01:41am | Jan 23, 2020 |
कराड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे आणि त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे या उदात्त हेतूने स्वर्गीय अण्णाजी पवार यांनी शिक्षणाची कवाडे खुली केली, त्यामुळेच आज वाहगाव सारख्या ग्रामीण भागात अण्णाजी पवार विद्यालयाच्या रूपानं एक सर्वोत्तम ज्ञान संकुल निर्माण झाले आहे. असे प्रतिपादन विटा येथील वैभव शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक दत्तात्रय गायकवाड यांनी केले. वाहगावचे सुपुत्र स्वर्गीय अण्णाजी पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एड. अमृतराव पवार होते. पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
भैरवनाथ शिक्षण संस्थेचे सचिव राहुल पवार, माजी पंचायत समिती सदस्य भास्कराव पवार गनी मुल्ला, अशोकराव गुरव, संभाजी पवार, बापूराव पवार, विश्वास शिंदे, संदीप पवार, गोविंदराव थोरात, श्रीमंत पवार, वामन मोरे, दिलीप खारवते, यांच्यासह मुख्याध्यापक शिवाजीराव कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
गायकवाड पुढे म्हणाले अण्णाजी पवार यांनी केलेल्या शैक्षणिक कामगिरीचे मोल होऊ शकत नाही ते अनमोल आहे यामुळेच आज ग्रामीण भागातील मुले चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा त्यांचे वंशज पुढे चालवत आहेत ही बाब अत्यंत उल्लेखनीय आहे. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या विद्यालयाचे नाव उज्वल करावे असे आवाहन त्यांनी केले.
प्रणव ताटे यांनी स्वर्गीय अण्णाजी पवार यांनी निर्माण केलेल्या शाळेतच आमचे शिक्षण झाले आणि आज त्याच शाळेत प्रमुख उपस्थिती चा मान मिळतोय ही खरोखरच समाधानाची बाब आहे अण्णाजी पवार यांनी निर्माण केलेल्या शिक्षण संकुलात शिकल्या मुळेच हे भाग्य मला मीळाले असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात एड. अमृतराव पवार यांनी या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन आपला नावलौकिक वाढवावा तसेच विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले.
यावेळी विद्यालयातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या क्रांतीदूत या हस्तलिखिताचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीराव कदम यांनी केले संस्थेचे सचिव राहुल पवार, मुख्याध्यापक शिवाजीराव कदम, पर्यवेक्षक धनंजय काळगावे, यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा झिंमरे यांनी केले, धनंजय काळगावे यांनी आभार मानले यावेळी वाहागाव परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |