02:25am | Jan 11, 2020 |
कराड : आज प्रत्येक क्षेत्रात तणावाची स्थिती आहे. हा तणाव दूर करण्यासाठी सर्वांनी प्रथम दुसर्याशी स्पर्धा करणे बंद करावे. प्रत्येकाने केवळ स्वतःशी स्पर्धा करावी. स्वतः सोबत दुसर्यांच्या हिताचा विचार करून मनोवृत्तीत बदल केल्यास जीवनात निश्चितपणे यश मिळते, असा मौलिक सल्ला प्रल्हाद वामनराव पै यांनी दिला आहे.
पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर सदगुरु वामनराव पै यांचे सुपूत्र प्रल्हाद पै यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कराडमधील पत्रकारांसह जीवन विद्या मिशनचे सदस्य उपस्थित होते.
प्रल्हाद पै म्हणाले, जगासह आपण सर्वजण ग्लोबल झालो आहोत. कामाचा ताण तसेच अन्य कारणांमुळे मनाला त्रास होऊन तणाव वाढला आहे. त्यामुळेच मनाला ट्रेनिंग देत विचार करण्याची दृष्टी बदलण्याचे काम जीवन विद्या मिशनकडून केले जाते. यात कोणता धर्म - जात यांचा संबंधच नाही. तसेच श्रीमंत - गरीब असा भेदही केला जात नाही. जीवन विद्या मिशनचे तत्वज्ञान निसर्ग नियमांवर तत्वज्ञान आधारलेले आहे.
मानवी जीवनाला वेगळे वळण देत दृष्टी बदलण्यासाठी मनाचे कार्य वाढवणे गरजेचे आहे. स्वतःमधील संकुचित वृत्ती दूर करत मी आणि माझा या विचारात रमू नका. मनाचा कोतेपणा कमी न केल्यास स्वतः तणावाच्या परिस्थितीत अडकतो. मी व माझा असा विचार करत दुसर्यांच्या अहित चिंतल्यास संघर्ष वाढतो. त्यामुळे हा संघर्ष टाळत पुढे जाणे आवश्यक आहे, असे प्रल्हाद पै यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येकाने स्वतःसोबत सर्वांचा विचार केल्यास त्याला निसर्गही मदत करतो आणि अन्य लोकही आपला विचार करतात. असा विचार केल्याने काहींना मागे जाण्याची भिती वाटते. प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही हे लक्षात ठेवा असे अनुभवाचे बोलही प्रल्हाद पै यांनी यावेळी सुनावले.
आपले काम करताना इतरांशी स्पर्धा करू नका. आपण आपले काम प्रामाणिकपणे करताना इतरांचेही चांगले व्हावे, असा विचार केल्यास सकारात्मक विचार निर्माण होतो. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना ठेवत तणाव कमी केल्यास यश निश्चितपणे मिळते, असे स्पष्ट करत व्यसनांपासून दूर रहात समाजासाठी चांगले करणे जेवढे शक्य आहे, तितके करा. त्यातून आनंद मिळून आपली मनोवृत्ती व्यापक होईल, असेही प्रल्हाद पै यांनी यावेळी सांगितले.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |