सातारा : पृथ्वीवर 70 टक्के पाणी असून 30 टक्के जमिन आहे. जमिनीवरील वनस्पतीपेक्षा जास्त वनस्पती समुद्रात आहेत. जमिनीवर निर्माण झालेल्या वनस्पती आणि त्याचा विकास होण्यासाठी 50 कोटी वर्षे जावी लागली. वनस्पती जेवढे आवश्यक आहे तेवढेच घेतात त्याचप्रमाणे कार्य करतात मानवी जीवनाप्रमाणे निसर्गात चंगळवाद नसतो असे प्रतिपादन जेष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपुरी शाखेच्यावतीने नगरवाचनालयातील पाठक हॉल मध्ये जागतिक पर्यावरणदिनानिमित्त आयोजित वनस्पती विश्वातील अभियांत्रिकी करामती या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, डॉ. उमेश करंबेळकर, नंदकुमार सावंत होते.
यावेळी बोलताना प्रा. महाजन म्हणाले, जंगलाबाबत अनेक गैरसमज आणि अज्ञान आहे. माणूस हा जगातील एकमेव हिंस्त्र प्राणी आहे. जंगलातील प्राणी भूक असल्याशिवाय दुस-या प्राण्याची शिकार करत नाहीत. परंतु माणसाच्या आयुष्यात तसे नाही. मानवी जीवनात अभियांत्रिकी विविध शाखांचा शोध गेल्या काही वर्षात लागला असला तरी वनस्पती विश्वात अभियांत्रिकी करामती 350 कोटी वर्षांपासून सुरु आहेत. सुरुवातीला समुद्रात वनस्पतींची निर्मिती झाली ती वाढली त्यानंतर हळूहळू ती जमिनीवर आली. जमिनीला अनुसरुन वनस्पतींमध्ये बदल झाले पण हा बदल होण्यासाठी आणि तो स्थिर होण्यासाठी 50 कोटी वर्षे जावी लागली. यावेळी त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्व शाखांचे अस्तित्व वनस्पती विश्वात कशाप्रकारे आहे हे उदाहरणासह सांगितले. प्रत्येक हिरवी वनस्पती ही प्राणवायू तयार करत असते. सगळया वनस्पती ग्लुकोज तयार करतात आणि वनस्पतीच्या प्रकारानुसार ते साठवतात. आज विज्ञान पुढे गेले असले तरी वनस्पती ग्लुकोज तयार करण्याची प्रक्रिया समजली आहे परंतु प्रयोगशाळेतही ते तयार करता आलेले नाही. पाणी म्हणजे जीवन आहे. पर्जन्यमान ठरवणारे 16 घटक असून त्यापैकी जंगल हे एक आहे. भारतातील प्रति व्यक्ती झाडांचे कमी होणारे प्रमाण चिंताजनक आहे. जीवनाची व्याख्या करणे अवघड असून कुठल्याही वनस्पती 24 तास ऑक्सिजन देत नाही. वनस्पती विश्वातील अभियांत्रिकी समजून घेण्यासाठी सखोल अभ्यास करणे आवश्यक असून ते गुंतागुंतीचेही आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
प्रारंभी शाहुपुरी शाखेच्यावतीने प्रा. महाजन यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार अॅड. चंद्रकांत बेबले यांनी मानले. कार्यक्रमास पर्यावरणप्रेमी, मसाप शाहुपुरी शाखेचे कार्यकारिणी सदस्य आणि सातारकर उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |