02:55pm | Jul 08, 2018 |
सातारा : स्वातंत्र्य सैनिक किसन वीर भुईंज साखर कारखान्याने शेतकर्यांची 121 कोटी रुपयांची थकित बिले दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर कारखान्याने शेतकर्यांची देणी द्यावीत, अन्यथा मालमत्ता विकावी असा आदेश साखर आयुक्तांनी दिला. तर दुसर्या बाजुला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी त्याचवेळी कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांचा मुंबईत गौरव केला. ही राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका उघड झाल्याने सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची शेतकर्यांबद्दल असणारी सहानुभूती बेगडी असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई, कोरेगाव, जावली, सातारा, खटाव, खंडाळा व फलटण या भागातील शेतकरी किसनवीर सहकारी साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी देत होते. या कारखान्यावर राष्ट्रीय कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव माजी आमदार मदन भोसले यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. साखर कारखानदारी अडचणीत आली असतानाही त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करुन या कारखान्याला उर्जित अवस्थेत आणण्याचा प्रयत्न केला. तसेच जावलीतील प्रतापगड साखर कारखाना व खंडाळा येथील साखर कारखाना चालू करण्याचा निर्णय घेतला. पण साखर दरातील चढ-उतार व वाजवी खर्च यामुळे आर्थिक ताण निर्माण झाला. यंदा 11 लाख 78 हजार 970 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. व्यवस्थापनाने प्रतीटन 2770 रुपये दर शेतकर्यांना जाहीर केला. पण नोव्हेंबरमध्ये उसाच्या तोड झालेल्या पैशाची तरतूद होवू शकली नाही. मुळातच शेतकर्यांनी ऊस दिल्यानंतर 14 दिवसांत उसाचे पैसे शेतकर्याच्या खात्यात जमा करणे बंधनकारक असतानाही किसनवीर कारखान्याने भुईंज येथील 71 कोटी 28 लाख व खंडाळ्यातील 27 कोटी लाख रुपयांची देणी गेल्या सहा महिन्यांपासून दिलेली नव्हती. याबाबत शेतकर्यांनी राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांची भेट घेवून गार्हाणी मांडली. त्यानंतर आ. पाटील यांनी पुण्याचे साखर आयुक्त संभाजीराव कडू पाटील यांची भेट घेवून शेतकर्यांना त्यांच्या उसाचे थकित बिल मिळावे, कारखान्याच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी, प्रशासक नेमावा, अशा मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनाची गंभीर दखल घेतल्यानंतर साखर आयुक्तांनी किसनवीर कारखान्याची मालमत्ता विका व शेतकर्यांना पैसे द्या, असा आदेश काढून त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकार्यांनी करावी, असे सूचित केले आहे. तर दुसर्या बाजुला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांना मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कार्यक्रमात वसंतराव नाईक पुरस्कार देताना किसनवीर कारखान्याने गत 15 वर्षात हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना अभिप्रेत असलेले कार्य केलेले आहे, त्यांनी शेतीपुरक उद्योग कारखान्यात आणून आदर्श निर्माण केला आहे, असे कौतुक केले आहे.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार साखर कारखान्याविरोधात तक्रार करतात, तर दुसर्या बाजुला राष्ट्रवादी नेते शरद पवार हे कारखान्याच्या चेअरमनचे कौतुक करुन आपल्या हस्ते पुरस्कारही देतात, ही बाब ऊ स उत्पादक शेतकर्यांना चांगलीच खटकली आहे. शरद पवार यांच्या दुटप्पी भूमिकेचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राला अनेकदा आलेला आहे. सातारा जिल्ह्यात माजी महसूल मंत्री व कोरेगावचे राष्ट्रवादी पक्षाच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी आर्थिक निकषावर आरक्षणाचा मुद्दा मांडला होता. त्याला विरोध करणारे पवार नंतर याच मुद्यावर बोलू लागले. सातारचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीतून सर्व आमदारांनी विरोध केला. त्याचवेळी खा. श्री. छ. उदयनराजे यांच्या वाढदिवसाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शरद पवारही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी खासदारांचे कौतुक केले आणि दुसर्या बाजुला नाराज झालेल्या आमदारांचीही भेट घेवून आपली कॉलर ताठ असल्याचे भासवले. आताही भुईंज कारखान्याच्या थकित बिलाबाबत आमदारांनी केलेली तक्रार आणि पवारांनी केलेला चेअरमनचा गौरव या दुटप्पी भूमिकेला आता शेतकरी वैतागले आहेत. त्यामुळे भविष्यात शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा होते, की राष्ट्रवादीचे नुसते राजकारणच होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |