03:51pm | Aug 16, 2018 |
कराड : कराड विमातळ विस्तारवाढ कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, ही आमची भुमिका पाहिल्यापासूनच आहे. असे असतानाही प्रशासन कायदा मोडून, कायदेशीर प्रक्रिया डावलून विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आंदोलनाची ताकद दाखवून देऊ. जबरदस्तीने गेलात तर खबरदार, असा इशारा देत दि.३० ऑगस्ट रोजी येथील प्रांत कार्यालयावर खबरदार मोर्चा काढणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे नेते व कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांंनी जाहीर केले. यावेळी चलो प्रांत कार्यालय अशी हाक देण्यात आली.
कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी शेतकरी व भैरवनाथ पाणी पुरवठा योजना बचाव कृती समितीने आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मंगळवारी वारूंजी ता. कराड येथील आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कृती समितीचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने बाधीत शेतकरी, प्लॉटधारक यांच्यासह मुंढे, गोटे, केसे, पाडळी गावातील नागरिक उपस्थित होते.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, विमानतळ विस्तारवाढीत वारुंजी, केसे व मुंढे या तीन गावांतील शेती, घरे तसेच भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेचे कार्यक्षेत्र असणारी शेकडो एकर पिकाऊ जमीन बाधीत होणार असून यात ५0 हेक्टर ५२ आर क्षेत्राचा समावेश आहेत. जवळपास ५९३ इतके खातेदार शेतकरी, प्लॉटधारकांचा यात बाधीत होत आहेत. याशिवाय इतर २0७ खातेदार बाधीत होणार आहेत. जमीन अधिग्रहण कायद्यानुसार येथील जमीन विमानतळ विस्तार वाढीसाठी घेता येणार नाही, हे आम्ही कागदोपत्री शासनाला वेळोवेळी झालेल्या बैठकातून पटवून दिले आहे. या बैठकांचे मिनिटस्ही आपल्याकडे उपलब्ध आहेत.
ते म्हणाले, विकासाला आमचा विरोध नाही. मात्र झालेला व शेतकऱ्यांनी स्वत:चा विकास स्वत: केला आहे. तो कोणत्याही परिस्थितीत उध्दस्त होऊ दिला जाणार नाही. जमीन अधिग्रहण व पुनर्वसन कायद्यानुसार आम्ही या प्रकल्पासाठी पर्यायी जमीन म्हणून कोरेगाव तालुक्यातील निढळ व कराड तालुक्यातील शामगाव येथे सुचवली आहे. पुनर्वसन कायद्यानुसार या पर्यायांची तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाने तसे काही केलेले नाही. कराड विमानतळ विस्तारवाढीबाबतचा पर्याय प्रशासनानेच अंतिम केला आहे. जमीन संपादनाची संयुक्त मोजणी अद्याप झालेले नाही. ही मोजणी झाल्याशिवाय पुनर्वसनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही. या अनुषंगाने अद्याप पुनर्सवसन प्राधिकरणाची बैठकही झालेली नाही. शिवाय पुनर्वसनाचे पॅकेजही हे प्राधिकारणच जाहीर करते तेही झालेले नाही. मगा प्रशासन पॅकेजची भाषा कशी काय करत आहे? असा प्रश्न डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी उपस्थित केला.
डॉ. पाटणकर म्हणाले, केवळ चार दोन शेतकऱ्यांना बोलावून त्यांंना पुनर्वसन पॅकेजचे आमीष दाखवून प्रशासन विमानतळ विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न करत आहे. प्रांताधिकाऱ्यांनी २८ लोकांचीच बैठक का बोलावली? २८ लोकांचा आकडा आला कोठून? ही बैठक कायदेशीर आहे का? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडे नाहीत. २0१५ ते २0१८च्या दरम्यान कोणतीच प्रक्रिया चालू नसताना अचानक प्रांताधिकारी बैठक घेतात हा काय प्रकार आहेे? असे सांगत ही हुकूमशाही नव्हे. जर तुम्ही जबरदस्तीने ही वस्तारवाढ करणार असाल तर याद राखा. या प्रश्नावर यापूर्वी अनेक यापूर्वी अनेक आंदोलने मोर्चे झाले आहेत. हे आंदोलन भविष्यात अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देत याचाच पहिला टप्पा म्हणून दि. ३० ऑगस्ट २०१८ रोजी येथील महात्मा गांधी पुतळ्या अभिवादन करून खबदार मोर्चा काढण्यात येणार असल्याचे डॉ. पाटणकर यांनी जाहीर केले.
सोन्या विटाचे घर दिले तरी नको
कराड विमानतळ विस्तारीकरणाला मोठा विरोध असताना प्रशासनाने हालचाली गतीमान केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली बाधितांचा मेळावा झाला. या मेळाव्यात शासनाने सोन्याच्या विटांचेही घर बांधून दिले तरी आम्ही विस्तार वाढ होऊ देणार नाही, असा हातवर करून ठराव करण्यात आला. यावेळी प्रशासन वेगवेगळी आमिषे दाखवून फुट पाडण्याची खेळी करत आहे. याला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
काँग्रेसच भाजपच्या मदतीला..
विमानतळ विस्तार वाढ झाली पाहिजे म्हणून येथील माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचेच काही कार्यकर्ते काँग्रेसच्या विरोधी असणाऱ्या भाजपच्या मदतीला धावून जात आहेत. विस्तारवाढी संदर्भात बाधींतांची दिशाभूल करत आहे. त्यांना विविध आमिषे दाखवून भूलवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेसच भाजपच्या मदतीला धावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेसी बाबांचे कार्यकत्र्यांची वाटचाल बहुदा भाजपच्या दिशेने आहे की काय असा प्रश्ना डॉ. भारत पाटणकर यांनी उपस्थित करताच एकच हशा पिकाला.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |