02:23am | Feb 20, 2019 |
सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे सातारा शहरालतचा त्रिशंकू भाग आणि उपनगरांना भिषण पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. जलवाहिन्यांना लागलेली गळती हा तर कधीही न सुटणारा प्रश्न बनला आहे. याशिवाय चुकीचे मीटर रिडींग, नवीन नळकनेक्शनसाठी घेतले जाणारे डिपॉझिट, थकीत बिलावरील विलंब आकार अशा अनेक कारणांमुळे नागरिक मेटाकुटीस आले आहे. त्रिशंकू भाग आणि उपनगरातील पाणी समस्या तातडीने सोडवावी आणि इतर चुकीचे व बेकायदेशीर प्रकार तातडीने थांबवावेत. हे प्रकार त्वरीत न थांबल्यास प्राधिकरणाच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी प्राधिकरणाच्या अधिकार्यांना दिला.
दरम्यान, बैठकीत झालेल्या चर्चेनुसार तातडीने कार्यवाही करावी, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिल्या. पाणी समस्या दूर करण्याबरोबरच इतर चुकीचे प्रकार तातडीने थांबवले जातील असे आश्वासन प्राधिकरणाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता भुजबळ यांनी दिले.
शाहूपुरी, गोडोली, शाहूनगर, गोळीबार मैदान, विलासपूर, करंजे, सदरबझार आदी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होत असून नागरिकांना पिण्यासही पाणी मिळत नाही. तसेच ठिकठिकाणी जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागली असून वारंवार लेखी, तोंडी सांगूनही गळती काढण्याचे काम केले जात नाही. थकित पाणी बिलांवर चुकीच्या पध्दतीने विलंब आकार लावण्यात आला आहे. हा आकार अन्यायकारक असून सदर आकारणी त्वरीत रद्द करण्यात यावी. शासन निर्णय दि. 9 जुलै 2014 नुसार लोकवर्गणी माङ्ग करण्यात आली असताना गोडोली, गोळीबार मैदान, विलासपूर आदी भागात नळ कनेक्शन जोडणीसाठी लोकवर्गणीच्या नावे 5 हजार रुपये घेतले जातात. मीटर रिडींग चुकीचे येत असल्याबाबत असंख्य तक्रारी दाखल होत आहेत. नागरिकांना हेलपाटे मारणे भाग पडत आहे. प्राधिकरणाने केलेली पाणीपट्टी वाढ अन्यायकारक असून ही दरवाढ तातडीने रद्द करावी. नवीन नळकनेक्शन जोडणेसाठी नागरिकांकडून चुकीच्यापध्दतीने डिपॉझीट च्या नावाखाली 20 हजार ते 25 हजार अशी कितीही रक्कम बेकायदेशररित्या घेतली जात असून ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. शाहूपुरी भागात अपुरा पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. याबाबत वारंवार तक्रारी करुन सुध्दा याकडे दुर्लक्ष होत आहे. विसावा ते कोटेश्वर टाकीपर्यंत मुख्य दाब नलीकेवर अनेक नळकनेक्नश दिली गेली आहेत. त्यामुळे शाहूपूरी भागाला अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
पाणीपुरवठ्याच्या नियमानुसार दाब नलीकेवर कनेक्शन देता येत नाही. त्यामुळे ही कनेक्शन तातडीने बंद करुन संबंधीतांवर कडक करवाई करावी. गोळीबार मैदान, शाहूनगर, पिरवाडी, विलासपुर या भागासाठी सन 1968 साली वितरण व्यवस्था तयार करण्यात आली आहे. सदर वितरण व्यवस्था जीर्ण आणि गंजल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. तसेच दुषीत पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना कावीळ, गॅस्ट्रो आदी साथीचे रोगांची लागण होत आहे. तरी सदर भागांसाठी नवीन पाणीपुरवठा वितरण व्यवस्था करण्यात यावी, आदी समस्या सोडवण्यासाठी त्रिशंकू भाग आणि उपनगरातील नागरिकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना साकडे घातले होते. यानंतर तातडीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्राधिकरणाच्या कार्यालयात जावून अधिकार्यांची बैठक घेतली.
यावेळी नगरसेवक अविनाश कदम, शेखर मोरे- पाटील, पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, भारत भोसले, विकास देशमुख, सयाजी चव्हाण, ङ्गिरोज पठाण, शाहुपूरी ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा केंडे, माधवी शेटे, निलम देशमुख यांच्यासह सदरबझार, झोपडपट्टी, शाहूनगर, गोडोली, विलासपूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत नागरिकांच्या सर्व अडचणी सोडवाव्यात. गळती त्वरीत थांबवावी. डिपॉझिटच्या नावाखाली सुरु असलेली ग्राहकांची आर्थिक पिळवणूक थांबवून शासन नियमाप्रमाणे डिपॉझिटची रक्कम घ्यावी. चुकीचे प्रकार करणारांवर कडक कारवाई करावी. तसेच उपनगरे आणि त्रिशंकू भागातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अन्यथा तिव्र आंदोलन करु, असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत दिला. सर्व समस्यांबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता भुजबळ यांनी यावेळी दिले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |