सातारा : स्व. यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वायत्तता निर्माण केली. त्यामुळे ग्रामीण भागातून नेतृत्व उभे राहू शकले. सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेकांनी याचा लाभ घेतला. परंतू सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अखत्यारित असलेल्या प्रतापसिंह शेती फार्मच्या दुरावस्थेचे श्रेय कोणाचे? असा प्रश्न सातारकरांना पडला आहे. कारण सध्या वैद्यकीय महाविद्यालयाला कृष्णा खोरे विकास महामंडळाची जमीन देण्यात आल्यामुळे श्रेयवाद रंगला आहे. पण ज्या गोष्टी घडत नाहीत, त्याचे श्रेय कोणीही घेत नाही, याचे साक्षीदार म्हणून प्रतापसिंह शेती फार्मकडे पाहिले जात आहे.
सातार्यातील बडे उद्योजकांनी स्वत:च्या मालकीची जमीन शासनाला सुपूर्द करुन याठिकाणी शेतीफार्म उभे केले. पूर्वी शेतकरी प्रशिक्षण केंद्र म्हणून संपूर्ण सातारा जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी याठिकाणी प्रशिक्षण घेवून आपल्या शेतामध्ये शेतीचे उत्पन्न वाढवत होते. तसेच या शेती फार्ममध्ये ऊस बियाणे मळा, रोप वाटिका, चिकू, आवळा, सिडलेस लिंबू, पेरु, नारळ, आंबा, तुती, साबुदाणा, भाजीपाला याचे उत्पन्न घेवून माफक दराने शेतकर्यांना दिले जात होते. या भाजीपाला विक्री केंद्रामुळे सातारकरांना सकस भाजी मिळत होती. यातील वनौषधी प्रकल्पामुळे औषधी वनस्पतीसुद्धा लोकांच्या उपयोगी पडत होत्या. याठिकाणी असलेल्या विहिरीला मुबलक पाणी असल्यामुळे शेतीसाठी झटणार्या कर्मचार्यांच्या निवासस्थानात कर्मचारी आरामशीर राहू शकत होते. सुमारे 11 एकर जागेत हे शेती फार्म विस्तारलेले असले तरी सध्या या जागेवर अनेकांनी अतिक्रमण करुन शासनाच्या दंडात्मक कारवाईच्या उदार दृष्टिकोनाचा फायदा उचलला आहे.
सध्या रोपवाटिका वगळता या शेती फार्ममधून फारसे उत्पादन काढले जात नाही. सध्या शेती फार्मच्या जागेतून आजुबाजूच्या नगरपालिका हद्दीत राहणार्या नागरिकांच्या सांडपाण्याची गटारगंगा शेती फार्मच्या जागेला अलिंगन देत आहे. तसेच गणेशोत्सव काळात श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी या जागेतील सुमारे पाऊण एकर जागेची खुदाई करुन कृत्रिम तळे तयार करण्यात येते व गणेशोत्सवानंतर ते मुजविण्यात येते. या काळात त्या जागेत तयार होणार्या भाजीपाल्यापासून सर्व वंचित राहत आहेत. तसेच अनेक दिवस श्रींच्या मूर्ती तिथेच राहत असल्याने त्यांची विटंबनाही तेथे पहावयास मिळते. याविरोधात कधीही कोणत्याही हिंदूत्ववादी संघटनांनी आवाज उठवलेला नाही. सध्या सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे व कृषी सभापती मनोज पवार यांनी या जागेवर संरक्षक भिंत बांधून धनदांडग्यांपासून शेती फार्मची जागा वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे काही ठेकेदार व राजकीय नेत्यांच्या उपजिविकेच्या साधनांवर गदा आली आहे, असे उपहासात्मक बोलले जात आहे.
मुळातच सातारा शहरानजिक असलेल्या या जागेची किंमत बाजारभावांप्रमाणे सुमारे दीडशे कोटी आहे. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत पाच कोटी रुपयांची जागा बळकाविण्यात आली आहे. राज्यपालांच्या नावावर असलेली ही जागा जिल्हा परिषदेच्या नावावर केल्यानंतर जिल्हा परिषदेला या जागेच्या देखभाल दुरुस्तीचा घटनात्मक अधिकार मिळणार आहे, अशी माहिती पुढे येत आहे. सुमारे सव्वाशे वर्षापूर्वी याठिकाणी असलेल्या विहिरीमध्ये बालपणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत अनेक मान्यवरांनी डुबकी मारुन पोहण्याचा आनंद घेतल्याचा इतिहास सांगितला जात आहे. सध्या हडप्पा मोहंजोदडो सारखी अवस्था या प्रतापसिंह शेती फार्मची झाली आहे. हे सर्व श्रेय राज्यकर्त्यांचे व राज्यकर्त्यांच्या हाताचे बाहुले बनणार्या अधिकार्यांचे आहे. सध्या या शेती फार्ममधून उत्पन्न कमी, देखभाल दुरुस्तीचा खर्च जास्त होत आहे. तसेच रस्त्यालगत अतिक्रमण वाढले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व त्यांचे बगलबच्चेच याठिकाणी राजरोसपणे व्यवसाय करीत आहेत. यातून नगरपालिकेऐवजी काहिंच्या खिशात मलिदा जात आहे. सध्या शेती फार्मच्या दुरावस्थेली जबाबदार असणार्या लोकप्रतिनिधींना जनता जाब विचारणार नाही, मात्र, शेती फार्मची काळी माती नक्कीच जाब विचारेल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
- अजित जगताप
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |