मुंबई : राज्यात भाजपशिवाय कुणाचेही सरकार येऊ शकत नाही. राज्यातील सध्याची परिस्थिती अशीच आहे, असं वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्याचं सांगण्यात येतं.
दादरच्या भाजप कार्यालयात भाजपच्या आणि भाजप समर्थक आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य करतानाच शिवसेनेवरही दोषारोप केले. भाजपच्या सहभागामुळेच मित्रपक्षांना जास्त जागा जिंकता आल्या. भाजपचे नेते शिवसेनेच्या अनेक मतदारसंघात प्रचारासाठी गेले. या उलट शिवसेनेचा एकही नेता भाजप उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचारासाठी आला नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजप वगळता राज्यात कोणतंही सरकार स्थापन होऊ शकत नाही, अशीच सध्याची राजकीय परिस्थिती आहे. योग्यवेळी पक्ष निर्णय घेईल, असंही ते म्हणाले.
यावेळी फडणवीस यांनी सर्व आमदारांना मुंबईत न थांबण्याचे आदेश दिले. आमदारांनी जनतेत जावं, काम करावं. मुंबईत थांबण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना भक्कम मदत मिळेल, हे निश्चित आहे. सत्तेसाठी भाजप काम करीत नसून, जनतेसाठी काम करणे, हे आपले पहिले लक्ष्य आहे, असे ते म्हणाले. या निवडणुकीत भाजपला अतिशय भक्कम यश प्राप्त झाले. प्रत्येक विभागात भाजपला यश आले असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नेतृत्वावर विश्वास असलेला भाजप हा एकमेव राजकीय पक्ष आहे. आम्हाला आमदार कुठेही पाठवायची वेळ आली नाही, असा टोलाही त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसला नाव न घेता लगावला.
तीन अंकी नाटकावर लक्ष
राज्यात सध्या सत्तास्थापनेची घाई सुरू आहे. या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आमचं लक्ष आहे, अशी टीका भाजपचे नेते, आशिष शेलार यांनी केली. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'मुख्यमंत्रिपदाचे घोषित उमेदवार' असा केला. पुढील तीन दिवस भाजपचे सर्व आमदार राज्यात अवकाळी पावसाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यासाठी जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला आहे. राज्यातील ९० हजार बूथवर भाजपचे सर्व आमदार भेट देणार आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. भाजपची तीन दिवसीय चिंतन बैठक दादरच्या भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पार पडली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |