03:03pm | Nov 02, 2018 |
सातारा : आठवण ही माणसाच्या आयुष्यातील मोठा ठेवा आहे. अनेक गोष्टी बदलतात. त्याचे साक्षीदार असलेले आजही त्या आठवणींचा सुखद अनुभव घेतात. काही वर्षापूर्वी शालेय जीवनात दिवाळीची सुट्टी आणि दिवाळीचा अभ्यास हे खर्या अर्थाने बौद्धिक फराळाच्या गोष्टी होत्या. आता नवीन तंत्रज्ञानाच्या युगात दिवाळीचा अभ्यास लोप पावला असून मोकळ्या परिसरात फटाके उडविण्याऐवजी घरात बसून मोबाईलमध्ये गेम खेळण्यातच नवीन पिढी रमून गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरवर्षी गुलाबी थंडी आणि दिवाळी यांची वर्षभर वाट पहावी लागत होती. घरामध्ये साफसफाई व फराळ बनविण्याची लगबग, पाहुण्यांचे आगमन याची उत्कंठा लागत होती. महागाई कमी तसेच वेतनही कमी असले तरी मिळालेला बोनस म्हणजे एकप्रकारे आनंदाने दिवाळी साजरी करण्याचा करारनामाच ठरला होता. त्यामुळे किल्ला बनविणे, रांगोळी काढणे, दारात आकाशकंदिल व दिव्यांची रोषणाई, नवीन कपडे परिधान करण्यापूर्वी उटणे आणि सुवासिक साबनाने केलेली आंघोळ नवरुप देत होते. धनत्रयोदशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा तथा पाडवा, भाऊबीज हे पाच दिवस म्हणजे आनंदोत्सव होता. त्याचबरोबर शालेय जिवनात दर दिवशी दिवाळीच्या अभ्यासक्रमातील प्रश्नोत्तरे, गणित सोडविणे, पाढे लिहिणे, दिवाळीचा अनुभव, प्रवासवर्णन अशा अनेक गोष्टी सुवाच्य अक्षरात नव्या कोर्या वहीत लिहून ती वही सजवली जात होती. सुट्टी संपल्यानंतर शाळेमध्ये वर्गशिक्षक/शिक्षिका त्याची तपासणी करुन शाबासकी देत होते. काही विद्यार्थी मामाच्या गावाला जाताना आपले दप्तरसुद्धा आपल्याबरोबर दिवाळी अभ्यासक्रमासाठी घेवून जात होते. आता या सर्व आठवणीच राहिलेल्या आहेत. आठ वर्षीपूर्वीचा दिवाळीचा अभ्यासक्रम आता कालबाह्य झाल्याची खंत जुन्या विद्यार्थी व शिक्षकांना वाटत आहे. खरे म्हणजे जुने ते सोने असते. पूर्वी पतंगाच्या काठ्या, कळक, गव्हाची खळ, पतंगी कागदापासून बनविलेला आकाशकंदिल एकत्र कुटूंबपद्धतीची शोभा वाढवित होते.
आली माझ्या घरी ही दिवाळी... वेड्या बहिणीची ही वेडी माया ही गाणी रेडिओवर ऐकू येत होती. पण गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या दिवशी ‘वेगवेगळी फुले उमलली, रचूनी त्यांचे झेले, गेले ते दिन गेले’ हे गीत ऐकल्यानंतर आपसुकच डोळ्यात पाणी येते आणि बालपण देगा देवा, त्याचा विसर न व्हावा, असे म्हणावेसे वाटत असल्याची प्रतिक्रिया कळवा येथील राजीव गांधी मेमोरिअल हॉस्पिटलचे व्याख्याते डॉ. अरुण माने, अलिबागचे पोलीस उप अधीक्षक अनंत नेर्लेकर, विनित जवळकर व अजित जगताप यांनी विद्यार्थी दशेतील आठवणी उजाळून काढताना दिल्या.
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |