06:04pm | Oct 11, 2019 |
सातारा : भारतातील सर्वात निकृष्ठ दर्जाचा महामार्ग ठरलेल्या पुणे-बंगलोर महामार्गावर खेड शिवापूर व आनेवाडी टोलनाके बंद करण्याच्या मागणीला जोर धरु लागला आहे. नेटकर्यांनी फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोन्ही टोलनाके बंद करा, अन्यथा 21 तारखेला इंगा दाखवू, असा धमकीवजा इशारा दिल्यामुळे सोशल मीडियावरील वातावरण तापले आहे, मात्र फेसबुक आणि व्हॉटसऍपवरील टिवटिव मात्र प्रत्यक्षात येत नसल्याने हा स्टंटही बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ठरत आहे.
कोल्हापूरमध्ये आयआरबी कंपनीने सर्वच रस्ते कॉंक्रिटीकरण केल्यानंतर शहराच्या तीनही प्रवेशद्वारांवर टोलनाके बसवून कोल्हापूरकरांची नाकाबंदी केली होती. या नाकाबंदीमुळे कोल्हापुरात प्रक्षुब्धतेचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर कोल्हापुरकरांनी केलेली जाळपोळ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. मात्र कोल्हापुरच्या तुलनेत सातारकर मात्र सोशिक झालेले आहेत. आनेवाडी व खेड शिवापूर येथील टोलनाक्यावरील अन्यायकारक टोलवसुली बंद झालीच पाहिजे, या मागणीला सोशल मीडियावर धार चढली आहे. सातारा ते पुणे या राष्ट्रीय महामार्गाची पुरती दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डेच नव्हेतर पुरुषभर घळ्या ठिकठिकाणी पडलेल्या आहेत. निकृष्ठ दर्जाचे सहापदरीकरण, ठिकठिकाणी अर्धवट पडलेली पुलाची कामे, फुटा-फुटांवरील खड्डे चुकवायचे की गाडी चालवायची, असा प्रश्न या मार्गावरुन प्रवास करणार्या वाहनचालकाला पडतो. मात्र असे असूनही सातारकरांसह या मार्गावरुन प्रवास करणारे अनेकजण निमूटपणे या दोन्ही टोलनाक्यावर आपल्यावर झालेल्या अन्यायाचा टोल भरतात. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा जाब टोलनाक्यावरील विभूतींना विचारल्यास मार मिळण्याची भीती असते. त्यामुळे जाब विचारण्याच्या फंदात शक्यतो कोणी पडत नाही. त्यामुळे सोशिक सातारकरांना सोशल मीडियावर साद घालून आनेवाडी व खेड शिवापूर टोल नाक्यावरील अन्यायकारक टोलवसुली बंद झालीच पाहिजे, अन्यथा 21 तारखेला इंगा दाखवू अशा आशयाचे मॅसेज व्हायरल होवू लागले आहेत. सातार्यातील अनेकांनी सोशल मीडियावरील या मोहिमेत सहभाग घेतला आहे. अनेकांनी ‘मन की बात’ सोशल मीडियावर व्यक्त करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. मात्र, ही सोशल मीडियावरील टिवटिव प्रत्यक्षात मैदानावर न आल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या अडकित्त्यात पुढार्यांना अडकवणारा सेनापती या नेटकर्यांना मिळत नसल्याने व्हर्च्युअल आवाज खरेच प्रत्यक्षात उतरणार काय, याबाबतची उत्सुकता टोल पीडित सातारकरांना लागलेली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |