच जागेचा व्यावसायिक भाव सात ते आठ लाख रुपये प्रतीगुंठा होता. मात्र हीच जमीन फलटण नरेशांनी रेडीरेकनरच्या दरात बिल्डरांच्या घशात घातली. मात्र नावाला जरी बिल्डर असले तरी त्याची मालकी मात्र फलटण नरेश व त्यांच्या दाढीवाल्या बंधूंकडेच राहिली. त्या जागेची कशी विल्हेवाट लावली, हे फलटणकरांनी याची देही, याची डोळा पाहिलेले आहे. परंतू झाकली मुठ, सव्वा लाखाची असे म्हणत नसते झंझट पाठिमागे नको, असे म्हणत अनेकांनी याप्रकरणाकडे कानाडोळा केला. शेवटी तुकड्या-तुकड्यात या जमिनीची विल्हेवाट लावली. तरीही श्रीराम कारखाना कर्जमुक्त झाला नाही. गेल्या अनेक वर्षापासून याठिकाणी रहिवासी असलेल्या कामगारांची घरे उद्ध्वस्त करुन त्यांनाही बेघर करुन टाकले. एवढे कमी की काय म्हणून फलटण शहरातील सोमवार पेठेत असणार्या 'ओपन-स्पेस' जागेवर फलटण नरेशांचा व त्यांच्या दोघा बंधूंचा डोळा होता. वास्तविक ही जमीन श्रीराम कारखान्याचा 'ओपन-स्पेस' होता. वास्तविक कायद्याने 'ओपन स्पेस' ची खरेदी-विक्री करता येत नाही. असे असतानाही नियम धाब्यावर बसवून फलटण नरेशांनी या 'ओपन स्पेसचीही विक्री केली.
सिसनं- ६ या जागेवर गेल्या पन्नास वर्षांपासून अनुसूचित जाती-जमाती व भटके विमुक्त लोक राहत आहेत. या जागेचा नगरपालिका कर, पाणीपट्टी व वीजबिल हे लोक गेल्या पन्नास वर्षांपासून अद्याप भरत आहेत. ओपन स्पेस जागेवर जर अतिक्रमण असेल तर ती जागा नगरपालिकेला अधिग्रहित करता येत नाही. असे असतानाही फलटण नरेश व व त्यांच्या दोघा बंधूंनी नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व नगररचना विभागाच्या अधिकार्यांना हाताशी धरुन संबंधित जागेवर कोणत्याही प्रकारची लोकवस्ती नसल्याचा खोटा अहवाल नगरविकास खात्याकडे पाठवला होता. व त्या आधारेच नगरपालिकेने २०१८ साली सुधारित नगरपालिका आरक्षण ठराव ५३-५४ घेवून सिसनं- ६ ही जागा शाळा व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सत्ताधार्यांचा 'कांड' उघडकीस आल्यानंतर फलटण पालिकेतील विरोधी पक्ष सदस्यांनी याबाबत जिल्हाधिकारी तसेच उच्च न्यायालयातही दाद मागितली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे फलटण नरेशांनी व व त्यांच्या दोघा बंधूंनी सिसनं -६ मधील सुमारे नव्वद घरे उठवण्याचा विडा उचललेला आहे. त्यासाठी त्यांनी सोमवार पेठेतील सोमाशेठ उर्फ कात्या भाईला सुपारी दिलेली आहे. सोमाशेठ उर्फ कात्या भाई व त्याचा नगरसेवक पुत्र सोमवार पेठेतील त्या जागेवरील घरे खाली करण्यासाठी संबंधित लोकांना दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे नव्वद कुटूंबातील सुमारे ५०० लोक प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत. वास्तविक हे लोक गेल्या पन्नास वर्षापासून याठिकाणी राहत आहेत. मालमत्ता कर, घरपट्टी, वीजबिल, पाणीपट्टी हे सर्व कर वेळोवेळी भरत आहेत. झोपडपट्टी कायद्यानुसारही शासन त्यांना याठिकाणाहुन हलवू शकत नाही. त्यामुळेच २१ कोटी घशात घालण्यासाठी फलटण नरेशांनी व त्यांच्या दोघा बंधूंनी फलटणमधील सोमवार पेठेत ‘घायल - पार्ट- 2’ करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे त्यांनी याची जबाबदारी सोमाशेठ उर्फ कात्या भाईला दिलेली आहे. मात्र या कात्या भाईवर कोणाचा 'ढाई किलो का हाथ' अद्याप पडला नसल्यामुळे सोमवार पेठेतील गरीब लोकांवर त्याची दादागिरी वाढलेली आहे.
फलटण नरेश राज्यभरात निर्विकार चेहरा घेवून फिरत असतात. भ्रष्टाचार म्हणजे काय, हे आम्हाला माहितच नाही. फलटण तालुक्यात ‘राम’राज्य सुरु आहे, अशा फुशारक्या ते नेहमी मारत असतात. परंतू फलटण नरेशांनी कृष्णा खोरेसह फलटण तालुक्यात केलेले कांड समजल्यानंतर त्यांच्या चेहर्यावर राज्यातील काळे कुत्रेही पाय वर करणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. श्रीराम कारखान्याची जमीन बगलबच्च्या बिल्डरांच्या घशात घातली. परंतू श्रीराम कारखाना मात्र आजपावेतो कर्जमुक्त होवू शकला नाही, हे शाश्वत सत्य आहे. गेल्या काही वर्षांपासून याचे व्यवस्थापनही दुसर्या साखर कारखान्याकडे आहे. त्यामुळे अधिक काही सांगण्याची आवश्यकताच नाही. नियम धाब्यावर बसवून फलटण नरेशांनी श्रीराम कारखान्याच्या जागेतील 'ओपन स्पेस'ही सोडला नाही. 'ओपन स्पेसही ही जागा नगरपालिकेच्या मालकीची असते. परंतू हीच जागा कायदे व नियम धाब्यावर बसवून फलटण नरेशांनी नगरपालिकेलाच विकण्याचा घाट घातलेला आहे. त्यापोटी फलटण नरेशांना तब्बल २१ कोटी मिळणार आहेत. परंतू एवढे सगळे होवूनसुद्धा त्या जागेवरील घरे अजून हटलेली नाहीत, त्यामुळे फलटण नरेशांनी याची सुपारी सोमाशेठ उर्फ कात्या भाईला दिलेली आहे. कात्या भाईनेही गेल्या काही महिन्यांपासून उच्छाद मांडलेला आहे. संबंधित घरमालकांना दमदाटी करुन घरांच्या जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. संबंधितांना तात्पुरते पुनर्वसन म्हणून बाजुलाच दहा बाय दहाच्या पत्र्याच्या चाळी उभ्या केल्या आहेत. मात्र गेल्या पन्नास वर्षांपासून पक्क्या घरात राहणारे परिवार त्या पत्र्यांच्या जागेत जगणार कशी? याचे उत्तरही फलटण नरेशांना येत्या विधानसभा निवडणुकीत द्यावे लागणार आहे. विस्थापित लोकांच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न फलटण नरेशांनी पैशांच्या लालसेपोटी केलेला आहे. लोकांना उल्लु बनवून फार काळ राजकारण करता येत नाही. राजकारण असावे, परंतू ते सात्विक असावे. पैसा कमविण्याच्या नादात फलटण नरेशांनी सत्तेच्या जोरावर अनेक घोटाळे पचवलेले आहेत. परंतू सोमवार पेठेत केलेला घोटाळा मात्र फलटण नरेशांच्या राजकीय अस्ताला कारणीभूत ठरणार आहे.
जिल्हाधिकार्यांची भूमिका संशयास्पद ?
सोमवार पेठ, फलटण येथील ओपन स्पेस घोटाळा उघडकीस आल्यानंतर या संदर्भात सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. या संदर्भातील पत्रव्यवहार आणि पुरावेही जिल्हाधिकार्यांकडे देण्यात आले होते. तरीही जिल्हाधिकार्यांनी आजपावेतो यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. फलटण नरेश व पालिकेने केलेला घोटाळा कोट्यवधींचा आहे, हे सूर्यप्रकाशाइतके नितळ असूनसुद्धा जिल्हाधिकार्यांनी कानाडोळा का केला, याचे उत्तरही जिल्हाधिकार्यांना द्यावे लागणार आहे. मात्र दीड वर्षाच्या कार्यकाळात जिल्हाधिकार्यांची भूमिकाही संशयास्पद राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
- संग्राम निकाळजे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |